शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे आली असती तर मुंबई प्रवास सोपा झाला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:37 IST

३0 मिनिटांचा प्रवास । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’. पेण ते अलिबाग 30 किमी

अलिबाग : अलिबागला रेल्वे आली असती तर आज परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असता... रेल्वे स्टेशन झाले असते तर, रोजगार निर्माण झाला असता... अलिबाग-मुंबई असा रोजचा प्रवास करणे सोपे झाले असते अशी प्रतिक्रिया पेण ते अलिबाग ३० किमी प्रवासादरम्यान रायगड मतदार संघातील मतदारांशी संवाद साधताना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त करण्यात आली.

मुंबईपासून रायगड जिल्हा हाके च्या अंतरावर आहे. मात्र, जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. याला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी राजकीय नेते जबाबदार आहेत. शिवसेनेचे अनंत गीते काही तरी करतील म्हणून मतदारांनी त्यांना निवडून दिले. निवडून आल्यावर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांनी अलिबागला रेल्वे आणण्याचे जाहीर केले. त्यांच्या खासदारकीची टर्म संपत आली. त्यांनी रेल्वे काय हवेत उभारली काय? असा खणखणीत सवाल पोयनाड येथील मयूर तुपे याने केला.

जिल्ह्यामध्ये कंपन्या येण्याआधी त्या कोणत्या स्वरूपाच्या येणार आहेत हे लोकप्रतिनिधींना माहिती असते. त्यामुळे त्या कंपन्यांना आवश्यक असणारे स्कील डेव्हलप करण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थाने पुढाकार घ्यायला पाहिजे, असे नयन पाटील या युवकाने स्पष्ट केले. जिल्ह्यात चांगले मेडिकल कॉलेज, आरोग्य सुविधा उभारणे गरजेचे आहे. छोट्या-मोठ्या आजारासाठी स्थानिकांना मुंबईची वाट धरावी लागते. आर्थिकदृष्ट्यादुर्बल असणाऱ्यांना ते परवडत नाही. त्यामुळे निवडून येणाºया खासदारांनी चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत शिरवलीची सोनाली तणपुरे हिने व्यक्त केले. ६७ टक्के जनता ग्रामीण भागात राहते आणि त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. परंतु शेती आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडे चांगली धोरणे नाहीत. वर्षाला शेतकºयांना सहा हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, त्या सहा हजार रुपयांमध्ये काय होणार असा सवाल जयश्री पाटील यांनी केला. शेतकºयांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली आठ वर्षे रडतखडत सुरू आहे. त्या कामाला द्रुतगती मिळाली पाहिजे. काम लवकर पूर्ण झाले तर अलिबाग, रोहा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन आणि तळ कोकणातील प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचेल. यासाठी आधीचे आणि आताचे सरकार गंभीर दिसत नाही असे रवि पाटील यांनी सांगितले.आश्वासने खोटी ठरलीगीतेंनी अलिबागला रेल्वे आणण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात पाच वर्षे संपत आली तरी, रेल्वेचा एकही रुळ लागला नाही अथवा अस्तित्वातील रुळावरून रेल्वे धावली नाही. भाजप आश्वासनांप्रमाणे शिवसेनेच्या गीतेंची आश्वासने खोटी ठरली. रायगड आणि रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, ते पाणी अडवण्यासाठी धरणांची उभारणी झाली नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :raigad-pcरायगडalibaugअलिबाग