शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

रेल्वे आली असती तर मुंबई प्रवास सोपा झाला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 04:37 IST

३0 मिनिटांचा प्रवास । एसटीच्या लाल डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’. पेण ते अलिबाग 30 किमी

अलिबाग : अलिबागला रेल्वे आली असती तर आज परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असता... रेल्वे स्टेशन झाले असते तर, रोजगार निर्माण झाला असता... अलिबाग-मुंबई असा रोजचा प्रवास करणे सोपे झाले असते अशी प्रतिक्रिया पेण ते अलिबाग ३० किमी प्रवासादरम्यान रायगड मतदार संघातील मतदारांशी संवाद साधताना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीकडे व्यक्त करण्यात आली.

मुंबईपासून रायगड जिल्हा हाके च्या अंतरावर आहे. मात्र, जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. याला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी राजकीय नेते जबाबदार आहेत. शिवसेनेचे अनंत गीते काही तरी करतील म्हणून मतदारांनी त्यांना निवडून दिले. निवडून आल्यावर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांनी अलिबागला रेल्वे आणण्याचे जाहीर केले. त्यांच्या खासदारकीची टर्म संपत आली. त्यांनी रेल्वे काय हवेत उभारली काय? असा खणखणीत सवाल पोयनाड येथील मयूर तुपे याने केला.

जिल्ह्यामध्ये कंपन्या येण्याआधी त्या कोणत्या स्वरूपाच्या येणार आहेत हे लोकप्रतिनिधींना माहिती असते. त्यामुळे त्या कंपन्यांना आवश्यक असणारे स्कील डेव्हलप करण्यासाठी स्थानिकांना प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी खऱ्या अर्थाने पुढाकार घ्यायला पाहिजे, असे नयन पाटील या युवकाने स्पष्ट केले. जिल्ह्यात चांगले मेडिकल कॉलेज, आरोग्य सुविधा उभारणे गरजेचे आहे. छोट्या-मोठ्या आजारासाठी स्थानिकांना मुंबईची वाट धरावी लागते. आर्थिकदृष्ट्यादुर्बल असणाऱ्यांना ते परवडत नाही. त्यामुळे निवडून येणाºया खासदारांनी चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत शिरवलीची सोनाली तणपुरे हिने व्यक्त केले. ६७ टक्के जनता ग्रामीण भागात राहते आणि त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. परंतु शेती आणि शेतकऱ्यांसाठी सरकारकडे चांगली धोरणे नाहीत. वर्षाला शेतकºयांना सहा हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, त्या सहा हजार रुपयांमध्ये काय होणार असा सवाल जयश्री पाटील यांनी केला. शेतकºयांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली आठ वर्षे रडतखडत सुरू आहे. त्या कामाला द्रुतगती मिळाली पाहिजे. काम लवकर पूर्ण झाले तर अलिबाग, रोहा, माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन आणि तळ कोकणातील प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचेल. यासाठी आधीचे आणि आताचे सरकार गंभीर दिसत नाही असे रवि पाटील यांनी सांगितले.आश्वासने खोटी ठरलीगीतेंनी अलिबागला रेल्वे आणण्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात पाच वर्षे संपत आली तरी, रेल्वेचा एकही रुळ लागला नाही अथवा अस्तित्वातील रुळावरून रेल्वे धावली नाही. भाजप आश्वासनांप्रमाणे शिवसेनेच्या गीतेंची आश्वासने खोटी ठरली. रायगड आणि रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, ते पाणी अडवण्यासाठी धरणांची उभारणी झाली नाही. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :raigad-pcरायगडalibaugअलिबाग