शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

बर्फगोळा, शीतपेय विक्रेत्यांची चलती; शहाळी, कलिंगड, द्राक्षांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला

By निखिल म्हात्रे | Updated: March 29, 2024 12:39 IST

काही भागात वाऱ्याचा वेग अत्यल्प राहिल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या वातावरणात गारवा मिळवण्यासाठी नागरिक बर्फाचा गोळा, शीतपेयांना पसंती देत आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दिवसा शुकशुकाट दिसून येतो. मार्च महिन्याचा शेवटाचा आठवडा रायगडकरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. दिवसभर वाऱ्याचा वेग काहीसा टिकून राहिल्याने दिलासा मिळाला; मात्र काही भागात वाऱ्याचा वेग अत्यल्प राहिल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.

तीन ते चार दिवसांपासून संध्याकाळीही वातावरणात उष्मा राहत असल्याने उकाड्याचा त्रास वाढत आहे. संपूर्ण आठवडाभर पारा तिशीच्या पुढेच स्थिरावत असल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे. त्यामुळे गारवा मिळवण्यासाठी नागरिक बर्फाचा गोळा, शीतपेयांना पसंती देत आहेत. या व्यावसायिकांची त्यामुळे चलती आहे.

बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड पाणी, आईस्क्रीम, कुल्फीला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे; मात्र थंडपदार्थांचे सेवन सर्दी-पडसे, घसा खवखवणे यासारख्या शारीरिक तक्रारींना कारणीभूत ठरू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे....सध्या नागरिकांनी शरीरास थंडावा देणारी म्हणजेच शहाळी, कलिंगड, द्राक्ष, केळी, सीताफळ या फळांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करावे. मात्र, बर्फाचा गोळा, आईस्क्रीम, शीतपेय याचे सेवन टाळावे.- ज्ञानेश्वर अरसळे, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :alibaugअलिबागSummer Specialसमर स्पेशल