शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 00:15 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली. अखेरच्या पर्यटन हंगामात फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनाऱ्यांनी भुरळ पाडली. नारळी-पोफळीच्या बागा, रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाºया लाटा यामुळे श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण ठरत आहेत.मे महिन्यात खास पर्यटनाची चाहूल लागते. या शनिवार, रविवारी महिन्यातील पर्यटकांची रेकॉड ब्रेक गर्दी दिवेआगर समुद्रकिनाºयावर दिसून आली. निवडणुकीचे कामकाज आटपून अधिकारी, शाळेची सुट्टी संपत आल्याने आपल्या मित्रमंडळीसह व आपल्या कुटुंबासह थकवा घालवण्यासाठी श्रीवर्धनला आले होते. पुणे, मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडातील या किनाºयांकडे पर्यटकांची पावले वळली आहेत.श्रीवर्धनमधील सुमद्रकिनाºयांवर चांगल्या सुविधा असल्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ पहावयास मिळते असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.>मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी, पर्यटकांमध्ये नाराजीपेण : मुंबई-गोवा महार्गावरून कोकणातील निसर्ग सोंैदर्याचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी वाहतूककोंडीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण या ठिकाणांहून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्रकिनाºयाचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी पेण ते वडखळ मार्गावर होणाºया वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे, कर्नाळा खिंड, खारपाडा, तरणखोप, जिते, उचेडे, रामवाडी, वाशीनाका, पेण रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून काही ठिकाणी पुलाचे तर काही ठिकाणी मोरीचे काम सुरू आहे. ही कामे अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे कोकणात जाणाºया गाड्यांची तरणखोप बायपास, रामवाडी पूल, वडखळ नाका येथे दररोज वाहतूककोंडी होत असते. शनिवार व रविवारी सुट्टी असल्यामुळे या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे लहान मुलांसह कटुंबीय पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघाले असता भरउन्हात वाहतूककोंडीत अडकले. वडखळ ते पेण मार्ग, माणगाव, लोणेरे, महाड येथे दर शनिवार-रविवारी हे चित्र पाहावयास मिळते. वडखळ ते पेण हे ६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असतो.>रोजगार वाढलापर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे, त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. समुद्रकिनाºयावर पर्यटकांची ही रेलचेल पावसाळ्यापर्यंत अशीच कायम राहणार आहे.