शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 00:15 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली. अखेरच्या पर्यटन हंगामात फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनाऱ्यांनी भुरळ पाडली. नारळी-पोफळीच्या बागा, रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाºया लाटा यामुळे श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण ठरत आहेत.मे महिन्यात खास पर्यटनाची चाहूल लागते. या शनिवार, रविवारी महिन्यातील पर्यटकांची रेकॉड ब्रेक गर्दी दिवेआगर समुद्रकिनाºयावर दिसून आली. निवडणुकीचे कामकाज आटपून अधिकारी, शाळेची सुट्टी संपत आल्याने आपल्या मित्रमंडळीसह व आपल्या कुटुंबासह थकवा घालवण्यासाठी श्रीवर्धनला आले होते. पुणे, मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडातील या किनाºयांकडे पर्यटकांची पावले वळली आहेत.श्रीवर्धनमधील सुमद्रकिनाºयांवर चांगल्या सुविधा असल्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ पहावयास मिळते असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.>मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी, पर्यटकांमध्ये नाराजीपेण : मुंबई-गोवा महार्गावरून कोकणातील निसर्ग सोंैदर्याचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी वाहतूककोंडीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण या ठिकाणांहून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्रकिनाºयाचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी पेण ते वडखळ मार्गावर होणाºया वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे, कर्नाळा खिंड, खारपाडा, तरणखोप, जिते, उचेडे, रामवाडी, वाशीनाका, पेण रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून काही ठिकाणी पुलाचे तर काही ठिकाणी मोरीचे काम सुरू आहे. ही कामे अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे कोकणात जाणाºया गाड्यांची तरणखोप बायपास, रामवाडी पूल, वडखळ नाका येथे दररोज वाहतूककोंडी होत असते. शनिवार व रविवारी सुट्टी असल्यामुळे या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे लहान मुलांसह कटुंबीय पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघाले असता भरउन्हात वाहतूककोंडीत अडकले. वडखळ ते पेण मार्ग, माणगाव, लोणेरे, महाड येथे दर शनिवार-रविवारी हे चित्र पाहावयास मिळते. वडखळ ते पेण हे ६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असतो.>रोजगार वाढलापर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे, त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. समुद्रकिनाºयावर पर्यटकांची ही रेलचेल पावसाळ्यापर्यंत अशीच कायम राहणार आहे.