शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची हाउसफुल्ल गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 00:15 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी या शनिवार, रविवारी मे महिन्यातील हाउसफुल्ल गर्दी पाहायला मिळाली. अखेरच्या पर्यटन हंगामात फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनाऱ्यांनी भुरळ पाडली. नारळी-पोफळीच्या बागा, रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाºया लाटा यामुळे श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण ठरत आहेत.मे महिन्यात खास पर्यटनाची चाहूल लागते. या शनिवार, रविवारी महिन्यातील पर्यटकांची रेकॉड ब्रेक गर्दी दिवेआगर समुद्रकिनाºयावर दिसून आली. निवडणुकीचे कामकाज आटपून अधिकारी, शाळेची सुट्टी संपत आल्याने आपल्या मित्रमंडळीसह व आपल्या कुटुंबासह थकवा घालवण्यासाठी श्रीवर्धनला आले होते. पुणे, मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडातील या किनाºयांकडे पर्यटकांची पावले वळली आहेत.श्रीवर्धनमधील सुमद्रकिनाºयांवर चांगल्या सुविधा असल्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ पहावयास मिळते असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.>मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी, पर्यटकांमध्ये नाराजीपेण : मुंबई-गोवा महार्गावरून कोकणातील निसर्ग सोंैदर्याचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी वाहतूककोंडीमुळे नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू असून मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण या ठिकाणांहून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्रकिनाºयाचा आस्वाद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांनी पेण ते वडखळ मार्गावर होणाºया वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे, कर्नाळा खिंड, खारपाडा, तरणखोप, जिते, उचेडे, रामवाडी, वाशीनाका, पेण रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून काही ठिकाणी पुलाचे तर काही ठिकाणी मोरीचे काम सुरू आहे. ही कामे अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे कोकणात जाणाºया गाड्यांची तरणखोप बायपास, रामवाडी पूल, वडखळ नाका येथे दररोज वाहतूककोंडी होत असते. शनिवार व रविवारी सुट्टी असल्यामुळे या मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे लहान मुलांसह कटुंबीय पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघाले असता भरउन्हात वाहतूककोंडीत अडकले. वडखळ ते पेण मार्ग, माणगाव, लोणेरे, महाड येथे दर शनिवार-रविवारी हे चित्र पाहावयास मिळते. वडखळ ते पेण हे ६ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असतो.>रोजगार वाढलापर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे, त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठ्या हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. समुद्रकिनाºयावर पर्यटकांची ही रेलचेल पावसाळ्यापर्यंत अशीच कायम राहणार आहे.