शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वसतिगृहातील गृहपालांकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 05:02 IST

अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे शुक्रवारी केली आहे. याबाबतीत आपण शनिवारी स्वत: चौकशी करून तत्काळ कारवाई करणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात इ. ८ वीपासून पुढील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी राहत आहेत. वसतिगृहात २०१४ पासून महिला गृहपाल एम. जे. नरहरे कार्यरत आहेत. गृहपाल वसतिगृहात मनमानी करतात. त्यामुळे आम्हाला अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या त्रासाला कंटाळून वसतिगृहातील सर्व विद्यार्थी आपणास निवेदन देत असल्याचे यात नमूद केले आहे.वसतिगृहातील सुमारे ४० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरिता पोहोचले असता जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मुलांचे म्हणणे आणि तक्रारी जाणून घेतल्या आणि शनिवारी स्वत: चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मुलांना दिला.२०१५ मध्ये योगेश काष्टे हा विद्यार्थी वसतिगृहात राहत असताना मोबाइलवर काम करीत होता. यावेळी नरहरे यांनी रूममध्ये येऊन त्याला मारहाण केली. त्याने रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस केस करण्याची धमकी देऊन, नरहरेंनी त्याला वसतिगृहातून काढले. १ आॅगस्ट २०१८ रोजी करण काष्टे या विद्यार्थ्यास नरहरे यांनी रूममध्ये झाडू मारण्यास सांगितला. विद्यार्थ्याने झाडू कुठे आहे, याबाबत विचारणा केली असता त्यालाही दमदाटी करीत वसतिगृहातून बाहेर काढले.विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यास शिवीगाळ२९ आॅगस्ट २०१८ रोजी काही विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता अर्ज देऊन घरी गेले. मात्र, दुसºया दिवशी नरहरे यांनी त्यांना आॅफिसमध्ये बोलावून दमदाटी करून वसतिगृह सोडून जाण्यास सांगितले. विद्यार्थ्यांकडून कोणतीही चूक झाल्यास त्यांच्यावर अपशब्दांचा भडिमार होतो. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा, पालकांचाही उद्धार करून सतत अपमानित केले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.पुरुष गृहपाल द्यावे, अन्यथा उपोषण करणारसतत शारीरिक, मानसिक छळ, दमदाटी, शिवीगाळ, पालकांचा अपमान, मारहाणीचे प्रकार घडत असल्याने वसतिगृहातील सर्वच विद्यार्थी त्रासले आहेत. या गोष्टींची लेखी तक्रार वेळोवेळी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. हे वसतिगृह मुलांचे असल्याने याठिकाणी पुरुष गृहपाल नेमण्यात यावा, नरहरे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अन्यथा वसतिगृहातील सर्व ६० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा दिवसांनंतर आमरण उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर ४० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या