शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील गृहपालांकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 05:02 IST

अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे.

- जयंत धुळपअलिबाग : अलिबाग शहरालगत गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मुलांनी वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे शुक्रवारी केली आहे. याबाबतीत आपण शनिवारी स्वत: चौकशी करून तत्काळ कारवाई करणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात इ. ८ वीपासून पुढील शिक्षण घेत असलेले विद्यार्थी राहत आहेत. वसतिगृहात २०१४ पासून महिला गृहपाल एम. जे. नरहरे कार्यरत आहेत. गृहपाल वसतिगृहात मनमानी करतात. त्यामुळे आम्हाला अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या त्रासाला कंटाळून वसतिगृहातील सर्व विद्यार्थी आपणास निवेदन देत असल्याचे यात नमूद केले आहे.वसतिगृहातील सुमारे ४० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्याकरिता पोहोचले असता जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मुलांचे म्हणणे आणि तक्रारी जाणून घेतल्या आणि शनिवारी स्वत: चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा विश्वास मुलांना दिला.२०१५ मध्ये योगेश काष्टे हा विद्यार्थी वसतिगृहात राहत असताना मोबाइलवर काम करीत होता. यावेळी नरहरे यांनी रूममध्ये येऊन त्याला मारहाण केली. त्याने रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस केस करण्याची धमकी देऊन, नरहरेंनी त्याला वसतिगृहातून काढले. १ आॅगस्ट २०१८ रोजी करण काष्टे या विद्यार्थ्यास नरहरे यांनी रूममध्ये झाडू मारण्यास सांगितला. विद्यार्थ्याने झाडू कुठे आहे, याबाबत विचारणा केली असता त्यालाही दमदाटी करीत वसतिगृहातून बाहेर काढले.विद्यार्थ्यांकडून चूक झाल्यास शिवीगाळ२९ आॅगस्ट २०१८ रोजी काही विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता अर्ज देऊन घरी गेले. मात्र, दुसºया दिवशी नरहरे यांनी त्यांना आॅफिसमध्ये बोलावून दमदाटी करून वसतिगृह सोडून जाण्यास सांगितले. विद्यार्थ्यांकडून कोणतीही चूक झाल्यास त्यांच्यावर अपशब्दांचा भडिमार होतो. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा, पालकांचाही उद्धार करून सतत अपमानित केले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.पुरुष गृहपाल द्यावे, अन्यथा उपोषण करणारसतत शारीरिक, मानसिक छळ, दमदाटी, शिवीगाळ, पालकांचा अपमान, मारहाणीचे प्रकार घडत असल्याने वसतिगृहातील सर्वच विद्यार्थी त्रासले आहेत. या गोष्टींची लेखी तक्रार वेळोवेळी सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. हे वसतिगृह मुलांचे असल्याने याठिकाणी पुरुष गृहपाल नेमण्यात यावा, नरहरे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अन्यथा वसतिगृहातील सर्व ६० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा दिवसांनंतर आमरण उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर ४० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या