शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

कोकणातील ऐतिहासिक बंदरांना गतवैभव पुनर्प्राप्तीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:32 IST

अलिबाग : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच रायगड जिल्ह्यातील बंदरातून जलवाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

जयंत धुळप अलिबाग : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच रायगड जिल्ह्यातील बंदरातून जलवाहतूक सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. कोकणात जलवाहतुकीला संजीवनी मिळावी यासाठी केंद्रात प्रस्ताव देखील सादर केला असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. वसई-कल्याण-ठाणे-धरमतर, रेवदंडा-रोहे आणि जयगड-मुसाकाजी-विजयदुर्ग-देवगड-मालवण असे हे तीन प्रस्तावित जलमार्ग आहेत. या जलवाहतुकीमुळे कोकणातील प्रवाशांना भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने दिवाळीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मुंबई (भाऊचा धक्का)-दिघी-दाभोळ अशी प्रवासी जलवाहतूक करून ती कायमस्वरूपी सुरू ठेवण्याकरिता नियोजन करण्यात येत आहे. सागरी प्रवासी वाहतुकीमुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ताण कमी होवू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.कोकणातील सागरी वाहतुक ीचा इतिहास देदीप्यमान असाच आहे. इ.स.पूर्व ५०० ते इ.स.२५० पर्यंत चौल, महाड, राजपुरी या बंदरांमधून पर्शिया, ग्रीस, अरेबिया, येमेन आणि इजिप्तबरोबर आयात- निर्यात व्यापार होत असे. परदेशी व्यापाराबरोबर चौल, महाड, मांदाड, राजपुरी व गोरेगाव (तत्कालीन घोडेगाव) ही बंदरे सह्याद्रीच्या पूर्वेकडील जुन्नर, नाशिक व पैठणसारख्या व्यापारी केंद्रांशी बोरघाट, देवस्थळी, कुंभा व शेवट्या घाट मार्गांनी जोडलेली होती. प्राचीन उत्तर कोकणात बंदरांच्या सान्निध्यात असलेल्या व्यापारी केंद्रांजवळ बौद्ध धर्मीयांच्या त्यावेळी वसाहती होत्या. कुडे, पाले, कोल, चौलजवळील बौद्ध लेण्यांवरून दिसून येते. या बंदरांव्यतिरिक्त म्हसळा आणि अंतोरे ही बंदरे सुद्धा तत्कालीन आयात-निर्यात व्यापाराकरिता प्रसिध्द होती.टॉलेमी, पेरिप्सल, स्ट्रॅबो आणि प्लिनी या सागरी प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या माहितीनुसार चौल, मांदाड, महाड(पाले), राजपुरी ,गोरेगाव बंदरातून इजिप्त, अरेबिया, पर्शिया, आमोन आणि रोमन साम्राज्याशी त्याकाळी मोठा व्यापार चालत असे. सातवाहन कालीन ‘गाथा सप्तशती’ काव्यसंग्रहात (पहिले-दुसरे शतक) शिडांच्या जहाजांचे वर्णन तत्कालीन सागरी व्यापार व नाविक हालचालींचा पुरावा मानला जातो. अरब प्रवासी लेखक अल मसुदी (९१५), अबू झैद (९१६), सुलेमान (८१५) व इबन हौकल (९४३-९६८) यांनी कोकणातील व्यापाराबद्दल खूप लिहिले आहे. विजयनगरच्या राजाकडे हा प्रदेश असताना सुद्धा चौल महत्त्वाचे बंदर होते. पुढे बहमनींची राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्याला स्थलांतरित झाल्यावर चौलचा व्यापार राजापूर, दाभोळ व चिपळूणकडे वळला. तथापि चौलचे महत्त्व मात्र अबाधित राहिले. ठाणे व तत्कालीन कुलाबा जिल्ह्यांचा भाग गुजरातच्या सुलतानाकडे गेल्यावर मात्र चौलचे महत्त्व घटले. १५०९ मध्ये चौल व नागोठणे बंदरे पोर्तुगीजांकडे आल्यावर चौल बंदराचा पुन्हा भाग्योदय झाला. पोर्तुगीजांनी चौल वगळता सर्व बंदरांचा विध्वंस केला. चौलचे मात्र संरक्षण केले. तेथील व्यापार वाढविला. इ.स.१७४० मध्ये एका तहानुसार पोर्तुगीजांनी चौल इंग्रजांच्या तर १७४१ मध्ये इंग्रजांनी ते मराठ्यांच्या स्वाधीन केल्याची नोंद शासकीय दस्तात उपलब्ध आहे.१३ बंदरे होती व्यापारी बंदरेइ.स.१८८३ मध्ये जिल्ह्यातील १३ बंदरांच्या सीमाशुल्कासाठी अलिबाग, साक्षी (पेण), राजापुरी-मांदाड आणि बाणकोट अशा चार बंदर समूहात विभाजन होते. अलिबाग समूहात अलिबाग, थळ, रेवदंडा, मांडवा, रेवस आणि धरमतर या सात बंदरांचा समावेश होता. साक्षी (पेण) बंदर समूहात अंतोरा आणि नागोठणे बंदराचा समावेश होता. राजपुरी विभागात मांदाड हे एकमेव बंदर होते. सीमाशुल्कासाठी हे बंदर तळखाडी वा तळ या नावाने ओळखले जात असे. बाणकोट विभागात म्हाप्रळ आणि रत्नागिरीतील इतर बंदरांचा समावेश होता. याशिवाय बाणकोट विभागात महाड(सावित्री), गोरेगाव (तत्कालीन घोडेगाव) आणि दासगाव या तीन बंदरांमध्ये होणाºया व्यापाराचा अंतर्भाव होत असे.जलमार्ग हेच प्रवासी व मालवाहतुकीचे मुख्य साधनमुंबई-पुणे लोहमार्ग होईपर्यंत जलमार्ग हेच प्रवासी व मालवाहतुकीचे मुख्य साधन होते. मुंबई-रेवस, धरमतर-रेवस-मुंबई, मांडवा-मुंबई, धरमतर-नागोठणे, पनवेल-उलवा-मुंबई हे जलवाहतुकीचे प्रमुख मार्ग होते.पोर्तुगीजांच्या आगमनापर्यंत रेवदंडा हे महत्त्वाचे बंदर होते. कालांतराने हे बंदर गाळाने भरल्यामुळे त्याचा उपयोग व्यापारी बंदर म्हणून करणे बंद झाले. धरमतर धक्का १८६८ मध्ये १६ हजार ५३० रुपये खर्चून बांधण्यात आला.पूर्वी जिल्ह्यातील जलवाहतूक प्रामुख्याने गलबताने होई. अलिबाग बंदरात पडाव आणि लहान बोटी बांधल्या जात असत. अलिबाग बंदरातील बोटी रत्नागिरी व राजापूरचे सुतार बांधत असत. आता धरमतर हे मोठे व्यापारी बंदर झाले आहे.इ.स.१८८०-८१ मधील कुलाबा सीमाशुल्क विभागातील बोटींची ऐतिहासिक वाहतूकसीमाशुल्क विभाग भरलेली आलेली गलबते रिकामी आलेली गलबतेसंख्या टन संख्या टनराजपुरी १०९ ७४६ ६११ ६,९४६अलिबाग १४५३ ९,३५० २,२०६ १७,०८५साक्षी (पेण) १,७१३ १३,५१६ २,८४८ २५,१२७एकूण ३,२७५ २३,६१२ ५,६६५ ४९,१५८सीमाशुल्क विभाग भरलेली गेलेली गलबते रिकामी गेलेली गलबतेसंख्या टन संख्या टनराजपूर ६९७ ७,३९० २० ११४अलिबाग २,६६९ १९,८०६ ८८३ ५,५५२साक्षी (पेण) ३.९८७ ३५,६२३ ५२१ २,६२७एकूण ७,३५३ ६२,८१९ १४२४ ८२९३