शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
3
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
4
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
5
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
6
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
7
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
8
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
9
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
10
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
11
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
12
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
13
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
14
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
15
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
16
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
17
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
18
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
19
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
20
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स

ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:08 IST

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांना आहे.

संजय करडेमुरुड : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांना आहे. गड-किल्ल्यांचा रोमांचकारी इतिहास, कथा-कादंबऱ्यापेक्षा प्रत्यक्षस्थळ दर्शनाने इत्थंभूत उभा राहतो. ‘ज्याची आरमारावर सत्ता त्याची जगावर सत्ता’ ही धारणा दस्तुरखुद्य छत्रपती शिवरायांची होती. या दृष्टिकोनातून महाराजांनी महाराष्ट्राच्या पाश्चिम किनारपट्टीवर पाच प्रमुख जलदुर्ग उभे केले, त्यामध्ये मुरुडच्या पद्मदुर्गचा समावेश आहे. मात्र, इतिहासाची साक्ष देणाºया या किल्ल्याची दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. याकडे पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष होत असून, शिवभक्त, पर्यटक आणि स्थानिक नाराजी व्यक्त करतआहेत.ऐतिहासिक दस्तावेजानुसार इ.स. १६७८ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाच्या बांधकामास सुरुवात केली तर बांधकामाची समाप्ती राजे संभाजींनी केली, असा उल्लेख आढळतो. सिद्दीच्या ताब्यात असलेला जंजिरा महाराजांना १४/१५ वर्षे जंग पछाडूनही सर करता आला नाही, म्हणूनच अभेद्द आणि बेलाग अंजिक्य जंजिºयावर करडी नजर ठेवण्यासाठी पद्मदुर्गची निर्मिती अर्थात दंडा राजपुरीच्या उरावर टेहळणी होती. दर्यासारंग दौलतखान या पहाडी छातीच्या आरमार प्रमुखांवर भिस्त होती. असा ऐतिहासिक दृश्यरंजक असलेला किल्ला आज कसाबसा तग धरून आहे. किल्ल्यावर पोहोचल्यावर आपणास किल्ल्याची खरी परिस्थिती समजते. या किल्ल्याच्या भिंती पडल्या आहेत. तसेच गवत व झाडी-झुडपे बेसुमार वाढली आहेत. या किल्ल्यात गोड्या पाण्याचा एक तलाव आहे; परंतु ते आटले आहेत. या तलावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष के ल्याचे येथील परिस्थितीवरून दिसून येते.समुद्राच्या जवळ असणाºया किल्ल्याच्या भिंती तुटून पडल्या आहेत; परंतु दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही. बहुतांशी भिंतींना चिरा व भेगा पडल्या असून याची वेळेत दुरुस्ती झाली तर या किल्ल्याचे अस्तित्व चिरकालाचे राहणार आहे; परंतु पुरातत्त्व खात्याकडून गेल्या अनेक वर्षांत कोणतेही पैसे खर्च न करण्यात आल्याने किल्ल्याची अवस्था चिंताजनक झाली आहे.या किल्ल्यात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे येथे तरंगती जेट्टी खूप आवश्यक आहे. कारण मशिनच्या बोटीने पोहोचल्यावर साध्या बोटींमधून या किल्ल्याच्या किनाºयावर पोहोचता येते. जर बोट उपलब्ध न झाल्यास कंबरेपेक्षा वर पाण्यातून किल्ला गाठावा लागतो, यासाठी या किल्ल्यावर तरंगती जेट्टी उपलब्ध झाल्यास किल्ल्यात जाणे-येणे सहज सोपे होऊन पर्यटक व स्थानिक नागरिकांची रेलचेल वाढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीकडे पुरातत्त्व खात्याने दुर्लक्ष केलीआहे.>किल्ल्याचा इतिहासऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर विजय मिळवता यावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याच्या अगदी समोर कासा (पद्मदुर्ग) किल्ल्याची उभारणी केली. चहूबाजूला समुद्र व समुद्राच्या अगदी मध्यभागी हा किल्ला असल्याने असंख्य पर्यटकांना याचे विशेष आकर्षण आहे; परंतु या किल्ल्याकडे सातत्यपूर्ण वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. जंजिरा किल्ला हा अगदी जवळ आहे, तर पद्मदुर्ग किल्ल्याचे जमिनीपासूनचे अंतर चार किलोमीटरचे असल्याने या किल्ल्यावर पोहोचताच आपण चहूबाजूनी वेढले गेल्याचा भास निर्माण होतो. या किल्ल्यावर जाण्यासाठी मशिनबोट असल्याशिवाय पर्याय नाही. किमान ४० मिनिटांच्या प्रवासानंतर या किल्ल्यावर पोहोचता येते.>तोफा गेल्या चोरीलाकिल्ल्यात जास्त वर्दळ नसल्याने येथील तोफा चोरून नेण्याचा प्रताप समोर आला आहे. दीड वर्षापूर्वी या किल्ल्यात असणारी तोफ चोरून नेण्यात आली होती. याबातची रीतसर तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुरातत्त्व खात्याचा कोणताही व्यक्ती किल्ल्यात हजर नसल्याने या किल्ल्यातील देखभालीकडे पुरातत्त्व खात्याचे मोठे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. जंजिरा किल्ल्यावर पुरातत्त्व खात्याने एक विशेष व्यक्ती तैनात केली आहे; परंतु पद्मदुर्ग किल्ल्यात कोणीही व्यक्ती हजर नसते.रायगड किल्ल्यासाठी २० कोटी रुपये शासनाचा निधी मिळतो; परंतु जलदुर्ग किल्ल्यासाठी कोणताही निधी न मिळाल्यामुळे हे किल्ले विकासापासून दूर आहेत. प्राचीन वस्तूचे महात्म्य टिकवणे हे पुरातत्त्व खात्याचे काम असतानासुद्धा ऐतिहासिक प्राचीन किल्ल्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे किल्ल्यावरील अवस्था पाहून लक्षात येते.>जंजिरा किल्ल्याप्रमाणे आम्हाला पद्मदुर्ग किल्ला पाहण्यास आवडेल; परंतु येथे जाण्या-येण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत. या ठिकाणी तरंगती जेट्टी खूप आवश्यक आहे, जर येथे सुविधा प्राप्त झाली तर आमच्यासारखे पर्यटक या किल्ल्यावरही जाण्यास उत्सुक आहेत.- प्रणय शृंगारपूर, पर्यटक, नाशिक