शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

पाली शहरातील ऐतिहासिक हटाळेश्वर तलाव दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:29 IST

ऐतिहासिक वारसा असलेल्या पाली शहरातील तलावांना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कचराभूमीचे स्वरूप प्राप्त आले आहे.

विनोद भोईर पाली : ऐतिहासिक वारसा असलेल्या पाली शहरातील तलावांना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कचराभूमीचे स्वरूप प्राप्त आले आहे. हटाळेश्वर तलावांचा परिसर अस्वच्छ झाला आहे. अतिक्रमण, कचरा व सांडपाण्यामुळे तलावांचा श्वास गुदमरत आहे, यामुळे तलाव प्रदूषणमुक्त होणे गरजेचे आहे.काही वर्षांपूर्वी पाली शहरातील रहिवाशांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून तलावांकडे पाहिले जात असे. मात्र, सध्या या तलावांची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाली शहरात हटाळेश्वर तलावाची तेथील परिसरातील नागरिकांनी अक्षरश: कचराकुंडी केली आहे. ग्रामपंचायतीची कचऱ्याची गाडी घरापर्यंत येत असतानाही तेथील नागरिक कचरा तलावात टाकत आहेत. तर काही नागरिकांनी संडासाच्या पाइपलाइन तलावात सोडल्या आहेत.याकडे पाली ग्रामपंचायत लक्ष का देत नाही? आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून केला आहे. शहरीकरणामुळे तलावांची संख्या कमी होत असून सध्या अस्तित्वात असलेल्या तलावांची ही पुरती दुरवस्था झाली आहे. यासाठी ग्रामपंचायतीने शहरातील तलावांचे सुशोभीकरण करावे, असे पाली शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे.तसेच शहरातील प्रत्येक तलावाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. हे तलाव वाचवण्यासाठी पाली शहरातील लोकांनी जनजागृती केली पाहिजे. अनेक तलावांमध्ये कचºयाचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत असून, शहरातील तलावांच्या आजूबाजूच्या रहिवाशांनी कचरा टाकू नये. अनेक वर्षे या तलावाकडे लक्ष दिले नसल्यामुळे तलावांमध्ये दलदल तयार झाली आहे आणि या दलदलीवर मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे.तलावाची झाली कचराकुं डीपाण्याचा मुख्य स्रोत म्हणून ज्या तलावाकडे पाहिले जात असे; त्या तलावाची लोकांनी कचराकुंडी केली आहे.या तलावांतील गाळ काढला तर त्यातील पाण्याचा उन्हाळ्यात रहिवाशांना वापर करता येऊ शकतो, प्रत्येक तलावाकाठच्या बाजूंनी कचरा दिसत असून त्याच कचºयावर अजून कचरा टाकला जात आहे. अशाप्रकारे कचºयाचे ढीग रचत आहेत.लवकरात लवकर या तलावांचे सुशोभीकरण करावे, जेणेकरून शरतील नागरिकांना जॉगिंग ट्रॅक, गार्डन, बालोद्यान उपलब्ध होईल, अशी मागणी नागरिकांकडून के ली जात आहे.>पाली शहरात मध्यवती ठिकाणी हटाळेश्वर तलाव आहे. गेली अनेक वर्षे तलावाचे सुशोभीकरण केले नाही, त्यामुळे तलाव घनकचºयाने पूर्णत: भरला आहे.- वसंत दंत,व्यापारी