शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार हायटेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 23:45 IST

महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी मोबाइल देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

अलिबाग : महिला व बालकल्याण विभागामार्फत राज्यातील अंगणवाडी सेविकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी मोबाइल देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. त्याचा फायदा रायगड जिल्ह्यातील तीन हजार २०० अंगणवाड्यांना होणार आहे. हे मोबाइल लवकरच अंगणवाडी सेविकांच्या हातात दिसणार आहेत. त्यामुळे तेथील अंगणवाड्या आणि सेविकांचा कारभार हायटेक होणार आहे, असे रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ८ मार्च ते २२ मार्च या कालावाधीत पोषण अभियान कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.रायगड जिल्ह्यात सुमारे एक लाख ४० हजार बालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १३ अतिकुपोषित आणि ७६ कमी प्रमाणात कुपोषित बालके सापडली आहेत. हा आकडा तीन अंकीवरुन दोन अंकावर आला आहे. सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवून जिल्ह्यातील कुपोषण हद्दपार करण्यात येईल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्तकेला.पोषण आहाराविषयी जनजागृती होऊन बालकांमधील कुपोषणाची समस्या दूर होण्यासाठी ८ ते २२ मार्च या कालावधीत महिला बालविकास विभागाच्या वतीने पोषण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.>महिन्याला ५०० रुपयांचा रिचार्ज : जिल्ह्यातील तीन हजार २०० अंगणवाड्यांना मोबाइलचे वाटप करण्यात येणार आहे. एका कंपनीचा आठ हजार ७०० रुपये किमतीच्या मोबाइल आहे. तसेच महिन्याला सरकारकडूनच ५०० रुपयांचा रिचार्ज करुन मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांना सरकारी कामे करावी लागतात ती सर्व दैनंदिन कामे आता मोबाइलवर करता येणार आहेत. बालकांच्या शारीरिक नोंदी, (उंची, वजन आदी) ही सर्व कामे आॅनलाइन होणार.>रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबवणार पोषण अभियान कार्यक्रम८ मार्च रोजी पोषण जत्रा, जनजागृतीसाठी पत्रकार परिषद आयोजित करु न माध्यमांना माहिती देणे, शनिवार ९ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीस्तरावर बैठका घेणे, १० रोजी सायकल रॅली,११ रोजी प्रत्येक शाळा स्तरावर अ‍ॅनिमिया चाचणी शिबिरांचे आयोजन, मंगळवारी १२ मार्च रोजी पोषण जनजागृतीसाठी किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती अभियान, बुधवारी १३ रोजी सायकल रॅली, १४ मार्च रोजी युवा गट बैठक व पोषण फेरी, शुक्र वारी किशोरावस्थेतील मुलींसाठी जागृती मोहीम, १६ मार्चला शेतकरी क्लब बैठक, बाजार उपक्र म, १७ रोजी पोषण वॉक, सोमवारी १८ मार्चला युवा वर्ग बैठक व शालेय स्तरावर कार्यक्र म, मंगळवार १९ रोजी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व जनजागृती, २० मार्च रोजी अ‍ॅनिमिया शिबिर, गुरु वारी २१ रोजी सायकल रॅली आणि शुक्र वारी २२ मार्चला पंचायत समितीस्तरावर आढावा घेण्यात येणार आहे. या शिवाय राज्यस्तरीय नियोजनानुसार, गृहभेटी, एसएचजी मीटिंग्स, मास मीडिया मोहीम, नुक्कड नाटक आणि सामुदायिक रेडिओ, सोशल मीडिया कॅम्पेन आदी उपक्र म राबविण्यात येणार आहेत.