शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘हागणदारीमुक्त’ आलेख घसरला

By admin | Updated: October 5, 2015 23:58 IST

हागणदारीमुक्तीच्या गमजा मारणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेचा आलेख खाली सरकला आहे. ८२४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायती जून महिन्यात हागणदारीमुक्त झाल्या होत्या.

- आविष्कार देसाई,  अलिबागहागणदारीमुक्तीच्या गमजा मारणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेचा आलेख खाली सरकला आहे. ८२४ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायती जून महिन्यात हागणदारीमुक्त झाल्या होत्या. आज आॅक्टोबर अखेर तीन महिन्यांच्या कालावधीत केवळ ६२ ग्रामपंचायतींनी तो पल्ला गाठला आहे. २०१९ पर्यंत हागणदारीमुक्तीचे बिरुद मिरविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना झोकून देऊन काम करावे लागणार असल्याचे चित्र आहे.२०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील ८२४ ग्रामपंचायती या हागणदारीमुक्त करण्याचा रायगड जिल्हा परिषदेचा संकल्प आहे. सरकारने दिलेले लक्ष पेलण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र ग्रामपंचायतींकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य होत नसल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतीमधील तलाठी, ग्रामसेवक यांनी याकामी स्वत:ला झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. मार्च २०१६ पर्यंत २९८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष असून येत्या पाच महिन्यात हे उद्दिष्ट गाठण्याचा खडतर प्रवास ग्रामपंचायतींना करावा लागणार आहे. जून महिन्यात ४७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या होत्या. त्यानंतर पुढील तीन महिन्यात ५ आॅक्टोबरपर्यंत तो आकडा फक्त १५ ने वाढून ६२ वर पोचला. महाड तालुक्यातील १३४ पैकी १६ ग्रामपंचायती या हागणदारी मुक्त करीत महाडने टॉप फाईव्हच्या यादीच प्रथम स्थान पटाकावले आहे.हागणदारीमुक्त करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक यांच्याबरोबरीनेच लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा आहे. तो प्राप्त व्हावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. दिलेल्या उद्दिष्टाची पूर्ती करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.-पुंडलिक साळुंंखे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी तालुकाग्रामपंचायतीहागणदारीमुक्तमहाड १३४ १६ म्हसळा ४० १५ श्रीवर्धन ४३ १० उरण ३४ ०५पनवेल ५१ ०५ कर्जत ५० ०२पोलादपूर ४३ ०२रोहे ६४ ०२अलिबाग ६२ ०१खालापूर ४२ ०१माणगाव ७४ ०१पेण ६३ ०१तळा २६ ०१मुरुड २४ ००सुधागड ३४ ००पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या ग्रामपंचायती या दक्षिण रायगडमधील आहेत. उरण, पनवेल, पेण, अलिबाग, कर्जत, रोहे तालुक्यांना अर्बन टच आहे. त्या ग्रामपंचायतींचे काम मात्र तुलनेने कमी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होेते.