शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 12:16 AM

१८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून २२ आगॅस्टपर्यंतचे आदेश

- निखिल म्हात्रे अलिबाग : बाप्पाचे आगमन आता काही दिवसांवर येऊ ठेपले आहे. येत्या २२ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई येथून हजारो गणेशभक्त त्यांच्या वाहनांनी मोठ्या प्रमाणावर कोकणात आपल्या गावी दाखल होणार आहेत. त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरिक्षत व्हावा, याकरिता मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश १४ आॅगस्ट रोजी जारी के ले.कोकणात गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढते. मुंबई-गोवा-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता महाराष्ट्र शासनाकडून केलेल्या आदेशाप्रमाणे रायगड पोलिसांकडून अवजड वाहन बंदी आदेश जारी केले आहेत.या आदेशानुसार, १८ आॅगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीस पूर्ण वेळ बंदी राहणार आहे. तर गौरी-गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी २८ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २९ आॅगस्ट रोजी सकाळी वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहतूक पूर्णवेळ बंद राहील. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासून ते २ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाची वाहतूक दिवसा बंद राहील, तर रात्री सुरू राहणार आहे. १८ आॅगस्ट रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते २ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाळू, रेती व तत्सम गौणखनिज वाहतुकीस पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे.