शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

रायगड, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ४२ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:37 IST

गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून, हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये गरमी वाढल्याची अनुभूती येत आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून, हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये गरमी वाढल्याची अनुभूती येत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ४२ अंशावर पोचल्याने येणाºया कालावधीत उन्हाचा तडाखा चांगलाच बसणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहेत. येत्या ४८ तासांमध्ये रायगड, ठाणे, ग्रेटर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अहवालवजा इशारा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले आहे.भारतीय हवामान खात्याने २८ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अहवालामध्ये हवामानात बदल होऊन तापमानात कमालीची वाढ होऊन येत्या ४८ तासांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अहवाल वजा इशारा जिल्ह्यातील प्रमुख विभाग, विविध कंपन्या यांना दिला. त्या अहवालाची प्रत दुपारनंतर सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत होती. या अहवालाच्या सत्यतेबाबत रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सागर पाठक यांच्याकडे विचारणा केली, असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये रायगड, ठाणे, ग्रेटर मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे दुपारच्या कालावधीत कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, तसेच उन्हापासून संरक्षण होणाºया साधनांचा वापर करावा, भरपूर पाणी पिण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थंडीचा कडाका अनुभवता येत होता. त्यामुळे थंडीचा मुक्काम अजून काही दिवस तरी लांबणार असे दिसत होते. मात्र, अचानक मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात उष्णता वाढल्याचे जाणवू लागले. गेल्या २४ तासांतील तापमानाची नोंद घेतली असता ती तब्बल ४२ अंश सेल्सियस एवढी आढळली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत उन्हाचा तडाखा हा चांगलाच बसणार असल्याचे संकेत आधीच दिले आहेत.गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाेच्च ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती पाठक यांनी दिली. आगामी कालावधीत गरमी वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.-भिरा येथील टाटा पॉवर हाऊसच्या परिसरामध्ये हवामान विभागाचे हवामान केंद्र आहे. त्या ठिकाणी दैनंदिन तापमानाची नोंद घेतली जाते.-हवामान खात्याने उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व आणि पश्चिम वर्धा विभागाच्या संबंधित अधिका-यांना अहवाल वजा इशारा जारी केला आहे. तसेच याबाबतची नोंद घ्यावी असे एक प्रकारे सूचित केल्याचे दिसून येते.-सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अहवालामुळे भीती आणि घबराट पसरवणाºया अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु कोणीही पॅनिक होण्याची गरज नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. तसेच कृपया अफवा पसरवू नका आणि त्या अफवांनाही बळी पडू नका असे, आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRaigadरायगड