शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

रायगड, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट ; मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ४२ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:37 IST

गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून, हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये गरमी वाढल्याची अनुभूती येत आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला असून, हळूहळू उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे वातावरणामध्ये गरमी वाढल्याची अनुभूती येत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा ४२ अंशावर पोचल्याने येणाºया कालावधीत उन्हाचा तडाखा चांगलाच बसणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहेत. येत्या ४८ तासांमध्ये रायगड, ठाणे, ग्रेटर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा भारतीय हवामान खात्याचा अहवालवजा इशारा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले आहे.भारतीय हवामान खात्याने २८ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या अहवालामध्ये हवामानात बदल होऊन तापमानात कमालीची वाढ होऊन येत्या ४८ तासांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अहवाल वजा इशारा जिल्ह्यातील प्रमुख विभाग, विविध कंपन्या यांना दिला. त्या अहवालाची प्रत दुपारनंतर सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत होती. या अहवालाच्या सत्यतेबाबत रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सागर पाठक यांच्याकडे विचारणा केली, असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये रायगड, ठाणे, ग्रेटर मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे दुपारच्या कालावधीत कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये, तसेच उन्हापासून संरक्षण होणाºया साधनांचा वापर करावा, भरपूर पाणी पिण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थंडीचा कडाका अनुभवता येत होता. त्यामुळे थंडीचा मुक्काम अजून काही दिवस तरी लांबणार असे दिसत होते. मात्र, अचानक मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात उष्णता वाढल्याचे जाणवू लागले. गेल्या २४ तासांतील तापमानाची नोंद घेतली असता ती तब्बल ४२ अंश सेल्सियस एवढी आढळली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत उन्हाचा तडाखा हा चांगलाच बसणार असल्याचे संकेत आधीच दिले आहेत.गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाेच्च ४७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती, अशी माहिती पाठक यांनी दिली. आगामी कालावधीत गरमी वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.-भिरा येथील टाटा पॉवर हाऊसच्या परिसरामध्ये हवामान विभागाचे हवामान केंद्र आहे. त्या ठिकाणी दैनंदिन तापमानाची नोंद घेतली जाते.-हवामान खात्याने उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व आणि पश्चिम वर्धा विभागाच्या संबंधित अधिका-यांना अहवाल वजा इशारा जारी केला आहे. तसेच याबाबतची नोंद घ्यावी असे एक प्रकारे सूचित केल्याचे दिसून येते.-सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अहवालामुळे भीती आणि घबराट पसरवणाºया अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु कोणीही पॅनिक होण्याची गरज नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. तसेच कृपया अफवा पसरवू नका आणि त्या अफवांनाही बळी पडू नका असे, आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :TemperatureतापमानRaigadरायगड