शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद चिकित्सा गरजेची - श्रीपाद नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:05 IST

सुधागड येथे कार्यक्रम : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन

राबगाव/पाली : महर्षी चरकमुनींनी चरक संहितेची स्थापना केली आहे. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते. आयुर्वेदात मुख्यत: वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. निरोगी जीवन जगण्यासाठी मूळ आयुर्वेद चिकित्सा आपण अंगीकारली पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

सुधागड तालुक्यात जांभूळपाडा सारख्या ग्रामीण भागात महेश अभ्यंकर यांनी आयुर्वेदिक उत्पादन करण्याचे धाडस केले हे कौतुकास्पद असून यापुढील लागणारे सहकार्य शासनाच्या वतीने केले जाईल, असे आश्वासन देऊन नवीन कंपनीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जांभूळपाडा येथे कंपनीचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले.सोहळ्यासाठी आमदार धैर्यशील पाटील, कार्ला येथील आत्मसंतुलन संस्थेच्या सीईओ निरादा गौमन, वरसई सुप्रसिद्ध अनतानंद औषधालयचे संस्थापक विनय भावे यांच्या पत्नी विद्या भावे, वैद्य सुधीर रानडे, वैद्यराज भाऊ सुळे, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, सुधागड पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे, सरपंच श्रद्धा कानडे, उपसरपंच राजेश शिंगाड आदी उपस्थित होते.

नाईक म्हणाले, आयुर्वेदाची पद्धतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्वतंत्र स्थापना करून शासनाने ही प्राचीन परंपरा अबाधित राखली. गेल्या चार वर्षांत आयुष मंत्रालय तर्फे झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. १२ राष्ट्रांमध्ये आपली एमओव्ही झाली असून आयुर्वेदात तथ्य आहे म्हणून यांचे संशोधक भारताबरोबर संशोधनासाठी काम करत आहे. परदेशातील दहा विद्यापीठांमध्ये भारतीय प्राध्यापक आयुर्वेद पद्धती शिकविण्यासाठी जात आहेत.

भारतात दोन वर्षांपूर्वी कॅन्सर आजारावर कॉन्फरन्स घेतली होती त्यात अमेरिकेतील १५ डॉक्टरांची टीम आली होती. प्रत्येक राज्यात एक आयुर्वेद संस्था आणि प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेद चिकित्सालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून १०० ठिकाणी याच्या मान्यता देऊन काम सुरू झाल्याची माहिती नाईक यांनी दिली.

 

टॅग्स :RaigadरायगडHealthआरोग्य