शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
3
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
4
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
5
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
6
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
7
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
8
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
9
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
10
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
11
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
12
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
13
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
14
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
15
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
16
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
17
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
18
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
19
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
Daily Top 2Weekly Top 5

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद चिकित्सा गरजेची - श्रीपाद नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:05 IST

सुधागड येथे कार्यक्रम : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचे प्रतिपादन

राबगाव/पाली : महर्षी चरकमुनींनी चरक संहितेची स्थापना केली आहे. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते. आयुर्वेदात मुख्यत: वनस्पती व त्यांचे वेगवेगळे भाग, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. निरोगी जीवन जगण्यासाठी मूळ आयुर्वेद चिकित्सा आपण अंगीकारली पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

सुधागड तालुक्यात जांभूळपाडा सारख्या ग्रामीण भागात महेश अभ्यंकर यांनी आयुर्वेदिक उत्पादन करण्याचे धाडस केले हे कौतुकास्पद असून यापुढील लागणारे सहकार्य शासनाच्या वतीने केले जाईल, असे आश्वासन देऊन नवीन कंपनीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जांभूळपाडा येथे कंपनीचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले.सोहळ्यासाठी आमदार धैर्यशील पाटील, कार्ला येथील आत्मसंतुलन संस्थेच्या सीईओ निरादा गौमन, वरसई सुप्रसिद्ध अनतानंद औषधालयचे संस्थापक विनय भावे यांच्या पत्नी विद्या भावे, वैद्य सुधीर रानडे, वैद्यराज भाऊ सुळे, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, सुधागड पंचायत समितीच्या सभापती साक्षी दिघे, सरपंच श्रद्धा कानडे, उपसरपंच राजेश शिंगाड आदी उपस्थित होते.

नाईक म्हणाले, आयुर्वेदाची पद्धतीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्वतंत्र स्थापना करून शासनाने ही प्राचीन परंपरा अबाधित राखली. गेल्या चार वर्षांत आयुष मंत्रालय तर्फे झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. १२ राष्ट्रांमध्ये आपली एमओव्ही झाली असून आयुर्वेदात तथ्य आहे म्हणून यांचे संशोधक भारताबरोबर संशोधनासाठी काम करत आहे. परदेशातील दहा विद्यापीठांमध्ये भारतीय प्राध्यापक आयुर्वेद पद्धती शिकविण्यासाठी जात आहेत.

भारतात दोन वर्षांपूर्वी कॅन्सर आजारावर कॉन्फरन्स घेतली होती त्यात अमेरिकेतील १५ डॉक्टरांची टीम आली होती. प्रत्येक राज्यात एक आयुर्वेद संस्था आणि प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेद चिकित्सालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून १०० ठिकाणी याच्या मान्यता देऊन काम सुरू झाल्याची माहिती नाईक यांनी दिली.

 

टॅग्स :RaigadरायगडHealthआरोग्य