शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

वीटभट्ट्यांच्या धुरामुळे आरोग्याला धोका

By admin | Updated: March 5, 2017 02:59 IST

वीट ही बांधकाम व्यवसायातील अविभाज्य भाग आहे. सध्या रायगड जिल्ह्यात अनेक सरकारी व खासगी प्रकल्प विकसित होत आहेत. बांधकाम व्यवसायासाठी आवश्यक

दासगाव : वीट ही बांधकाम व्यवसायातील अविभाज्य भाग आहे. सध्या रायगड जिल्ह्यात अनेक सरकारी व खासगी प्रकल्प विकसित होत आहेत. बांधकाम व्यवसायासाठी आवश्यक विटेची मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या लावल्या जातात. महसूल विभागाचे नियम धाब्यावर बसवून तयार करण्यात आलेल्या या वीटभट्ट्या येथील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक ठरत आहेत. महसूल विभागाने घालून दिलेल्या नियमावलीची राजरोसपणे पायमल्ली होत असताना महसूल विभागाकडूनच याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.बांधकाम व्यवसायामध्ये खूप झपाट्याने प्रगती होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान बांधकामासाठी वापरले जात आहे. त्याचप्रमाणे बांधकामातील महत्त्वाचा घटक असलेली वीटदेखील वेगळ्या आकारात नवीन तंत्रात उपलब्ध होत आहेत. औद्योगिक वसाहतीतून निघणारे फल्यहॅश, जिप्सम तसेच सिमेंट क ाँक्रीटच्या विटा बाजारात उपलब्ध आहेत. तरीदेखील पारंपरिक पद्धतीने बनविण्यात येणाऱ्या विटेला मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि व्यावसायिकांची पसंती आहे. शेतातील माती, भाताचा कोंडा खळ्यामध्ये कुजवून या विटेची बांधणी केली जाते. पुढे भट्टीमध्ये तापवून मातीची ही वीट पक्की केली जाते. या भट्टीसाठी जळाऊ लाकूड, दगडी कोळसा, भाताचा कोंडा आदींचा वापर केला जातो. विटांची ही भट्टी १० ते १५ दिवस जळती ठेवली जाते.वीट पक्की करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या या भट्टीमध्ये दगडी कोळसा, जळाऊ लाकूड आणि कोंडा यांचा वापर केला जातो. हे तिन्ही घटक जळत असताना मोठ्या प्रमाणात धूर निर्माण करतात. यावेळी निर्माण होणारी राख धुरासोबत परिसरात पसरत असते. यामुळे वीटभट्टीच्या शेजारच्या परिसरात आरोग्यास घातक असे वातावरण तयार होते. ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करता शासनाने वीटभट्ट्यासाठी कडक नियमावली बनवल्या आहेत. त्यामध्ये वीटभट्टीचे रस्त्यापासून अंतर, रहिवासी वस्तीपासूनचे अंतर याचा विशेष उल्लेख आहे. वीटभट्टीला परवानगी देताना वीटभट्टी मालकाला या नियमावलीची समज महसूल विभागामार्फत दिली जाते. नियम चुकवल्यास दाखल होणारा गुन्हा आणि दंड याची देखील माहिती दिली जाते. मात्र, केवळ व्यावसायिक विचार करणारे हे वीट व्यावसायिक ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार न करता मुख्य रस्ता आणि रहिवासी भागातच वीटभट्ट्या उभारत आहेत. यामुळे रहिवासी भागात वीटभट्ट्याच्या धुराचा त्रास होतोच, तर वीटभट्टी तयार झाल्यानंतर अगर वीटभट्टी खुली करताना यातील राख वाऱ्यासोबत उडून ग्रामस्थ आणि रस्त्यावरील प्रवाशांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. (वार्ताहर)वीटभट्टीसाठीचे नियमही धाब्यावरमहाड तालुक्यात शेकडो शेकडो वीटभट्ट्या सुरू असून, धुराने संपूर्ण महाड तालुका ग्रासला आहे. सकाळच्या वेळी या धूर आणि धुक्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रात होतो. मात्र, चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या भट्ट्यांवर महसूल विभागामार्फत कारवाई करताना नरमाईचे धोरण स्वीकारले जात असल्याने या व्यावसायिकांचे फावले आहे.वीटभट्टीच्या होणाऱ्या धुरामुळे खोकला, दमा, डोळ्यात जळजळ होणे, दृष्टी कमी होणे असे अनेक आजार मनुष्याला उद्भवू शकतात. - डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, महाड