शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

महामार्गावर धुळीने प्रवासी हैराण; मुंबई-गोवा महामार्ग व पेण-खोपोली महामार्गाचे रुंदीकरणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:13 IST

उपाययोजना करण्याची मागणी

पेण : शहरालगत पेण रेल्वे स्थानक ते रामवाडी परिसरात महामार्ग रुंदीकरण कामासाठी मातीच्या भरावाचे काम वेगाने सुरू आहे. या मातीचा धुरळा या मार्गावरील प्रवासी वाहने, अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे अधिक तीव्रतेने उडत आहे. सध्या वाहणारे जोरदार वारे व वाहनांच्या वेगामुळे धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे पाठीमागच्या प्रवासी वाहनांमधील प्रवासी, वाहनचालकांच्या नाका, तोंडात धुळ जात असल्याने आजाराला निमंत्रण मिळत आहे. सकाळ व संध्याकाळी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, प्रवाशी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे येथून प्रवास करणाºया नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

उडणाऱ्या धुळीने त्रस्त अनेकांना श्वसनाचे आजार, दमा, खोकला, सर्दी या विकारांनी ग्रासले आहे. गेल्या महिनाभरात या समस्येला तोंड देता-देता प्रवाशांना नाकी नऊ आले आहे. महामार्गाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीला पाणी मारण्यासाठी वेळ नाही. मात्र, ठेकेदार कंपनीच्या या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक व प्रवाशांना नाहक सहन करावा लागत आहे.

झाडे तोडल्याने रस्ता उजाड

मुंबई- गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या कामाबरोबरच पेण- खोपोली रुंदीकरणाच्या कामासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला मातीच्या भरावाचे सपाटीकरण सुरू आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडून रस्ता उजाड केला आहे.माती भरावामुळे या परिसरात दिवसभर उडणाºया धुळीमुळे प्रवासी, वाहनचालक, स्थानिक नागरिक त्रासले आहेत. या धुळीचे लोट वाऱ्यांबरोबर या परिसरातील पिके, फळझाडे व महामार्गानजीक असलेल्या लोकवस्तीमध्ये उडत असल्याने या सर्वांना या समस्येला तोंड द्यावे लागते आहे. आजारी रुग्णांना याचा अधिक त्रास होतो.

उडणाºया धुळीने त्रस्त अनेकांना श्वसनाचे आजार, दमा, खोकला, सर्दी या विकारांनी ग्रासले आहे. गेल्या महिनाभरात या समस्येला तोंड देता-देता प्रवाशांना नाकी नऊ आले आहे. महामार्गाचे काम करणाºया ठेकेदार कंपनीला पाणी मारण्यासाठी वेळ नाही.

माती भरावाचे काम सुरू

1. मुंबई-गोवा, पेण-खोपोली या दोन्ही महामार्ग रुंदीकरणाचे माती भरावाचे काम करणारी एकच ठेकेदार कंपनी आहे. मातीचे डम्पर, रस्त्यावरची माती, वाहणारे वेगवान वारे यामुळे सर्वत्र उडणारी धूळ प्रवाशांसह स्थानिक जनतेला यांचा होणारा त्रास याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचाºयांनी लक्ष देऊन, या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक असतानासुद्धा ती के ली जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

2. त्यामुळे महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहेत, त्या तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी या समस्येला पायबंद घालण्यासाठी केली आहे.

3. जोपर्यंत प्रवासी व स्थानिक शांत आहेत, तोपर्यंत ठीक आहे. मात्र, याचा अतिरेक झाल्यास परिस्थिती गंभीर होऊन याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार राहतील, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र