शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात सरकारचा निर्णय मच्छीमार समाजाच्या मुळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 00:03 IST

परराज्यातील मच्छीमारांना निर्बंध; ‘महाराष्ट्रानेही त्याच धर्तीवर निर्णय घ्यावा’

- आविष्कार देसाईरायगड : गेल्या काही वर्षांपासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमार समाजाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच आता गुजरात सरकारने त्यांच्या सीमा भागात येण्यास परराज्यातील मच्छीमारांना निर्बंध घातले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मच्छीमार समाजावर अन्याय होणार आहे. गुजरात सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहेत.मासळीचा दुष्काळ असतानाच विविध आपत्तींमुळे मच्छीमार समाज मेटाकुटीला आला आहे. मासेमारी करण्यासाठी आपल्या राज्यात परराज्यातील मच्छीमार मोठ्या संख्येने येतात. त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात राज्यातील मच्छीमारांचाही समावेश आहे. त्यांच्या हद्दीमध्ये आपल्या राज्यातील मच्छीमारी करण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही याच धर्तीवर निर्णय घेत, राज्यातील मच्छीमारांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे मत मल्हारी मार्तंड मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष विश्वास नाखवा यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.गुजरातच्या हद्दीमध्ये गेल्यावर एक लाख रुपयाचा दंड, तसेच बोटीमध्ये असणाºया मच्छीपेक्षा पाचपट अधिक दंड ठोवण्याची तरतूद मत्स्य व्यवसाय दुरुस्ती विधयेकामध्ये असल्याकडे नाखवा यांनी लक्ष वेधले. हे अन्यायकारक आणि संतापजनक असल्याने, या विरोधात आपल्या सरकारला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडण्यात येईल. याबाबत मुख्यमंत्री, मत्स्य विभागाचे मंत्री यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वेळ पडल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.गुजरातमधून येतात १,५०० नौकामुंबई भाऊचा धक्का येथील बंदरावर गुजरात राज्याच्या सुमारे एक हजार ते पंधराशे नौका मच्छीविक्रीसाठी येतात. गुजरातमधून येणाºया मच्छीमारी नौकांवर महाराष्ट्र सरकारने दंड करावा, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे, पर राज्यातील नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत आल्यास मच्छीमारी करणाºया कोळी बांधवांमध्ये मोठा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. या आधीही एलईडी फिशिंगवरून संघर्ष उफाळून आला आहे.गुजरात सरकारने मांडलेल्या विधेयकामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, ते पाहावे लागेल, परंतु महाराष्ट्र राज्यातील मच्छीमार समाजावार अन्याय होऊ दिला जाणार नाही. याची पूर्ण खबदारी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.- खासदार सुनील तटकरेगुजरात सरकारच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील मच्छीमारांना गुजरात हद्दीमध्ये न जाण्याच्या सूचना मच्छीमार संस्थांनी दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यातून गुजरातमध्ये मासेमारीसाठी जाण्याचे प्रमाण कमी आहे, परंतु पालघरमध्ये ते अधिक आहे.-सुरेश भारती, सहायक संचालक, मत्स्य व्यवसाय

टॅग्स :fishermanमच्छीमार