शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागितले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 23:03 IST

टाटाचा प्रकल्प : श्रमिक मुक्ती दलाचे विधि व न्याय विभागाला पत्र

आविष्कार देसाई अलिबाग : तालुक्यातील धेरंड-शहापूरमधील टाटाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी २५८.१८ हेक्टर जमिनीची गरज असताना प्रत्यक्षात ३८७.७७ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. उद्योग व ऊर्जा विभागाने महानिर्मितीला चुकीची माहिती दिल्यामुळे नाहक शेतकऱ्यांची १२९.५९ हेक्टर अतिरिक्त जमीन प्रकल्पात गेली. त्यामुळे अशा दोषी अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा विधि विभागाकडे श्रमिक मुक्ती दलाने मार्गदर्शन मागितले आहे.

२००६ सालापासून टाटाच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू करण्यात आले होते. टाटाच्या विद्युत प्रकल्पास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने १६०० मेगावॅट वीजनिर्मितीची परवानगी दिली होती; परंतु उच्च न्यायालयासह सरकारला २४०० मेगावॅट वीजनिर्मितीची परवानगी दिली असल्याचे भासवण्यात आले होते. त्यामुळे ८०० मेगावॅटसाठी अतिरिक्त संपादन करण्यात आले. उद्योग व ऊर्जा विभागातील विशेष कार्य अधिकारी सं. प्र. नांदे यांनी पुरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे शेतकºयांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले होते. हे संपादने बेकायेदशीर असल्याचे पुढे उघड झाले होते. त्यामुळे अधिकाºयांनी चुकीची माहिती दिल्याने शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे अशा दोषी अधिकाºयांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. याबाबत जिल्हा विधि विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात आल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टाटाच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला शेतकºयांचा सुरुवातीपासूनच विरोध होता; परंतु तत्कालीन भूसंपादन अधिकारी जयकृष्ण फड यांनी संपादन रेटले होते. या विरोधात शेतकºयांनी यासाठी विविध स्तरावर मोर्चे, आंदोलन, लाँगमार्च काढून आपला विरोध प्रकट केला होता. मात्र, टाटा कंपनीसोबत काही अधिकाºयांचे संगनमत होते. त्यामुळे शेतकºयांना आपला लढा तीव्र करावा लागला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील शेतकºयांच्या बाजूने उभे राहिले. टाटा कंपनी किती मेगावॅट विजेची निर्मिती करणार आहे. त्यासाठी किती जमीन लागणार आहे हे तपासल्याशिवाय जमिनीचे संपादन करण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. त्यानंतर टाटा कंपनी आणि अधिकाºयांचे पितळ बाहेर पडले होते. अशा दोषी अधिकाºयांना शिक्षा होणे गरजेचे असल्यानेच श्रमिक मुक्ती दलाने विधि व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागितले आहे. उद्योग व ऊर्जा विभागातील विशेष कार्य अधिकारी सं. प्र. नांदे, एमआयडीसीचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी आणि तत्कालीन भूसंपादन अधिकारी जयकृष्ण फड यांच्या नावाचा समावेश आहे.

२००६ सालापासून टाटाच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू करण्यात आले होते. टाटाच्या विद्युत प्रकल्पास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने १६०० मेगावॅट वीजनिर्मितीची परवानगी दिली होती; परंतु उच्च न्यायालयासह सरकारला २४०० मेगावॅट वीजनिर्मितीची परवानगी दिली असल्याचे भासवण्यात आले होते. उद्योग व ऊर्जा विभागातील विशेष कार्य अधिकारी सं. प्र. नांदे यांनी पुरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे शेतकºयांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले होते.