शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागितले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 23:03 IST

टाटाचा प्रकल्प : श्रमिक मुक्ती दलाचे विधि व न्याय विभागाला पत्र

आविष्कार देसाई अलिबाग : तालुक्यातील धेरंड-शहापूरमधील टाटाच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी २५८.१८ हेक्टर जमिनीची गरज असताना प्रत्यक्षात ३८७.७७ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. उद्योग व ऊर्जा विभागाने महानिर्मितीला चुकीची माहिती दिल्यामुळे नाहक शेतकऱ्यांची १२९.५९ हेक्टर अतिरिक्त जमीन प्रकल्पात गेली. त्यामुळे अशा दोषी अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा विधि विभागाकडे श्रमिक मुक्ती दलाने मार्गदर्शन मागितले आहे.

२००६ सालापासून टाटाच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू करण्यात आले होते. टाटाच्या विद्युत प्रकल्पास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने १६०० मेगावॅट वीजनिर्मितीची परवानगी दिली होती; परंतु उच्च न्यायालयासह सरकारला २४०० मेगावॅट वीजनिर्मितीची परवानगी दिली असल्याचे भासवण्यात आले होते. त्यामुळे ८०० मेगावॅटसाठी अतिरिक्त संपादन करण्यात आले. उद्योग व ऊर्जा विभागातील विशेष कार्य अधिकारी सं. प्र. नांदे यांनी पुरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे शेतकºयांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले होते. हे संपादने बेकायेदशीर असल्याचे पुढे उघड झाले होते. त्यामुळे अधिकाºयांनी चुकीची माहिती दिल्याने शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे अशा दोषी अधिकाºयांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. याबाबत जिल्हा विधि विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात आल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टाटाच्या वीजनिर्मिती प्रकल्पाला शेतकºयांचा सुरुवातीपासूनच विरोध होता; परंतु तत्कालीन भूसंपादन अधिकारी जयकृष्ण फड यांनी संपादन रेटले होते. या विरोधात शेतकºयांनी यासाठी विविध स्तरावर मोर्चे, आंदोलन, लाँगमार्च काढून आपला विरोध प्रकट केला होता. मात्र, टाटा कंपनीसोबत काही अधिकाºयांचे संगनमत होते. त्यामुळे शेतकºयांना आपला लढा तीव्र करावा लागला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील शेतकºयांच्या बाजूने उभे राहिले. टाटा कंपनी किती मेगावॅट विजेची निर्मिती करणार आहे. त्यासाठी किती जमीन लागणार आहे हे तपासल्याशिवाय जमिनीचे संपादन करण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. त्यानंतर टाटा कंपनी आणि अधिकाºयांचे पितळ बाहेर पडले होते. अशा दोषी अधिकाºयांना शिक्षा होणे गरजेचे असल्यानेच श्रमिक मुक्ती दलाने विधि व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागितले आहे. उद्योग व ऊर्जा विभागातील विशेष कार्य अधिकारी सं. प्र. नांदे, एमआयडीसीचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी आणि तत्कालीन भूसंपादन अधिकारी जयकृष्ण फड यांच्या नावाचा समावेश आहे.

२००६ सालापासून टाटाच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू करण्यात आले होते. टाटाच्या विद्युत प्रकल्पास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने १६०० मेगावॅट वीजनिर्मितीची परवानगी दिली होती; परंतु उच्च न्यायालयासह सरकारला २४०० मेगावॅट वीजनिर्मितीची परवानगी दिली असल्याचे भासवण्यात आले होते. उद्योग व ऊर्जा विभागातील विशेष कार्य अधिकारी सं. प्र. नांदे यांनी पुरवलेल्या चुकीच्या माहितीमुळे शेतकºयांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले होते.