शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आजींचा ३ दिवसांत ६५ किमीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:46 IST

७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात.

- जयंत धुळपअलिबाग : ७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात. अलिबाग जिल्हा रुग्णालयातून सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अनसूया काळूराम गायकवाड यांनी चालायला प्रारंभ केला आणि तब्बल ६५ कि.मी.चे अंतर चालून त्या गुरुवारी सकाळी ८च्या सुमारास पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावी घरी पोहोचल्या.अनसूया आजीबार्इंची नातसून जोया विवेक पवार हीस येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले होते. तिच्या सोबत अनसूया आजी आणि त्यांचा नातू विवेक विनय पवार हे दोघेही रुग्णालयात आले होत. सोमवारी नातसुनेची प्रसूती झाली.पणतू झाल्याच्या आनंदात अनसूया आजी प्रसूती वॉर्डमध्ये मोठ्याने बोलत होत्या. त्या वेळी कुणीतरी त्यांना तुम्ही खाली जा, असे सांगितले. त्यावर त्या काहीशा रागावल्या आणि रुग्णालयाच्या खाली आल्या. सोमवारी रात्रीचे बारा वाजले तरी अनसूया आजी वरती वॉर्डमध्ये परत आल्या नाहीत, म्हणून नातू विवेकने त्यांना खाली जाऊन पाहिले. त्यास आजी दिसली नाही.मंगळवारी दिवसभर विवेकने आजीचा शोध घेतला तरीही आजी सापडली नाही. अखेर बुधवारी सकाळी अलिबाग पोलीसस्टेशन गाठून आजी हरवल्याची तक्रार दिली. अलिबाग पोलीसठाण्यातील हवालदार पांडूरंग गभाले यांनी विवेक पवार याच्याशी संवाद साधून, त्यांच्या पाली व अन्यत्रच्या नातेवाइकांचे मोबाइल नंबर घेऊन, त्यांच्याशी संपर्क साधण्यास प्रारंभ केला. मात्र,तरीही आजीचा शोध लागला नाही.गुरुवारी सकाळी त्यांनी पुन्हा सर्व नातेवाईक आणि आपले सहकारी पोलीस कर्मचारी यांच्याशी सतत संपर्क ठेवला आणि ८ वाजण्याच्या सुमारास गभाले यांनी अनसूया आजींची मुलगी मनीषा गायकवाड यांना फोन लावला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.आजी अलिबागहून चालत आताच (८.३०वा.) घरी पोहोचली आहे, असे मनीषा यांनी गभाले यांना सांगितले. त्यांनी तत्काळ नातू विवेक पवार याच्याशी संपर्क करून आजी सापडली आणि ती पालीला घरी पोहोचल्याचे सांगितले.ज्येष्ठ नागरिकांना केवळ आपुलकीचा हवा संवाद- रागावलेल्या अनसूया आजीबार्इंनी अलिबाग ते पाली-नानोशी हे सुमारे ६५ कि.मी.चे अंतर तीन दिवस आणि दोन रात्रीचा पायी प्रवास करून आपले घर गाठले. हे धाडसाचे जसे आहे, तसेच सामाजिक व नाते संबंधांतील चिंतनाचे देखील आहे. ज्येष्ठ नागरिकांना केवळ संवेदनशीलतेचा आपुलकीचा संवाद हवा असतो. त्यात काही कमी-जास्त झाले, तर अशा निर्णयास ते पोहोचू शकतात. अशी वेळच येणार नाही, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याची अपेक्षा पोलीस हवालदार पांडूरंग गभाले यांना मार्गदर्शन करणारे अलिबाग पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड