शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आजींचा ३ दिवसांत ६५ किमीचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:46 IST

७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात.

- जयंत धुळपअलिबाग : ७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात. अलिबाग जिल्हा रुग्णालयातून सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अनसूया काळूराम गायकवाड यांनी चालायला प्रारंभ केला आणि तब्बल ६५ कि.मी.चे अंतर चालून त्या गुरुवारी सकाळी ८च्या सुमारास पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावी घरी पोहोचल्या.अनसूया आजीबार्इंची नातसून जोया विवेक पवार हीस येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले होते. तिच्या सोबत अनसूया आजी आणि त्यांचा नातू विवेक विनय पवार हे दोघेही रुग्णालयात आले होत. सोमवारी नातसुनेची प्रसूती झाली.पणतू झाल्याच्या आनंदात अनसूया आजी प्रसूती वॉर्डमध्ये मोठ्याने बोलत होत्या. त्या वेळी कुणीतरी त्यांना तुम्ही खाली जा, असे सांगितले. त्यावर त्या काहीशा रागावल्या आणि रुग्णालयाच्या खाली आल्या. सोमवारी रात्रीचे बारा वाजले तरी अनसूया आजी वरती वॉर्डमध्ये परत आल्या नाहीत, म्हणून नातू विवेकने त्यांना खाली जाऊन पाहिले. त्यास आजी दिसली नाही.मंगळवारी दिवसभर विवेकने आजीचा शोध घेतला तरीही आजी सापडली नाही. अखेर बुधवारी सकाळी अलिबाग पोलीसस्टेशन गाठून आजी हरवल्याची तक्रार दिली. अलिबाग पोलीसठाण्यातील हवालदार पांडूरंग गभाले यांनी विवेक पवार याच्याशी संवाद साधून, त्यांच्या पाली व अन्यत्रच्या नातेवाइकांचे मोबाइल नंबर घेऊन, त्यांच्याशी संपर्क साधण्यास प्रारंभ केला. मात्र,तरीही आजीचा शोध लागला नाही.गुरुवारी सकाळी त्यांनी पुन्हा सर्व नातेवाईक आणि आपले सहकारी पोलीस कर्मचारी यांच्याशी सतत संपर्क ठेवला आणि ८ वाजण्याच्या सुमारास गभाले यांनी अनसूया आजींची मुलगी मनीषा गायकवाड यांना फोन लावला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.आजी अलिबागहून चालत आताच (८.३०वा.) घरी पोहोचली आहे, असे मनीषा यांनी गभाले यांना सांगितले. त्यांनी तत्काळ नातू विवेक पवार याच्याशी संपर्क करून आजी सापडली आणि ती पालीला घरी पोहोचल्याचे सांगितले.ज्येष्ठ नागरिकांना केवळ आपुलकीचा हवा संवाद- रागावलेल्या अनसूया आजीबार्इंनी अलिबाग ते पाली-नानोशी हे सुमारे ६५ कि.मी.चे अंतर तीन दिवस आणि दोन रात्रीचा पायी प्रवास करून आपले घर गाठले. हे धाडसाचे जसे आहे, तसेच सामाजिक व नाते संबंधांतील चिंतनाचे देखील आहे. ज्येष्ठ नागरिकांना केवळ संवेदनशीलतेचा आपुलकीचा संवाद हवा असतो. त्यात काही कमी-जास्त झाले, तर अशा निर्णयास ते पोहोचू शकतात. अशी वेळच येणार नाही, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याची अपेक्षा पोलीस हवालदार पांडूरंग गभाले यांना मार्गदर्शन करणारे अलिबाग पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड