शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शासनाने निधी दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर, सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 01:22 IST

Gram Panchayat News : ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत एकत्र आलेल्या गटांना शासन कोट्यवधींचा निधी कर्जस्वरूपात देत असतो. असाच निधी ग्रामपंचायतींना शासनाने दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर बनतील

 पनवेल : ग्रामपंचायतींना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत एकत्र आलेल्या गटांना शासन कोट्यवधींचा निधी कर्जस्वरूपात देत असतो. असाच निधी ग्रामपंचायतींना शासनाने दिल्यास ग्रामपंचायती आत्मनिर्भर बनतील, अशी आशा पाटोद्याचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे व्यक्त केली.पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भास्करराव पेरे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत होते. भास्करराव पेरे पाटील हे सलग २५ वर्षे औरंगाबाद येथील पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. पाटोदा ग्रामपंचायतीला दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. राज्य शासनाने पाटोदा ग्रामपंचायतीला आदर्श गाव पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवकर ग्रामपंचायतही रायगड जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या ३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल सरपंच अनिल ढवळे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमात पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एन. तेटगुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, सरपंच अनिल ढवळे, काशिनाथ पाटील, उपसरपंच लक्ष्मण तुपे, महेंद्र पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, सरपंचाने ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छ पाणी, स्वच्छता, मुलांचे शिक्षण, सांडपाण्याचा योग्य निचरा आदी प्रश्न प्रकर्षाने सोडविण्याची गरज आहे.संकट ओढावलेकोरोना काळात राज्य शासनावर आर्थिक संकट ओढावले. यावेळी शासनाने ग्रामपंचायतीच्या खात्यातून पैसे काढल्याचा गौप्यस्फोट भास्करराव पेरे पाटील यांनी या कार्यक्रमात केला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRaigadरायगड