शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

ग्रामपंचायतीची कामे होणार आॅनलाइन, आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 07:04 IST

केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायती आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीमधील बहुतांश संगणक बंद पडलेले आहेत.

- आविष्कार देसाईअलिबाग - केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायती आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीमधील बहुतांश संगणक बंद पडलेले आहेत. त्यामुळे १ एप्रिलपासून ग्रामपंचायतींचे सर्व व्यवहार आॅनलाइन पध्दतीने कसे होणार हाच मोठा प्रश्न आहे.भारताच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण भारत देश संगणकाने जोडण्याचा संकल्प केला आहे. डिजिटल इंडिया या नावाने सुरु झालेली ही मोहीम देशाच्या ग्रामीण भागातील कानाकोपºयात पोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनाही घरबसल्या सर्व व्यवहार करणे शक्य व्हावे, तसेच ग्रामपंचायतीमधील प्रशासकीय कारभाराला गती यावी यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंर्तगत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींमधील संगणक इंटरनेटने जोडण्यात येत आहेत. त्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये इंटरनेटचे जाळे निर्माण करणे गरजेचे आहे. भारतनेट अभियानातर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही भागांमध्ये केबल टाकण्याचे काम सुरु आहे तर, काही ठिकाणी अद्याप होणे बाकी आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमधून ही आॅप्टिकल फायबरची केबल जाणार आहे तेथील संबंधित ग्रामपंचायतींनी बीएसएनएल व्यवस्थापनाला ना हरकत प्रमाणपत्र तातडीने देणे बंधनकारक आहे. परंतु अद्यापही काही ग्रामपंचायतींना ते न दिल्यामुळे कामाला पाहिजे तशी गती येताना दिसत नाही.डिजिटल इंडियाचे स्वप्न प्रत्यक्षात योग्य त्या मुदतीमध्ये लवकरात लवकर साकार व्हावे यासाठी केंद्राकडून सातत्याने दबाव येत असल्याने प्रशासनाने याबाबत गंभीरता दर्शवली आहे. त्याचाच भाग म्हणून माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष तथा प्रधान सचिव यांनी राज्यातील ज्या जिल्हा परिषदांमध्ये भारतनेट अभियान राबवण्यात येत आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाºयांना १८ जानेवारी २०१८ रोजी पत्र लिहून कामाचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पत्राचा आधार घेत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील विस्तार अधिकाºयांना आदेश देत कामे पूर्ण करण्याच्या सूचना, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवण्यासाठी २०० चौरस मीटरची जागा देणे, तसेच आॅप्टिकल केबल टाकण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र ४८ तासांच्या आत बीएसएनएलला द्यावे असे आदेश दिले आहेत.डिजिटल इंडियाचा नाराभारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येणाररायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधाभारतनेट अभियानांतर्गत ग्रामीण भागांमध्ये आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्याच्या कामाला सुरुवातच्अलिबाग तालुक्यातील काही संगणक बंद पडलेले असल्यामुळे ते सर्व बंद पडलेले संगणक पंचायत समितीच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहेत.च्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमधील संगणक बंद अवस्थेत असल्यामुळे तेथील कर्मचाºयांना सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत आहे.च्संगणक बंद पडलेले असतानाच १ एप्रिलपासून रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे प्रशासकीय व्यवहार आॅनलाइन पध्दतीने केले जाणार आहेत. त्यामुळे हे कसे शक्य होणार हाच मोठा प्रश्न आहे.ग्रामपंचायतींमधील बंद पडलेले संगणक हे दुरुस्त होऊ शकतात. त्यानुसार ते दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना आदेशही देण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून आॅनलाइन व्यवहार सुरु केले जातील.- प्रकाश खोपकर,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत१० ग्रा.पं मध्ये संगणक सेवाच्श्रीवर्धन, मुरुड,खालापूर आणि म्हसळा या विभागातील प्रत्येकी १० ग्रामपंचायतींमध्ये संगणक सेवा सुरु झाली आहे. बीएसएनएलने सुरुवातीला काही दिवस मोफत सेवा दिली होती. आता प्रत्येक ग्रामपंचायतींना इंटरनेट वापरण्याबाबतचे पॅकेज निवडावे लागणार आहे. त्यानुसारही कार्यवाही सुरु असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडgram panchayatग्राम पंचायत