शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीची कामे होणार आॅनलाइन, आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 07:04 IST

केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायती आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीमधील बहुतांश संगणक बंद पडलेले आहेत.

- आविष्कार देसाईअलिबाग - केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायती आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीमधील बहुतांश संगणक बंद पडलेले आहेत. त्यामुळे १ एप्रिलपासून ग्रामपंचायतींचे सर्व व्यवहार आॅनलाइन पध्दतीने कसे होणार हाच मोठा प्रश्न आहे.भारताच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण भारत देश संगणकाने जोडण्याचा संकल्प केला आहे. डिजिटल इंडिया या नावाने सुरु झालेली ही मोहीम देशाच्या ग्रामीण भागातील कानाकोपºयात पोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनाही घरबसल्या सर्व व्यवहार करणे शक्य व्हावे, तसेच ग्रामपंचायतीमधील प्रशासकीय कारभाराला गती यावी यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंर्तगत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींमधील संगणक इंटरनेटने जोडण्यात येत आहेत. त्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये इंटरनेटचे जाळे निर्माण करणे गरजेचे आहे. भारतनेट अभियानातर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही भागांमध्ये केबल टाकण्याचे काम सुरु आहे तर, काही ठिकाणी अद्याप होणे बाकी आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमधून ही आॅप्टिकल फायबरची केबल जाणार आहे तेथील संबंधित ग्रामपंचायतींनी बीएसएनएल व्यवस्थापनाला ना हरकत प्रमाणपत्र तातडीने देणे बंधनकारक आहे. परंतु अद्यापही काही ग्रामपंचायतींना ते न दिल्यामुळे कामाला पाहिजे तशी गती येताना दिसत नाही.डिजिटल इंडियाचे स्वप्न प्रत्यक्षात योग्य त्या मुदतीमध्ये लवकरात लवकर साकार व्हावे यासाठी केंद्राकडून सातत्याने दबाव येत असल्याने प्रशासनाने याबाबत गंभीरता दर्शवली आहे. त्याचाच भाग म्हणून माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष तथा प्रधान सचिव यांनी राज्यातील ज्या जिल्हा परिषदांमध्ये भारतनेट अभियान राबवण्यात येत आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाºयांना १८ जानेवारी २०१८ रोजी पत्र लिहून कामाचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पत्राचा आधार घेत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील विस्तार अधिकाºयांना आदेश देत कामे पूर्ण करण्याच्या सूचना, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवण्यासाठी २०० चौरस मीटरची जागा देणे, तसेच आॅप्टिकल केबल टाकण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र ४८ तासांच्या आत बीएसएनएलला द्यावे असे आदेश दिले आहेत.डिजिटल इंडियाचा नाराभारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येणाररायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधाभारतनेट अभियानांतर्गत ग्रामीण भागांमध्ये आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्याच्या कामाला सुरुवातच्अलिबाग तालुक्यातील काही संगणक बंद पडलेले असल्यामुळे ते सर्व बंद पडलेले संगणक पंचायत समितीच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहेत.च्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमधील संगणक बंद अवस्थेत असल्यामुळे तेथील कर्मचाºयांना सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत आहे.च्संगणक बंद पडलेले असतानाच १ एप्रिलपासून रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे प्रशासकीय व्यवहार आॅनलाइन पध्दतीने केले जाणार आहेत. त्यामुळे हे कसे शक्य होणार हाच मोठा प्रश्न आहे.ग्रामपंचायतींमधील बंद पडलेले संगणक हे दुरुस्त होऊ शकतात. त्यानुसार ते दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना आदेशही देण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून आॅनलाइन व्यवहार सुरु केले जातील.- प्रकाश खोपकर,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत१० ग्रा.पं मध्ये संगणक सेवाच्श्रीवर्धन, मुरुड,खालापूर आणि म्हसळा या विभागातील प्रत्येकी १० ग्रामपंचायतींमध्ये संगणक सेवा सुरु झाली आहे. बीएसएनएलने सुरुवातीला काही दिवस मोफत सेवा दिली होती. आता प्रत्येक ग्रामपंचायतींना इंटरनेट वापरण्याबाबतचे पॅकेज निवडावे लागणार आहे. त्यानुसारही कार्यवाही सुरु असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडgram panchayatग्राम पंचायत