शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:47 IST

लोकसभेच्या निवडणुकांना अद्यापही एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या

अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकांना अद्यापही एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत आहेत. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १८७ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. प्रभाग रचना व आरक्षण, हरकती व सूचना मागवणे आणि प्रभाग रचना अंतिम करणे अशा तीन टप्प्यांच्या पूर्ततेसाठी निवडणूक आयोगाने काम सुरू केले आहे. माणगाव, खालापूर आणि महाड या तीन तालुक्यांतील सर्वाधिक ६८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे, तर उरण तालुक्यातील जासई या एकाच ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा बार उडणार आहे.निवडणुकीच्या कामाला निवडणूक विभागाने तयारी केली असताना दुसरीकडे विविध राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सरपंचपदाचाही निवडणूक थेट होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ८०६ ग्रामपंचायती आहेत. विविध ग्रामपंचायतींची मुदत वेगवेगळ््या कालावधीत संपल्यानंतर तेथे निवडणूक विभाग निवडणुकांची तयारी करते. जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये १५ तालुक्यातील तब्बल १८७ ग्रामपंचायतींचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानुसार तेथे निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ७ मार्च ते २० मार्च २०१८ या कालावधीमध्ये प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २१ मार्च ते ५ एप्रिल २०१८ या कालावधीत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. तिसºया टप्प्यामध्ये म्हणजे ११ एप्रिल ते १३ एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदानाची तारीख जाहीर होणार आहे.राज्यात तब्बल ६५६ ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहेत. रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायती, तर ठाणे जिल्ह्यातील ११ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोनच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.