शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:47 IST

लोकसभेच्या निवडणुकांना अद्यापही एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या

अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकांना अद्यापही एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत आहेत. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १८७ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. प्रभाग रचना व आरक्षण, हरकती व सूचना मागवणे आणि प्रभाग रचना अंतिम करणे अशा तीन टप्प्यांच्या पूर्ततेसाठी निवडणूक आयोगाने काम सुरू केले आहे. माणगाव, खालापूर आणि महाड या तीन तालुक्यांतील सर्वाधिक ६८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे, तर उरण तालुक्यातील जासई या एकाच ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा बार उडणार आहे.निवडणुकीच्या कामाला निवडणूक विभागाने तयारी केली असताना दुसरीकडे विविध राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सरपंचपदाचाही निवडणूक थेट होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ८०६ ग्रामपंचायती आहेत. विविध ग्रामपंचायतींची मुदत वेगवेगळ््या कालावधीत संपल्यानंतर तेथे निवडणूक विभाग निवडणुकांची तयारी करते. जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये १५ तालुक्यातील तब्बल १८७ ग्रामपंचायतींचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानुसार तेथे निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ७ मार्च ते २० मार्च २०१८ या कालावधीमध्ये प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २१ मार्च ते ५ एप्रिल २०१८ या कालावधीत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. तिसºया टप्प्यामध्ये म्हणजे ११ एप्रिल ते १३ एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदानाची तारीख जाहीर होणार आहे.राज्यात तब्बल ६५६ ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहेत. रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायती, तर ठाणे जिल्ह्यातील ११ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोनच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.