शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:47 IST

लोकसभेच्या निवडणुकांना अद्यापही एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या

अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकांना अद्यापही एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडत आहेत. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १८७ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. प्रभाग रचना व आरक्षण, हरकती व सूचना मागवणे आणि प्रभाग रचना अंतिम करणे अशा तीन टप्प्यांच्या पूर्ततेसाठी निवडणूक आयोगाने काम सुरू केले आहे. माणगाव, खालापूर आणि महाड या तीन तालुक्यांतील सर्वाधिक ६८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे, तर उरण तालुक्यातील जासई या एकाच ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा बार उडणार आहे.निवडणुकीच्या कामाला निवडणूक विभागाने तयारी केली असताना दुसरीकडे विविध राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सरपंचपदाचाही निवडणूक थेट होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ८०६ ग्रामपंचायती आहेत. विविध ग्रामपंचायतींची मुदत वेगवेगळ््या कालावधीत संपल्यानंतर तेथे निवडणूक विभाग निवडणुकांची तयारी करते. जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये १५ तालुक्यातील तब्बल १८७ ग्रामपंचायतींचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानुसार तेथे निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ७ मार्च ते २० मार्च २०१८ या कालावधीमध्ये प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २१ मार्च ते ५ एप्रिल २०१८ या कालावधीत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. तिसºया टप्प्यामध्ये म्हणजे ११ एप्रिल ते १३ एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये प्रभाग रचना अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदानाची तारीख जाहीर होणार आहे.राज्यात तब्बल ६५६ ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहेत. रायगड जिल्ह्यातील १८७ ग्रामपंचायती, तर ठाणे जिल्ह्यातील ११ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोनच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.