शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नववर्ष सुरुवातीलाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:41 IST

नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

अलिबाग : नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा कल नेमका कोणत्या पक्षाकडे अधिक आहे, हे कळू शकेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच वर्षामध्ये पार पडणार आहेत. त्याच धामधूममध्ये जिल्ह्यातील ९७ ग्रमपंचायतींची मुदत मार्च ते जून २०१९ या कालावधीमध्ये संपत आहे. निवडणूक विभागाकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी २०१९ वर्षे हे निवडणुकांचे वर्ष आहे. मेमध्ये लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. रायगड जिल्ह्यातही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ९७ ग्रमपंचायतींची मुदत येत्या मार्च ते जून या कालावधीमध्ये पूर्ण होत आहे. त्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील २५, मुरुड - ३, पेण- ५, पनवेल- ५, उरण-१, कर्जत- ३, खालापूर- १, माणगाव- ११, तळा- ५, रोहा- ६, महाड- १७, श्रीवर्धन- ११ आणि म्हसळा तालुक्यातील चार अशा एकूण ९७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.सरपंचपदाची थेट निवडणूक सुरू झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष दक्ष झाले आहेत. त्यांनी राजकीय व्यूहरचनेमध्ये बदल करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. सरपंचाला असलेले भक्कम अधिकार, मतदारांमधून होणाऱ्या थेट निवडीमुळे सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी राजकीय पक्षातील उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच वाढली आहे. मतदारच आपल्या आवडीचा सरपंच थेट निवडून देत असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांना इच्छुकांचे मन वळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकांकडे पाहिल्यास विविध राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर सोयीस्कर युत्या आघाड्या केल्या होत्या. त्यामध्ये त्यांना चांगलेच यश आल्याने आगामी निवडणुकीसाठी हाच फॉर्म्युला राहण्याची शक्यता बळावली आहे. ग्रामपंचायतींमध्ये मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. १७ डिसेंबर २०१८ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे, असे निवडणूक विभागाचे रवींद्र मठपती यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतRaigadरायगड