शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नववर्ष सुरुवातीलाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:41 IST

नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

अलिबाग : नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा कल नेमका कोणत्या पक्षाकडे अधिक आहे, हे कळू शकेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच वर्षामध्ये पार पडणार आहेत. त्याच धामधूममध्ये जिल्ह्यातील ९७ ग्रमपंचायतींची मुदत मार्च ते जून २०१९ या कालावधीमध्ये संपत आहे. निवडणूक विभागाकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी २०१९ वर्षे हे निवडणुकांचे वर्ष आहे. मेमध्ये लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. रायगड जिल्ह्यातही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ९७ ग्रमपंचायतींची मुदत येत्या मार्च ते जून या कालावधीमध्ये पूर्ण होत आहे. त्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील २५, मुरुड - ३, पेण- ५, पनवेल- ५, उरण-१, कर्जत- ३, खालापूर- १, माणगाव- ११, तळा- ५, रोहा- ६, महाड- १७, श्रीवर्धन- ११ आणि म्हसळा तालुक्यातील चार अशा एकूण ९७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.सरपंचपदाची थेट निवडणूक सुरू झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष दक्ष झाले आहेत. त्यांनी राजकीय व्यूहरचनेमध्ये बदल करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. सरपंचाला असलेले भक्कम अधिकार, मतदारांमधून होणाऱ्या थेट निवडीमुळे सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी राजकीय पक्षातील उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच वाढली आहे. मतदारच आपल्या आवडीचा सरपंच थेट निवडून देत असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांना इच्छुकांचे मन वळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकांकडे पाहिल्यास विविध राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर सोयीस्कर युत्या आघाड्या केल्या होत्या. त्यामध्ये त्यांना चांगलेच यश आल्याने आगामी निवडणुकीसाठी हाच फॉर्म्युला राहण्याची शक्यता बळावली आहे. ग्रामपंचायतींमध्ये मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. १७ डिसेंबर २०१८ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे, असे निवडणूक विभागाचे रवींद्र मठपती यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतRaigadरायगड