शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

'जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा सरकारचा घाट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:37 IST

सुनिल तटकरे यांचा आरोप; पाणी देण्याला विरोध

अलिबाग : भिरा भिवपूरी येथील जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरे यांनी केला. रायगडच्या जनतेच्या हक्काचे पाणी अन्यत्र कोठेही वळवून दिले जाणार नाही. त्याला कडाडून विरोध केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेमध्ये बैठक बोलावली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सह्याद्रीच्या कुशीतून कोकणात मोठ्या प्रमाणात पाणी येते. पश्चिमेकडे येणारे पाणी पूर्वकडे वळवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. वशिष्ठ, कुंडलीका, अंबा नदीचे पाणी अन्यत्र वळवण्यात येणार आहे. परंतू कोकणातील वाढत्या नागरिकरणासाठी, दुबार शेतीसाठी, उद्योगासाठी लागणारे पाणी हे मिळालेच पाहीजे. ते कोठेही जाऊ दिले जाणार नाही.भिरा भिवपूरी येथील जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. तो हाणून पाडला जाईल. कारण भिरा, कोयना जलविद्युत प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी रायगडतील अंबा, कुंडलीका, वशिष्ठ नदीमध्ये जाते. त्याचा वापर जिल्ह्यात पिण्यासाठी शेतीसाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी होतो. तसेच येथे उत्पादीत होणारी स्वस्त विज मुंबईकरांना दिली जाते. त्यामुळे हे प्रकल्प बंद करण्याला कडाडून विरोध केला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्हा परिषदेमध्ये तटकरे यांनी विविध विकास कामांच्या अनुशंगाने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सर्वप्रथम त्यांनी बएसएनएल सेवेचा जिल्ह्यात उडालेल्या बोजवाºयावर लक्ष केंद्रीत करत अधिकाºयांची कान उघाडणी केली. बीएसएनएलची बहुतांश कार्यालयेही भाड्याच्या जागेत आहेत. त्यांचे भाडे थकल्याने त्यांना टाळे लागल्याने काम होत नाहीत. तसेच काही कार्यालयांचे विजेचे बिल थकल्यानेही ब्रॉडबॅण्ड सेवा कोलमडून पडली आहे. यावर उपाय म्हणून त्यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांसाठी दुरसंचार मंत्र्याची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट करुन महावितरणे बीएसएनएलची विज सेवा खंडी करुन नये असे निर्देश दिले.लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर तटकरे यांनी विविध खात्यांच्या अधिकाºयांच्या बैठका घेतल्या. त्यामध्ये अलिबाग-विरार एक्सप्रेस कॉरीडॉर, मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, रेवस-रेड्डी या राष्ट्रीय महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.भिरा, कोयना जलविद्युत प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी रायगडमधील अंबा, कुंडलिका, वशिष्ठ नदीमध्ये जाते. त्याचा वापर जिल्ह्यात पिण्यासाठी शेतीसाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी होतो.येथे उत्पादीत होणारी स्वस्त विज मुंबईकरांना दिली जाते. त्यामुळे हे प्रकल्प बंद करण्याला कडाडून विरोध केला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे