शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

शासकीय निकष नुकसानभरपाईत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:27 IST

शासनाने वास्तवता लक्षात घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

दासगाव : महाड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वारा आणि गारांच्या पावसाने अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे झाले असले, तरी शासकीय नियम आणि निकष या नुकसानभरपाईत अडसर ठरणार आहेत. शासनाने वास्तवता लक्षात घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.महाड तालुक्यात सोमवारी दुपारी काही भागात वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाला. यामध्ये तालुक्यातील पाचाड आणि परिसरात मोठे नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील जवळपास १९ गावांना वादळाचा फटका बसल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आले होते. मात्र, त्यानंतर गावागावांतून नुकसान झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ देत असून, त्याप्रमाणे पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार तालुक्यात १३९ घरे, पुनाडे २५, निजामपूर ३५, रायगडवाडी ५३, वाघोली ३, सांदोशी १५, नाते २, पारवाडी २२, किंजलोली बु. १, किंजलोली खु. १, मांडले १, कोंझर २ असे नुकसान पंचनामे झाले आहेत. काही गावांचे पंचनामे अद्याप सुरू असल्याची माहिती महाड महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळावी, अशी आशा असली तरी शासकीय नियम आणि निकष या मदतीला अडसर ठरत आहे.शासकीय नियमानुसार २४ तासांत किमान ६४ मि. मी. पाऊस पडणे गरजेचे आहे. कोकणात नुकसान झाल्यास कोकणातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जात नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही शेतकरी अगर ग्रामस्थांच्या नुकसानीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय पंचनामे पाहून मदत मिळावी, अशी मागणी अख्तर शेख ग्रामस्थ पाचाड यांनी केली.महाड तालुक्यात आलेल्या वादळी वाºयाने नुकसान झाले हे वास्तव आहे. मात्र, शासकीय निकषात ही मदत बसत नसली, तरी नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत मिळावी, याकरिता आम्ही झालेले पंचनामे प्रस्तावासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून देत आहोत.- चंद्रसेन पवार,तहसीलदार, महाड

टॅग्स :Rainपाऊस