शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

शासकीय निकष नुकसानभरपाईत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:27 IST

शासनाने वास्तवता लक्षात घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

दासगाव : महाड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वारा आणि गारांच्या पावसाने अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे झाले असले, तरी शासकीय नियम आणि निकष या नुकसानभरपाईत अडसर ठरणार आहेत. शासनाने वास्तवता लक्षात घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.महाड तालुक्यात सोमवारी दुपारी काही भागात वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाला. यामध्ये तालुक्यातील पाचाड आणि परिसरात मोठे नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील जवळपास १९ गावांना वादळाचा फटका बसल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आले होते. मात्र, त्यानंतर गावागावांतून नुकसान झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ देत असून, त्याप्रमाणे पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार तालुक्यात १३९ घरे, पुनाडे २५, निजामपूर ३५, रायगडवाडी ५३, वाघोली ३, सांदोशी १५, नाते २, पारवाडी २२, किंजलोली बु. १, किंजलोली खु. १, मांडले १, कोंझर २ असे नुकसान पंचनामे झाले आहेत. काही गावांचे पंचनामे अद्याप सुरू असल्याची माहिती महाड महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळावी, अशी आशा असली तरी शासकीय नियम आणि निकष या मदतीला अडसर ठरत आहे.शासकीय नियमानुसार २४ तासांत किमान ६४ मि. मी. पाऊस पडणे गरजेचे आहे. कोकणात नुकसान झाल्यास कोकणातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जात नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही शेतकरी अगर ग्रामस्थांच्या नुकसानीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय पंचनामे पाहून मदत मिळावी, अशी मागणी अख्तर शेख ग्रामस्थ पाचाड यांनी केली.महाड तालुक्यात आलेल्या वादळी वाºयाने नुकसान झाले हे वास्तव आहे. मात्र, शासकीय निकषात ही मदत बसत नसली, तरी नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत मिळावी, याकरिता आम्ही झालेले पंचनामे प्रस्तावासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून देत आहोत.- चंद्रसेन पवार,तहसीलदार, महाड

टॅग्स :Rainपाऊस