शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शासकीय निकष नुकसानभरपाईत अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:27 IST

शासनाने वास्तवता लक्षात घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

दासगाव : महाड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वारा आणि गारांच्या पावसाने अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे झाले असले, तरी शासकीय नियम आणि निकष या नुकसानभरपाईत अडसर ठरणार आहेत. शासनाने वास्तवता लक्षात घेऊन नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.महाड तालुक्यात सोमवारी दुपारी काही भागात वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाला. यामध्ये तालुक्यातील पाचाड आणि परिसरात मोठे नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील जवळपास १९ गावांना वादळाचा फटका बसल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आले होते. मात्र, त्यानंतर गावागावांतून नुकसान झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ देत असून, त्याप्रमाणे पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार तालुक्यात १३९ घरे, पुनाडे २५, निजामपूर ३५, रायगडवाडी ५३, वाघोली ३, सांदोशी १५, नाते २, पारवाडी २२, किंजलोली बु. १, किंजलोली खु. १, मांडले १, कोंझर २ असे नुकसान पंचनामे झाले आहेत. काही गावांचे पंचनामे अद्याप सुरू असल्याची माहिती महाड महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळावी, अशी आशा असली तरी शासकीय नियम आणि निकष या मदतीला अडसर ठरत आहे.शासकीय नियमानुसार २४ तासांत किमान ६४ मि. मी. पाऊस पडणे गरजेचे आहे. कोकणात नुकसान झाल्यास कोकणातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई दिली जात नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही शेतकरी अगर ग्रामस्थांच्या नुकसानीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय पंचनामे पाहून मदत मिळावी, अशी मागणी अख्तर शेख ग्रामस्थ पाचाड यांनी केली.महाड तालुक्यात आलेल्या वादळी वाºयाने नुकसान झाले हे वास्तव आहे. मात्र, शासकीय निकषात ही मदत बसत नसली, तरी नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत मिळावी, याकरिता आम्ही झालेले पंचनामे प्रस्तावासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून देत आहोत.- चंद्रसेन पवार,तहसीलदार, महाड

टॅग्स :Rainपाऊस