शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

कोरोना नियंत्रणासाठी शासन, प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 23:25 IST

प्रवीण दरेकर यांचा आरोप : महाडमधील एमएमए कोरोना सेंटरची पाहणी करुन घेतली पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : कोरोना नियंत्रणाच्या कामामध्ये सरकारच्या कथनी आणि करनीमध्ये फरक आहे. कोणत्याही यंत्रणा परस्पर समन्वयाने काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती खालावत चालली आहे. रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्याबाबत शासन आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

आ. प्रवीण दरेकर यांनी महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमए कोरोना सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. महाड, उत्पादक संघटनेचे (एम.एम.ए.) अध्यक्ष संभाजी पाठारे यांनी या सेंटरची माहिती त्यांना दिली. या वेळेस भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर आणि महाड येथील मनोज खांबे यांनी या कोरोना सेंटरच्या कामाबाबत अनेक तक्रारी केल्या. बिपीन म्हामुणकर यांनी या कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणारे रॅकेट कार्यरत असल्याचा थेट आरोप केला.

या कोरोना सेंटरची पाहणी केल्यानंतर, महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या रॅकेटसंदर्भात दरेकर यांच्याकडे विचारणा केली असता, या प्रकाराची चौकशी करण्यास आपण सरकारला भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. मात्र त्याच वेळेस शासनाने आश्वासन देऊनही या कोरोना केअर सेंटरला कोणतीही मदत न केल्याने हे सेंटर चालविताना एमएमएची दमछाक होत असल्याचा दावादेखील दरेकर यांनी केला.

रायगड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे करणार आहोत, त्याचप्रमाणे आपत्ती निवारण योजनेतून महाड येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी ८४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी आपत्ती निवारण आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. कोरोना सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स नेमण्यात यावेत यासाठी आरोग्यमंत्र्यांशी आपण चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले. या वेळेस भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.रहिवाशांना भाड्याचीघरे उपलब्ध करून द्यातारिक गार्डन इमारतीमधील रहिवाशांचे सध्या हॉलमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याऐवजी शासनाने त्यांना भाड्याची घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेले असंख्य वादळग्रस्त आजही नुकसानभरपाईपासून वंचित असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.