शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 23:54 IST

‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत.

गिरीश गोरेगावकर माणगाव : ‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत. त्यामुळे प्रसन्न अशी पहाट होत असे. मात्र, काळानुरूप अशी पहाटही कालबाह्य झाली असे म्हणावे लागेल. कारण एकेकाळी जाते ही ग्रामीण जीवनाची खरी ओळख होती. ग्रामीण जीवनाची पहाट या जात्याच्या आवाजानेच व्हायची. प्रत्येक घरी जाते असायचे. या जात्याची घरघर पहाटे सुरू व्हायची. त्यामुळे पूर्वी आपोआपच सारे गाव जागे व्हायचे व दळण दळताना पहाटेची गाणी, ओव्या, भुपाळ्या, भारुडे गाऊन धान्य दळले जात असे व उखळीतून धान्य सडून तांदूळ काढले जात असत.पिठाच्या गिरण्या सुरू होण्यापूर्वी प्रत्येक कुटुंब जीवनात जात्याला महत्त्व देत होते. किंबहुना ते एक महत्त्वाचे साधन होते. पूर्वी पहाटे जात्यावर दळणाऱ्या महिलांच्या मुखातून अमृतमधुर ओव्या ऐकायला मिळायच्या. तसेच जाते चालविल्याने व उखळीतून धान्य सडल्याने चांगला व्यायामसुद्धा होत होता. मात्र, बदलत्या काळानुसार आजच्या युगातील उच्चशिक्षित महिला जुन्या गोष्टी अवलंबताना दिसत नाहीत. आता जात्यावरच्या त्या पारंपरिक ओव्या पुस्तकात बंद झाल्या आहेत.पूर्वी गावोगावी लाइटची सोय नसायची. बाजाराच्या ठिकाणीच लाइटची सोय असल्याने पिठाच्या गिरणी व भात गिरणी बाजारात असायच्या. ग्रामीण भागात पिठाची गिरणी व भात गिरणी नसल्यामुळे आम्हाला जात्यानेच धान्य दळणे व उखळातून तांदूळ सडणे, अशी कामे भल्या पहाटे करावी लागत होती. आता सर्वच ठिकाणी पिठाच्या गिरण्या व भात गिरण्या उपलब्ध झाल्याने जाते व उखळ क्वचितच दिसतात, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक पिठाबाई खाडे यांनी दिली.