शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
2
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
5
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
6
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
7
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
8
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
9
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
10
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
11
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
12
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
13
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
14
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
15
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
16
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
17
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
18
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
19
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
20
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकघरातून जाते, उखळ कालबाह्य, ग्रामीण जीवनाची ओळख हरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 23:54 IST

‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत.

गिरीश गोरेगावकर माणगाव : ‘सुंदर माझे जाते गं... फिरते बहुत... ओव्या गाऊ कौतुके, तू येरे बा विठ्ठला...’ अशी गाणी पूर्वी पहाटेच कानावर पडत असत. त्यामुळे प्रसन्न अशी पहाट होत असे. मात्र, काळानुरूप अशी पहाटही कालबाह्य झाली असे म्हणावे लागेल. कारण एकेकाळी जाते ही ग्रामीण जीवनाची खरी ओळख होती. ग्रामीण जीवनाची पहाट या जात्याच्या आवाजानेच व्हायची. प्रत्येक घरी जाते असायचे. या जात्याची घरघर पहाटे सुरू व्हायची. त्यामुळे पूर्वी आपोआपच सारे गाव जागे व्हायचे व दळण दळताना पहाटेची गाणी, ओव्या, भुपाळ्या, भारुडे गाऊन धान्य दळले जात असे व उखळीतून धान्य सडून तांदूळ काढले जात असत.पिठाच्या गिरण्या सुरू होण्यापूर्वी प्रत्येक कुटुंब जीवनात जात्याला महत्त्व देत होते. किंबहुना ते एक महत्त्वाचे साधन होते. पूर्वी पहाटे जात्यावर दळणाऱ्या महिलांच्या मुखातून अमृतमधुर ओव्या ऐकायला मिळायच्या. तसेच जाते चालविल्याने व उखळीतून धान्य सडल्याने चांगला व्यायामसुद्धा होत होता. मात्र, बदलत्या काळानुसार आजच्या युगातील उच्चशिक्षित महिला जुन्या गोष्टी अवलंबताना दिसत नाहीत. आता जात्यावरच्या त्या पारंपरिक ओव्या पुस्तकात बंद झाल्या आहेत.पूर्वी गावोगावी लाइटची सोय नसायची. बाजाराच्या ठिकाणीच लाइटची सोय असल्याने पिठाच्या गिरणी व भात गिरणी बाजारात असायच्या. ग्रामीण भागात पिठाची गिरणी व भात गिरणी नसल्यामुळे आम्हाला जात्यानेच धान्य दळणे व उखळातून तांदूळ सडणे, अशी कामे भल्या पहाटे करावी लागत होती. आता सर्वच ठिकाणी पिठाच्या गिरण्या व भात गिरण्या उपलब्ध झाल्याने जाते व उखळ क्वचितच दिसतात, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक पिठाबाई खाडे यांनी दिली.