शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबिकाँन टर्मिनलची दुषित पाणी खाडीत सोडण्याची मनमानी सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 20:53 IST

उरण तालुक्यातील खोपटे-बांपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्लोबिकाँन  इंटरनँशल कार्गो टर्मिनल प्रा.लि. या कंपनीतील आयात-निर्यात मालाची हाताळणी केली जाते.

मधुकर ठाकूर

उरण : बांधपाडा, पिरकोन, कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोबिकाँन टर्मिनलमधील दुषित पाणी  पहिल्या पडलेल्या पावसात शनिवारी खाडीच्या पात्रात सोडल्याने शेतकरी, मच्छीमार संतप्त झाले आहे.दुषीत पाणी खाडीत सोडणाऱ्या या कंपनीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उरण तालुक्यातील खोपटे-बांपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्लोबिकाँन  इंटरनँशल कार्गो टर्मिनल प्रा.लि. या कंपनीतील आयात-निर्यात मालाची हाताळणी केली जाते. प्रकल्पातील रासायनिक मिश्रित दुषित सांडपाणी खाडीत आणि शेतीत सोडले जाते.तर  नाशवंत मालही खाडीकिनारी,शेतात आणि परिसरातील रस्त्यांवर टाकण्यात येत आहे.त्यामुळे नाशवंत मालाच्या उग्र वासातील पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे जनता हैराण झाली आहे.

सदर ग्लोबिकाँन टर्मिनलच्या दुर्गंधीकडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ वारंवार काणाडोळा करत आहे.त्यामुळे त्याचा फटका परिसरातील नागरिक, शेतकरी, खाडीकिनाऱ्यावरील खारफुटी बरोबरच खाडीतील मासळीला बसत आहे. या अगोदरही दुषित पाण्यामुळे खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडल्या आहेत.वारंवार घडणाऱ्या घटनांनी परिसरातील शेतकरी,नागरिक, मच्छीमार त्रस्त झाले आहेत. यातच रासायनिक मिश्रित दुषित पाणी पहिल्या पडलेल्या पावसात शनिवारी ( २४) कंपनीने खाडीच्या पात्रात सोडल्याने शेतकरी, मच्छीमार संतप्त झाले आहे.

परिसरातील नागरिक, शेतकरी आणि मच्छीमारांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या  ग्लोबिकाँन टर्मिनल व्यवस्थापनावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळानी तातडीने कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक, शेतकरी, ग्रामपंचायतीकडून केली जात आहे.मात्र कारवाईकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी सचिन आडकर यांनी प्रतिसाद दिला नाही.यामुळे नेमकी माहिती मिळाली नाही.

कंपनीतून रसायन मिश्रित दुषित पाणी शेती, खाडीत सोडण्यात येत असल्याने नागरिक, शेतकरी, मच्छीमार यांच्यावरच नव्हे जीवजंतुवरही मोठ्या प्रमाणावर विपरित परिणाम होत आहे.यासाठी कंपनीवर कारवाई करुन पायबंद घालण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा किसान सभेचे सेक्रेटरी संजय ठाकूर यांनी दिली.

कंपनीकडे रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अद्यावत प्लांट आहे.त्यामुळे दुषित पाणी खाडी,शेतीत सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारदारांचा अंतस्थ हेतू वेगळाच आहे.त्यामुळेच सातत्याने कंपनी विरोधात तक्रारी केल्या जात असल्याचे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जेकब थॉमस यांनी सांगितले.

टॅग्स :uran-acउरण