शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

गीते रायगडचे मतदार नाहीत, मग बांधिलकी कुठून येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 05:26 IST

सुनील तटकरे यांचा सवाल : दादर येथे म्हसळा तालुक्यातील मुंबईकरांचा मेळावा

मुंबई : आपल्या लोकसभा मतदार संघात मोबाइल कनेक्टिव्हिटी, पिण्याचे पाणी, मुंबई-गोवा महामार्ग, इतर रस्ते यांची कामे खासदार नाही तर कोण करणार? गीते हे मुळात रायगडचे मतदारच नसल्याने त्यांची तिथल्या मातीशी, लोकांशी बांधिलकी नाही. आपलेपणातून येथील लोकांसाठी काही करण्याची त्यांची मानसिकता नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे. रविवारी मुंबईत दादर येथील श्रीकृष्ण सभागृहात म्हसळा तालुक्यातील मुंबईकरांच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी त्यांनी अनंत गीते यांच्या निष्क्रि यतेवर त्यांनी टीका केली.

मला म्हसळा तालुक्यात कुठेही डोळ्यावर पट्टी बांधून उभे केले तरी कोणते गाव कुठल्या दिशेला आहे, हे मी सांगू शकेन. मात्र, गेली ३० वर्षे खासदार राहिलेल्या अनंत गीतेंना अजून रायगडचे रस्तेही माहीत नाहीत की गावांची नावेही माहीत नाहीत, असे ते म्हणाले. केवळ दोन लाख ९९ हजार रु पयांचे काम दाखवणारा कार्यअहवाल गीतेंनी छापला आहे. याहून जास्त काम तर आमचे पंचायत समितीचे सदस्यही करतात, असा टोला लगावताना तटकरे यांनी मीच गेल्या पाच वर्षांत कमीत कमी ३२ कोटींहून अधिक रु पयांची विकासकामे केल्याचा दावा केला. गीते यांचे काम दाखवा आणि दोन हजारांचे बक्षीस मिळवा, असे जाहीर करण्याची वेळ आली असल्याचा चिमटा काढला.

प्रचारसभेत खा. गीते आपल्या कार्यकर्त्यांना हात उंचावून पैसे घेणार नाही, अशी शपथ घ्यायला लावतात. याची खिल्ली उडवत तटकरे यांनी तुमचा कार्यकर्त्यांवर भरोसा नाय का? असा प्रश्न विचारला. तुमच्या कार्यक र्त्यांच्या कष्टाची तुम्ही हीच किंमत करता का, असा सवाल त्यांनी गीते यांना केला. नवीद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशावर टिपणी करताना तटकरे यांनी बॅ. ए. आर. अंतुले हे धर्मनिरपेक्ष विचारांचे अत्यंत ताकदीचे नेते होते, असे म्हणत वारसा हा रक्ताचा नसून विचारांचा असतो, असा टोला लागावला. आज देशाचे संविधान धोक्यात असताना आपल्याला सार्वभौमत्व व लोकशाही यांचे संरक्षण करण्यासाठी, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा सशक्त समाज घडवण्यासाठीच झटायला हवे, असे ते म्हणाले. आम्हाला कुणी जात, धर्म विचारला तर आम्ही भारतीय असेच सांगतो, कारण विकासाला जात नसते. २४ तास आपल्या लोकांसाठी आपण काय करू शकतो, याचाच विचार डोक्यात असल्याचे ते म्हणाले.मुंबई आणि रायगडचे मतदान एकाच दिवशी आले नसल्याने मुंबईत राहणाऱ्या रायगडकरांनी मोठ्या संख्येने गावी येऊन मतदान करावे, असे आवाहन तटकरे यांनी उपस्थितांना केले. या वेळी चिपखल ग्रामपंचायत हद्दीतील २५० ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.‘श्रीवर्धनचा पर्यटन विकास साधण्यात सुनील तटकरे यशस्वी’च्मुंबई : श्रीवर्धनच्या सौंदर्यात भर टाकून येथे पर्यटनाचा विकास करून घरोघरी रोजगार निर्माण करण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले असल्याचा दावा आमदार अनिकेत तटकरे यांनी रविवारी बोलताना केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन तालुक्यातील मुंबईकरांचा मेळावा रविवारी मुंबईतील दादर येथील श्रीकृष्ण सभागृहात घेण्यात आला. या वेळी आ. अनिकेत तटकरे बोलत होते.च्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे उपस्थित होते. श्रीवर्धनच्या प्रत्येक गावाचा, वाडी वस्तीचा विकास तटकरेंनी कशा प्रकारे केला आहे, याचा उल्लेख आ.अनिकेत तटकरे यांनी केला. गीते ३० वर्षे खासदार असून त्यांनी रोजगार, शिक्षण, आरोग्य याबाबत तर काही केले नाहीच; पण ज्या समाजाचे नाव घेत ते जिंकत आले, त्या समाजासाठीही त्यांनी काही केले नाही.च्आज येथील शिवसैनिकही सुनील तटकरे यांनाच मत देणार असल्याचे खासगीत सांगतात, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे यांनी सांगितले. एक मतही महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोणीही हलगर्जी करू नये, अशी सूचना मुंबईत राहणाऱ्या श्रीवर्धनच्या मतदारांना केली.

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक