शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

घारापुरी सागरी तटबंदीचे काम रखडले, समुद्राचे पाणी १५ मीटर आत शिरले, पर्यावरण विभागाकडून परवानगीला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 12:29 IST

समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबविण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी जेएनपीटीकडे लावून धरली होती.

मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटीकडून मंजूर करण्यात आलेले  घारापुरी सागरी तटबंदीचे काम मागील १८ महिन्यांपासून रखडले आहे. काही पर्यावरणवादी संस्थांच्या विरोधामुळे रखडलेल्या कामामुळे मात्र घारापुरी बेटावरील सागरी किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होत असून समुद्राचे पाणी किनारपट्टीची पातळी सोडून आता १५ मीटर अंतरापर्यंत आत घुसले आहे. शिवाय समुद्राच्या पाण्याच्या प्रचंड लाटांनी रस्तेच वाहून गेले आहेत.

समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबविण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी जेएनपीटीकडे लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर १८ महिन्यांपूर्वी जेएनपीटीने बेटावरील किनारपट्टीची मोठ्या प्रमाणावर सागरी धूप थांबविण्यासाठी सुमारे ३७.५० कोटी खर्चाच्या सागरी तटबंदीचा प्रस्ताव तयार केला आहे. या कामाच्या निविदा मंजुरीनंतर जेएनपीटीने कामाची वर्कऑर्डरही काढली आहे. मात्र, पर्यावरण विभागाकडून आवश्यक  परवानग्या वेळेत मिळविण्यात जेएनपीटी अपयशी ठरली. त्याशिवाय काही पर्यावरणवादी संस्थांच्या केलेल्या विरोधामुळे घारापुरी सागरी तटबंदीचे काम मागील १८ महिन्यांपासून रखडले आहे. परिणामी, मागील उधाणाच्या भरतीने समुद्राचे पाणी किनारपट्टीची पातळी सोडून आता १५ मीटर अंतरापर्यंत आत घुसले आहे, शिवाय समुद्राच्या पाण्याच्या प्रचंड लाटांनी घारापुरी बेटावरील शेतबंदर, मोराबंदर, राजबंदर या तिन्ही गावांसभोवार असलेल्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे, तसेच मोराबंदर, शेतबंदर या दोन गावांत समुद्राचे पाणी शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मोरा बंदर किनाऱ्यावरील तर रस्तेच उद्ध्वस्त होऊन वाहून गेले आहेत. समुद्राच्या सागरी किनारपट्टीबरोबरच बेटावरील गावांनाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत जेएनपीटी आणि उरण तहसीलदारांना वस्तुस्थिती अवगत करून देण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले.

जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांकडूनच सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात विलंब करण्यात आला होता. मात्र, पर्यावरण विभागाने तपासणीनंतर जागतिक कीर्तीच्या बेटाची समुद्राच्या लाटांमुळे आणखी हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याची, तसेच न्यायालयाच्या सूचनेनुसार तटबंदीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी परवानगी दिली आहे. - गीता पवार, कांदळवन सेल वन विभागाच्या असिस्टंट कॉन्झरवेटर  

१८ महिन्यांच्या दिरंगाईचा फटकाकांदळवन समिती आणि पर्यावरण विभागाकडून आवश्यक परवानगी मिळण्यासाठी झालेली दिरंगाई आणि त्यानंतर पर्यावरणवादी संस्थांच्या विरोधामुळे घारापुरी बेटाच्या सागरी  तटबंदीचे कामाला विलंब झाला असल्याची कबुली जेएनपीटी प्रशासनाकडून देण्यात आली. जागतिक कीर्तीच्या बेटाला आणि मोराबंदर, शेतबंदर या दोन गावांत समुद्राचे पाणी शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याची दखल घेऊनच स्थानिकांच्या मागणीवरूनच तटबंदी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, पर्यावरणवादी संस्थांकडून केला जाणार विरोध अनाठायी आणि अनाकलनीय असल्याची खंतही जेएनपीटीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Raigadरायगड