शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गेटवे-मांडवा सागरी प्रवासी वाहतूक होणार बारमाही

By admin | Updated: January 31, 2017 02:04 IST

अलिबागहून बसने मांडवा जेट्टी आणि तेथून पुढे गेटवे-आॅफ इंडिया मुंबई ही अवघ्या दोन तासांची सागरी प्रवासी वाहतूक यंदापासून बारमाही सुरू राहणार आहे.

- जयंत धुळप, अलिबाग

अलिबागहून बसने मांडवा जेट्टी आणि तेथून पुढे गेटवे-आॅफ इंडिया मुंबई ही अवघ्या दोन तासांची सागरी प्रवासी वाहतूक यंदापासून बारमाही सुरू राहणार आहे. त्यासाठी आवश्यक मांडवा जेट्टीसमोरच्या समुद्रात ‘ब्रेक वॉटर वॉल’चे काम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ९० कोटी रुपयांचा निधी या कामाकरिता उपलब्ध करून देण्यात आला असून, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’चे काम प्रत्यक्षात सुरू झाले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. समुद्रात बांधण्यात येत असलेल्या या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’करिता मोठ्या प्रमाणात मोठे दगड आवश्यक असतात, ते मांडवा येथे बोटीच्या माध्यमातून आणण्यात येत आहेत. आमदार जयंत पाटील यांनी या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’करिता पाठपुरावा केल्यावर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’चे महत्त्व विचारात घेऊन त्यास मान्यता दिली.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खारलॅण्ड मंत्री अ‍ॅड. दत्ता खानविलकर यांनी ‘मांडवा बे्रक वॉटर वॉल’ची संकल्पना वीस वर्षांपूर्वी सर्वप्रथम मांडली होती. खोल समुद्रातील वेगवान लाटा भरतीच्या वेळी थेट मांडवा किनाऱ्यांवर येऊन आदळतात. पावसाळ्यात धरमतर खाडीमार्गे वेगाने समुद्रात येणारे पावसाचे पाणी यामुळे मांडवा जेट्टीसमोरील समुद्रात तात्पुरत्या ‘सागरी भोवऱ्यां’ची निर्मिती होते. आणि या भोवऱ्यात प्रवासी बोट भरकटून अपघातांची शक्यता असल्याने पावसाळ्यातील जून, जुलै आणि प्रसंगी पावसाचा जोर विचारात घेता आॅगस्ट अशा दोन ते तीन महिन्यांच्या काळात येथील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येत असे. या नैसर्गिक समस्येवर मात करून पावसाळ्यातील या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीतही मुंबई गेटवे ते मांडवा (अलिबाग) यादरम्यानची सागरी प्रवासी वाहतूक सुरक्षितरीत्या सुरूठेवण्याकरिता मांडवा जेट्टीच्या समोरील खोल समुद्रात उत्तर-दक्षिण अशी मांडवा सागरी किनारा यामध्ये दगडी भिंत बांधण्याची संकल्पना होती. सागरी दगडी भिंतीमुळे, मांडवा जेट्टीला प्रवासी बोटी लागताना त्या पाण्याच्या भोवऱ्यात हेलकावणार नाहीत आणि जेट्टीच्या भिंतीवर आदळून अपघातांची शक्यता शिल्लक राहाणार नाही. पावसाळी पर्यटनात १ लाख ५०० पर्यटकांची वाढ शक्य------ गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) या सागरी मार्गावर प्रतिदिन प्रवासी संख्या दोन हजार आहे. वार्षिक प्रवासी संख्या १० लाखाच्या वर आहे. मुंबई-अलिबागदरम्यानचा अत्यंत सोईचा आणि अल्पवेळ प्रवासी मार्ग म्हणून अलिबाग परिसरातून सुमारे ७०० ते ८०० लोक यामार्गे दररोज नोकरी व अन्य व्यावसायिक कारणास्तव ये-जा करीत असतात. आता त्यांची पावसाळ्यातील अडचणही दूर होऊ शकतील.- पावसाळ्याच्या दोन ते अडीच महिन्यांच्या काळात सुमारे १ लाख ५० हजार पर्यटक प्रवाशांची वाढ आता होऊ शकणार असल्याने, बारमाही पर्यटन व्यवसाय अलिबाग ते मुरुड या किनारपट्टीत होऊ शकणार आहे. सद्य:स्थितीत ५०० खासगी बोटी मांडवा किनारी असतात. या बोटींवरील दररोजच्या एकूण ६ हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मांडवा परिसरातील बाजार-व्यापार वृद्धिंगत होऊ शकणार असल्याने स्थानिकांना नव्या व्यावसायिक संधीदेखील उपलब्ध होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.