शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
4
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
5
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
6
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
7
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
8
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
9
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
10
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
11
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
12
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
13
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
14
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
15
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
16
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
17
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
18
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
19
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
20
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

गेटवे-मांडवा सागरी प्रवासी वाहतूक होणार बारमाही

By admin | Updated: January 31, 2017 02:04 IST

अलिबागहून बसने मांडवा जेट्टी आणि तेथून पुढे गेटवे-आॅफ इंडिया मुंबई ही अवघ्या दोन तासांची सागरी प्रवासी वाहतूक यंदापासून बारमाही सुरू राहणार आहे.

- जयंत धुळप, अलिबाग

अलिबागहून बसने मांडवा जेट्टी आणि तेथून पुढे गेटवे-आॅफ इंडिया मुंबई ही अवघ्या दोन तासांची सागरी प्रवासी वाहतूक यंदापासून बारमाही सुरू राहणार आहे. त्यासाठी आवश्यक मांडवा जेट्टीसमोरच्या समुद्रात ‘ब्रेक वॉटर वॉल’चे काम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ९० कोटी रुपयांचा निधी या कामाकरिता उपलब्ध करून देण्यात आला असून, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’चे काम प्रत्यक्षात सुरू झाले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. समुद्रात बांधण्यात येत असलेल्या या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’करिता मोठ्या प्रमाणात मोठे दगड आवश्यक असतात, ते मांडवा येथे बोटीच्या माध्यमातून आणण्यात येत आहेत. आमदार जयंत पाटील यांनी या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’करिता पाठपुरावा केल्यावर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’चे महत्त्व विचारात घेऊन त्यास मान्यता दिली.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खारलॅण्ड मंत्री अ‍ॅड. दत्ता खानविलकर यांनी ‘मांडवा बे्रक वॉटर वॉल’ची संकल्पना वीस वर्षांपूर्वी सर्वप्रथम मांडली होती. खोल समुद्रातील वेगवान लाटा भरतीच्या वेळी थेट मांडवा किनाऱ्यांवर येऊन आदळतात. पावसाळ्यात धरमतर खाडीमार्गे वेगाने समुद्रात येणारे पावसाचे पाणी यामुळे मांडवा जेट्टीसमोरील समुद्रात तात्पुरत्या ‘सागरी भोवऱ्यां’ची निर्मिती होते. आणि या भोवऱ्यात प्रवासी बोट भरकटून अपघातांची शक्यता असल्याने पावसाळ्यातील जून, जुलै आणि प्रसंगी पावसाचा जोर विचारात घेता आॅगस्ट अशा दोन ते तीन महिन्यांच्या काळात येथील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येत असे. या नैसर्गिक समस्येवर मात करून पावसाळ्यातील या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीतही मुंबई गेटवे ते मांडवा (अलिबाग) यादरम्यानची सागरी प्रवासी वाहतूक सुरक्षितरीत्या सुरूठेवण्याकरिता मांडवा जेट्टीच्या समोरील खोल समुद्रात उत्तर-दक्षिण अशी मांडवा सागरी किनारा यामध्ये दगडी भिंत बांधण्याची संकल्पना होती. सागरी दगडी भिंतीमुळे, मांडवा जेट्टीला प्रवासी बोटी लागताना त्या पाण्याच्या भोवऱ्यात हेलकावणार नाहीत आणि जेट्टीच्या भिंतीवर आदळून अपघातांची शक्यता शिल्लक राहाणार नाही. पावसाळी पर्यटनात १ लाख ५०० पर्यटकांची वाढ शक्य------ गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) या सागरी मार्गावर प्रतिदिन प्रवासी संख्या दोन हजार आहे. वार्षिक प्रवासी संख्या १० लाखाच्या वर आहे. मुंबई-अलिबागदरम्यानचा अत्यंत सोईचा आणि अल्पवेळ प्रवासी मार्ग म्हणून अलिबाग परिसरातून सुमारे ७०० ते ८०० लोक यामार्गे दररोज नोकरी व अन्य व्यावसायिक कारणास्तव ये-जा करीत असतात. आता त्यांची पावसाळ्यातील अडचणही दूर होऊ शकतील.- पावसाळ्याच्या दोन ते अडीच महिन्यांच्या काळात सुमारे १ लाख ५० हजार पर्यटक प्रवाशांची वाढ आता होऊ शकणार असल्याने, बारमाही पर्यटन व्यवसाय अलिबाग ते मुरुड या किनारपट्टीत होऊ शकणार आहे. सद्य:स्थितीत ५०० खासगी बोटी मांडवा किनारी असतात. या बोटींवरील दररोजच्या एकूण ६ हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मांडवा परिसरातील बाजार-व्यापार वृद्धिंगत होऊ शकणार असल्याने स्थानिकांना नव्या व्यावसायिक संधीदेखील उपलब्ध होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.