शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महाड तालुक्यात गारठा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 00:17 IST

उत्तर भारतात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी आठवडाभर आधीच दाखल झाली असली, तरी महाड तालुक्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागला आहे.

दासगाव : उत्तर भारतात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी आठवडाभर आधीच दाखल झाली असली, तरी महाड तालुक्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागला आहे. यामुळे थंडीमध्ये लागणारे उष्ण कपडे खरेदीमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम पिकांवरही जाणवू लागला आहे.साधारणपणे पावसाळा गेल्यानंतर लगेचच थंडी पडू लागते. यावर्षी लांबलेला पाऊस आणि अवेळी पडणारा पाऊस यामुळे थंडी किमान एक महिना पुढे सरकली. यामुळे यावर्षी महाड तालुक्यात अद्याप थंडी जाणवत नव्हती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागल्याने सर्वत्र हुडहुडी निर्माण झाली आहे. यामुळे महाड तालुक्यात पहाटेपासून दव पडून दाट धुकेही पडू लागले आहे. या धुक्यामुळे पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडणेही कठीण होऊन बसले आहे. दाट धुके आणि दव यामुळे वाहनचालकांनाही त्रास होत आहे. थंडीतून वाचण्यासाठी दुचाकीचालक आणि सर्वसामान्य नागरिक उष्ण कपडे खरेदीसाठी कपड्याच्या दुकानात गर्दी करू लागले आहेत.स्वेटर, हातमोजे, पायमोजे, याचबरोबर तोंडाचा मास्क, शाल, मफलर आदी प्रकारच्या कपड्यांची मागणी वाढली आहे. नेपाळमधून विक्रीस येणारे विक्रेते गेली काही वर्षे या विभागात फिरकले नसल्याने दुकानात मात्र अधिक दराने या कपड्यांची खरेदी ग्राहकांना करावी लागत आहे.थंडीच्या दिवसात मात्र महाडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली असली तरी किल्ले रायगडावर मात्र गर्दी कायम आहे. रायगडावरील थंडी आणि धुक्यात हरवलेला निसर्ग अनुभवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून गर्दी वाढू लागली आहे. थंडीमुळे ग्रामीण भागातील पोपटी लावण्याची संख्याही वाढली आहे. उशिरा गेलेला पावसाळा आणि लांबलेली कडधान्य लागवड यामुळे यावर्षी पोपटीसाठी लागणारा पावटाही अद्याप म्हणावा तसा बाजारात दाखल झालेला नाही. थंडीचा फटकाही कडधान्य, आंबा मोहोर आणि इतर पिकांना बसण्याची शक्यात निर्माण झाली आहे. पडणाºया दवाचा फायदा कांही अंशी पिकांना होणार असला तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही कृषी तज्ज्ञांनी केले आहे.>नागरिकांच्या आरोग्यावर परिणामदिवसा जाणवणारा उष्मा आणि रात्री पडणारी कडाक्याची थंडी यामुळे मानवी आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत. हवेमध्ये आर्द्रता निर्माण होत असल्याने सर्दी, खोकला, यासारखे सामान्य वाटणारे आजारही जाणवू लागले आहेत. यामुळे दावाखान्यातही उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. श्वसनाचे विकार असलेल्यांनाही थंडी त्रासदायक ठरत आहे. याकरिता या काळात उष्ण पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे. या दिवसात त्वचा शुष्क होत असल्याने त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.