शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यात गारठा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 00:17 IST

उत्तर भारतात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी आठवडाभर आधीच दाखल झाली असली, तरी महाड तालुक्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागला आहे.

दासगाव : उत्तर भारतात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी आठवडाभर आधीच दाखल झाली असली, तरी महाड तालुक्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागला आहे. यामुळे थंडीमध्ये लागणारे उष्ण कपडे खरेदीमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम पिकांवरही जाणवू लागला आहे.साधारणपणे पावसाळा गेल्यानंतर लगेचच थंडी पडू लागते. यावर्षी लांबलेला पाऊस आणि अवेळी पडणारा पाऊस यामुळे थंडी किमान एक महिना पुढे सरकली. यामुळे यावर्षी महाड तालुक्यात अद्याप थंडी जाणवत नव्हती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागल्याने सर्वत्र हुडहुडी निर्माण झाली आहे. यामुळे महाड तालुक्यात पहाटेपासून दव पडून दाट धुकेही पडू लागले आहे. या धुक्यामुळे पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडणेही कठीण होऊन बसले आहे. दाट धुके आणि दव यामुळे वाहनचालकांनाही त्रास होत आहे. थंडीतून वाचण्यासाठी दुचाकीचालक आणि सर्वसामान्य नागरिक उष्ण कपडे खरेदीसाठी कपड्याच्या दुकानात गर्दी करू लागले आहेत.स्वेटर, हातमोजे, पायमोजे, याचबरोबर तोंडाचा मास्क, शाल, मफलर आदी प्रकारच्या कपड्यांची मागणी वाढली आहे. नेपाळमधून विक्रीस येणारे विक्रेते गेली काही वर्षे या विभागात फिरकले नसल्याने दुकानात मात्र अधिक दराने या कपड्यांची खरेदी ग्राहकांना करावी लागत आहे.थंडीच्या दिवसात मात्र महाडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली असली तरी किल्ले रायगडावर मात्र गर्दी कायम आहे. रायगडावरील थंडी आणि धुक्यात हरवलेला निसर्ग अनुभवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून गर्दी वाढू लागली आहे. थंडीमुळे ग्रामीण भागातील पोपटी लावण्याची संख्याही वाढली आहे. उशिरा गेलेला पावसाळा आणि लांबलेली कडधान्य लागवड यामुळे यावर्षी पोपटीसाठी लागणारा पावटाही अद्याप म्हणावा तसा बाजारात दाखल झालेला नाही. थंडीचा फटकाही कडधान्य, आंबा मोहोर आणि इतर पिकांना बसण्याची शक्यात निर्माण झाली आहे. पडणाºया दवाचा फायदा कांही अंशी पिकांना होणार असला तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही कृषी तज्ज्ञांनी केले आहे.>नागरिकांच्या आरोग्यावर परिणामदिवसा जाणवणारा उष्मा आणि रात्री पडणारी कडाक्याची थंडी यामुळे मानवी आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत. हवेमध्ये आर्द्रता निर्माण होत असल्याने सर्दी, खोकला, यासारखे सामान्य वाटणारे आजारही जाणवू लागले आहेत. यामुळे दावाखान्यातही उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. श्वसनाचे विकार असलेल्यांनाही थंडी त्रासदायक ठरत आहे. याकरिता या काळात उष्ण पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे. या दिवसात त्वचा शुष्क होत असल्याने त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.