शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला! गौरी गणपतीचं शांततेत विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:03 IST

विशेष म्हणजे कोकणातील घरगुती गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण उत्साहात साजरा होतो. या वर्षीही आळीगलीतून घरोघरी रात्रंदिवस भजनाने भक्तीमय वातावरण दिसून आले.

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील घरगुती गौरीगणपतींचे विसर्जन उत्साहात करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. या वेळी बोर्लीपंचतन परिसरात सार्वजनिक १ तर ४५०५ घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यातील ९०० गौरींचे व २५०० गणेशमूर्ती मिळून एकूण ३४०० गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गेले पाच दिवस ज्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली, त्या बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला.

विशेष म्हणजे कोकणातील घरगुती गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण उत्साहात साजरा होतो. या वर्षीही आळीगलीतून घरोघरी रात्रंदिवस भजनाने भक्तीमय वातावरण दिसून आले. तर दुसरीकडे बहुंताश ठिकाणी गणेशोत्सवातून सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. या वेळी बोर्लीपंचतन येथील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतोय. त्याचप्रमाणे विर्सजन सोहळा र्निविघ्न पार पाडण्यासाठी पोलीस व जीवरक्षक तैनात होते.गणराय विराजमान होण्याचा दिवस यानंतर पाच दिवसांमध्ये घरोघरी बाप्पासमोर भजन, आरतीने केले जाणारे जागरण, तो क्षण पाहता सर्व उत्सवावर कोरोनाचे सावट असताना या गणेशोत्सवामुळे सर्वत्र नवचैतन्य आले होते. गुरुवारी आपल्या बाप्पाचे विसर्जन होणार असल्याने भक्तगणात थोडीफार नाराजी दिसून येते. मात्र, यावर भक्तगण उत्साही अशा संमिश्र वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत आणि पुढल्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत गणरायाला भावपूर्ण निरोप देत होते.तळा तालुक्यात साधेपणाने निरोपशनिवारी २२ आॅगस्ट रोजी विराजमान झालेल्या गणपतींना पाच दिवसांच्या सेवेनंतर गौरीसह साधेपणाने निरोप देण्यात आला. दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करणारे गणेशभक्त बाप्पाचे विसर्जनही तितक्याच उत्साहात करतात. मात्र यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट असल्याने या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी कोरोनाचा धसका एवढा घेतला की उत्साहाचे उसने अवसान आणल्यासारखा हा उत्सव साजरा करण्यात आला. आरती, भजनाचे सूर तर दूर राहिले घराघरांत वाजविली जाणारी गणेशगीतेही कानावर पडली नाहीत. नागरिकांनी कोणताही गाजावाजा न करता हातगाडीवर गणपतीची विसर्जन मिरवणूक काढली. विसर्जन घाटावर तळा नगरपंचायतीकडून निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. आरती समाप्तीनंतर भाविकांकडून आपल्या लाडक्या गणरायाला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला.नागोठणेत अंबा नदीच्या घाटावर शांततेत विसर्जनगौरी - गणपतीचा विसर्जन सोहळा शहरात गुरुवारी विविध ठिकाणी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. दुपारी तीननंतरच शहराच्या विविध भागांतील गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले होते. आंगरआळीतील गणेशमूर्ती शृंगार तळे, खडकआळीतील जोगेश्वरी मंदिरासमोरील तलावात तर, प्रभुआळीतील गणेशमूर्तींचे रामेश्वर मंदिरासमोरील तलावात विसर्जन करण्यात आले. मुख्य विसर्जन सोहळा अंबा नदीच्या घाटावर पार पडला. या ठिकाणी दुपारी साडेतीनला पहिल्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जनासाठी गणपतीच्या मूर्तींची रांग लागण्यास प्रारंभ झाला होता.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव