शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला

By admin | Updated: September 7, 2016 03:16 IST

तालुक्यात दीड दिवसाच्या ८१५ बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तगणांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’

रोहा : तालुक्यात दीड दिवसाच्या ८१५ बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तगणांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हणत बाप्पाला निरोप दिला. यावेळी शहरातील विसर्जन स्थळांवर गर्दी झाली होती. यासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त होता.रोहा नगर पालिकेचे नगराध्यक्ष समीर शेडगे व मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर योग्य ती व्यवस्था आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मुख्याधिकारी प्रकाश पाटील हे स्वत: विसर्जन स्थळांवरील सुविधांबाबत लक्ष ठेवून कर्मचाऱ्यांना सूचना देत होते. दुपारी ३ वाजल्यानंतर एकामागून एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नदीकिनारी निघाले होते. तत्पूर्वी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दुपारी शहरातील विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे राहावेत यासाठी प्रशासकीय वाहनांमधून सायरन देत पेट्रोलिंग करण्यात आले. यामध्ये महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.भक्तगणांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे गजर करीत आपल्या बाप्पांचे कुंडलिका नदीकिनारी भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये विसर्जन मार्गावर आणि नदीकिनारी चोख पोलीस बंदोबस्त होता. रोहा तालुक्यात दीड दिवसाच्या एकू ण८१५ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहिती रोहा पोलीस ठाण्याचे सुजय मगर यांनी दिली.जिल्ह्यात २४ हजार २६४ घरगुती गणपतींचे शांततेत विसर्जन1अलिबाग : सोमवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालेल्या आणि दीड दिवस मुक्कामास आलेल्या गणरायांना ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ अशी विनंती करुन अत्यंत भावपूर्ण वातावरणात जिल्ह्यातील ५ समुद्र किनारी, ३० तलाव, १९ नदी किनारी आणि दोन खाडी किनारी निरोप देण्यात आला. दीड दिवसाच्या १२ सार्वजनिक तर २४ हजार २६४ घरगुती गणपतींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले.2विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मोठ्या आवाजाच्या डीजे सिस्टीमऐवजी पारंपरिक वाद्यांच्या तालावर भजने म्हणत गणरायांना निरोप देण्याची मानसिकता यंदा मोठ्या प्रमाणात दिसून आली. शासनाने निश्चित केलेल्या ‘ना आवाज’ क्षेत्रात वाद्ये देखील वाजविण्यात आली नाहीत. स्वेच्छेने शिस्तपालन करण्यात आल्याने पोलिसांचे काम कमी झाले. गणेशोत्सवापूर्वी घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकांमुळे गणेशभक्तांनी नियमांचे पालन के ले.3गणेश विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य कारणास्तव अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस सूत्रांनी दिली. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनानंतर रात्री मोठ्या प्रमाणात गणेशभक्त मुंबईकडे निघण्याची शक्यता विचारात घेऊन परतीच्या सुकर प्रवासाकरिता गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतुकीतील व्यत्यय टाळण्यासाठी गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली.