शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

उरण तहसीलवर शेतकºयांचा मोर्चा ; गैरव्यवहार करणाºयांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:22 IST

करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीच्या बंदर उभारणीच्या कामात गैरव्यवहारामध्ये सहभागी झालेल्या सिडको, महाराष्टÑ मेरीटाइम बोर्ड आणि करंजा अधिकाºयांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि अन्य मागण्यांबाबत बुधवारी (१४) येथील शेतकºयांनी उरण कार्यालयावरच मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.

उरण : करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीच्या बंदर उभारणीच्या कामात गैरव्यवहारामध्ये सहभागी झालेल्या सिडको, महाराष्टÑ मेरीटाइम बोर्ड आणि करंजा अधिकाºयांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि अन्य मागण्यांबाबत बुधवारी (१४) येथील शेतकºयांनी उरण कार्यालयावरच मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात शेतकºयांसह शेकडो महिलाही सहभागी झाल्या होत्या.उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत टर्मिनल अ‍ॅण्ड प्रा. लि. कंपनीने बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. करंजा खाडीत शेकडो हेक्टरवर उभारण्यात येत असलेल्या बंदरासाठी येथील ९० शेतकºयांच्या २०० एकर जमिनी संपादित केल्या आहेत. २००५-२००६ साली जमिनी संपादित करताना पाच वर्षांत प्रकल्प उभारण्याची आणि प्रकल्पग्रस्तांना घरटी तीन कायमस्वरूपी नोकºया देण्याची हमी देण्यात आली होती. मात्र, १४ वर्षांत ना धड बंदराची उभारणी झाली, ना धड प्रकल्पग्रस्तांना नोकºया मिळाल्या. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. उलट जमिनी संपादन करताना शेतकºयांना जमिनीच्या मोबदल्याची रक्कम देताना अज्ञानाचा फायदा घेत पॉवर आॅफ अ‍ॅटर्नी करून घेतली होती. शेतकºयांच्या या पॉवर आॅफ अ‍ॅटर्नीचा गैरफायदा घेत करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनीने महाराष्टÑ मेरीटाइम बोर्ड, सिडकोकडून बंदर उभारणीच्या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळविल्या असल्याचा आरोप चाणजे शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. चाणजे सर्व्हे नं. ४२२/४२३मध्ये बंदराच्या उभारणीसाठी समुद्रखाडीत भरावाचे काम केले होते. समुद्रखाडीतील भरावामुळे मात्र गावागावांत समुद्राचे पाणी शिरू लागले होते. समुद्राचे पाणी शेतीत आणि गावात शिरू नये, यासाठी त्याला अटकाव करण्यासाठी कंपनीने साकव उभारला होता. तसेच या मार्गावरून अवजड वाहने जाऊ नयेत, यासाठी हाइट गेटही उभारण्यात आले होते. मात्र, कंपनीने संबंधित शासकीय अधिकाºयांना हाताशी धरून आणि शेतकºयांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, हाइट गेट काढून टाकले आहेत. त्याचे परिणाम होऊन साकवही कमजोर झाला आहे. त्यावरून आता कंपनीचीच अवजड वाहन ये-जा करीत असल्याचा चाणजे शेतकरी संघर्ष समितीचा आरोप आहे.करंजा टर्मिनल अ‍ॅण्ड लॉजिस्टिक कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे धरणे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली.शेतकºयांच्या मागण्याशेतकºयांच्या जमीन सुरक्षिततेसाठी असलेल्या साकवाचाच गैरवापर थांबवा, बेकायदेशीररीत्या काढण्यात आलेले हाइट गेट पूर्ववत सुरू करा, बंदर उभारणीच्या कामात गैरव्यवहारांमध्ये सहभागी झालेल्या सिडको, महाराष्टÑ मेरीटाइम बोर्ड आणि करंजा टर्मिनल अधिकाºयांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, कंत्राटी कामे आणि नोकर भरतीमध्ये बाधित शेतकºयांना प्राधान्य देण्यात यावे आदी प्रमुख मागण्या आहेत.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी