शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

१ सप्टेंबरपासून रेवस-भाऊचा धक्का प्रवासी बोट सेवा सुरू; १०० रुपयांत करा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 20:07 IST

भाऊचा धक्का -मोरा मार्गावरील तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार : ऐन गणपती सणातच अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा 

मधुकर ठाकूर

उरण : मागील तीन महिने पावसाळी हंगामात बंद करण्यात आलेली रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावर १ सप्टेंबर पासून प्रवासी बोट सेवा पुर्ववत सुरू होणार आहे.तर भाऊचा धक्का - मोरा दरम्यान पावसाळी हंगामात वाढविण्यात आलेला तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार आहे.यामुळे ऐन गणपती सणातच सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतूकमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच मोरा सागरी प्रवासही स्वस्त होणार असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

वारंवार बदलणारे वादळी व खराब, मुसळधार पाऊस, हवामान समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. या सागरी मार्गावरील तिकिट दर १०० रुपये आहे.तर गेटवे -मांडवा मार्गावरील स्पीडबोट आणि  रो-रो बोटसेवा यांच्या तिकिट दरांपेक्षा सर्वसामान्यांना रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवास परवडतो.त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवासी या मार्गावरुन प्रवास करतात.    

मात्र जुन ते ३१ ऑगस्ट दरम्यान तीन महिन्यांसाठी या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुक बंद ठेवण्यात आलेली प्रवासी बोट सेवा १ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.ऐन गणपती सणातच १ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या रेवस - भाऊचा धक्का दरम्यानच्या प्रवासी लॉचेसमुळे अलिबाग -कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तर भाऊचा धक्का -मोरा दरम्यान दरवर्षी पावसाळी हंगामात  तिकिट दरात वाढ केली जाते.त्यामुळे पावसाळी हंगामात भाऊचा धक्का -मोरा दरम्यान तिकिट दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

१ सप्टेंबर पासून पावसाळी हंगाम संपुष्टात येणार असल्याने तिकिट दरात करण्यात आलेली २५ रुपयांची वाढ कमी करण्यात येणार आहे.यामुळे  भाऊचा धक्का -मोरा दरम्यान प्रवाशांना तिकिटासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.यामुळे या सागरी मार्गावरील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.