शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

१ सप्टेंबरपासून रेवस-भाऊचा धक्का प्रवासी बोट सेवा सुरू; १०० रुपयांत करा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 20:07 IST

भाऊचा धक्का -मोरा मार्गावरील तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार : ऐन गणपती सणातच अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा 

मधुकर ठाकूर

उरण : मागील तीन महिने पावसाळी हंगामात बंद करण्यात आलेली रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावर १ सप्टेंबर पासून प्रवासी बोट सेवा पुर्ववत सुरू होणार आहे.तर भाऊचा धक्का - मोरा दरम्यान पावसाळी हंगामात वाढविण्यात आलेला तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार आहे.यामुळे ऐन गणपती सणातच सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतूकमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच मोरा सागरी प्रवासही स्वस्त होणार असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

वारंवार बदलणारे वादळी व खराब, मुसळधार पाऊस, हवामान समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. या सागरी मार्गावरील तिकिट दर १०० रुपये आहे.तर गेटवे -मांडवा मार्गावरील स्पीडबोट आणि  रो-रो बोटसेवा यांच्या तिकिट दरांपेक्षा सर्वसामान्यांना रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवास परवडतो.त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवासी या मार्गावरुन प्रवास करतात.    

मात्र जुन ते ३१ ऑगस्ट दरम्यान तीन महिन्यांसाठी या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुक बंद ठेवण्यात आलेली प्रवासी बोट सेवा १ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.ऐन गणपती सणातच १ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या रेवस - भाऊचा धक्का दरम्यानच्या प्रवासी लॉचेसमुळे अलिबाग -कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तर भाऊचा धक्का -मोरा दरम्यान दरवर्षी पावसाळी हंगामात  तिकिट दरात वाढ केली जाते.त्यामुळे पावसाळी हंगामात भाऊचा धक्का -मोरा दरम्यान तिकिट दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

१ सप्टेंबर पासून पावसाळी हंगाम संपुष्टात येणार असल्याने तिकिट दरात करण्यात आलेली २५ रुपयांची वाढ कमी करण्यात येणार आहे.यामुळे  भाऊचा धक्का -मोरा दरम्यान प्रवाशांना तिकिटासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.यामुळे या सागरी मार्गावरील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.