शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

१ सप्टेंबरपासून रेवस-भाऊचा धक्का प्रवासी बोट सेवा सुरू; १०० रुपयांत करा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 20:07 IST

भाऊचा धक्का -मोरा मार्गावरील तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार : ऐन गणपती सणातच अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा 

मधुकर ठाकूर

उरण : मागील तीन महिने पावसाळी हंगामात बंद करण्यात आलेली रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावर १ सप्टेंबर पासून प्रवासी बोट सेवा पुर्ववत सुरू होणार आहे.तर भाऊचा धक्का - मोरा दरम्यान पावसाळी हंगामात वाढविण्यात आलेला तिकिट दर २५ रुपयांनी कमी होणार आहे.यामुळे ऐन गणपती सणातच सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतूकमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच मोरा सागरी प्रवासही स्वस्त होणार असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

वारंवार बदलणारे वादळी व खराब, मुसळधार पाऊस, हवामान समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. या सागरी मार्गावरील तिकिट दर १०० रुपये आहे.तर गेटवे -मांडवा मार्गावरील स्पीडबोट आणि  रो-रो बोटसेवा यांच्या तिकिट दरांपेक्षा सर्वसामान्यांना रेवस - भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवास परवडतो.त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवासी या मार्गावरुन प्रवास करतात.    

मात्र जुन ते ३१ ऑगस्ट दरम्यान तीन महिन्यांसाठी या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुक बंद ठेवण्यात आलेली प्रवासी बोट सेवा १ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.ऐन गणपती सणातच १ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या रेवस - भाऊचा धक्का दरम्यानच्या प्रवासी लॉचेसमुळे अलिबाग -कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तर भाऊचा धक्का -मोरा दरम्यान दरवर्षी पावसाळी हंगामात  तिकिट दरात वाढ केली जाते.त्यामुळे पावसाळी हंगामात भाऊचा धक्का -मोरा दरम्यान तिकिट दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

१ सप्टेंबर पासून पावसाळी हंगाम संपुष्टात येणार असल्याने तिकिट दरात करण्यात आलेली २५ रुपयांची वाढ कमी करण्यात येणार आहे.यामुळे  भाऊचा धक्का -मोरा दरम्यान प्रवाशांना तिकिटासाठी आता ८० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.यामुळे या सागरी मार्गावरील प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.