शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

ओएनजीसी प्रकल्पात वारंवार तेल गळती! शेतकरी, मच्छीमार संतप्त; साफसफाईचे काम बंद पाडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 17:47 IST

ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइलच्या साठवण टाकीला शुक्रवारी पहाटे गळती लागली.

मधुकर ठाकूर

उरण : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या तेल गळती आणि आगीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांची सुरक्षा, आरोग्याबरोबर स्थानिक मासेमारी, शेतीही धोक्यात आल्याने संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी ओएनजीसीने सुरू केलेले किनाऱ्यावर पसरलेले ऑईल जमा करण्याचे काम रात्री उशिराने बंद पाडले. येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइलच्या साठवण टाकीला शुक्रवारी पहाटे गळती लागली.

नाल्यातुन वाहत गेलेले क्रूड ऑइल थेट समुद्रात पोहचल्याने पीरवाडी बीचवरील समुद्राच्या पाण्यावर तेलतवंग दिसु लागले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या सागरी प्रदुषणामुळे परिसरातील भातशेती व स्थानिक मासेमारीही धोक्यात आली आहे. ओएनजीसी व्यवस्थापनाकडून शुक्रवार पहाटेपासूनच किनाऱ्यावर जमा झालेले ऑईलचे जाड थर कामगार लाऊन ड्रम, बादली, सक्शन पंपने गोळा केले जात आहे.मात्र वारंवार घडणाऱ्या तेल गळती आणि आगीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांची सुरक्षा, आरोग्याबरोबर स्थानिक मासेमारी, शेतीही धोक्यात आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ओएनजीसीने सुरू केलेले किनाऱ्यावर पसरलेले ऑईल जमा करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिराने बंद पाडले.

यावेळी तेल गळतीमुळे मच्छीमार, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणीही संतप्त नागरिकांनी केली. ओएनजीसीने किनाऱ्यावर जमा झालेले ऑईलचे  गोळा करण्यात येणारे काम बंद केल्यानंतर घटनास्थळी पोलिस आणि तहसीलदारांनी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली.त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी ओएनजीसीकडे पाठविण्यात येतील. आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याचे आश्वासन उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांच्या मध्यस्थीने मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतरच किनारा साफसफाईचे काम पुन्हा सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार कदम यांनी दिली.

...तय्यार है हम  तहसीलदारांशी पुढील आठवड्यात आर्थिक नुकसान भरपाईच्या प्रश्नावर बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत होणाऱ्या चर्चेनंतर शेतकरी, स्थानिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई दिली जाईल अशी माहिती ओएनजीसीचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांनी दिली. तसेच प्रकल्पातील तेलगळती नियंत्रणात आली आहे. किनाऱ्यावरील वाहून गेलेले तेलही जमा करण्यात यश आले असल्याचेही बोस यांनी सांगितले.

दरम्यान उरण ओएनजीसीच्या तेल गळतीची चौकशी करून बाधित शेतकरी व मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी कोकण किनारा मच्छीमार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. यासाठी उरण तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले आहे. याप्रसंगी संघटनेचे मधुसूदन म्हात्रे, भुषण पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण