शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

महाड एमआयडीसीतील मोकळ्या जागांचे झाले गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:01 IST

पावसाळा संपून दीड महिना झाला. आता ग्रामीण भागातून वाहणारे नाले आणि शेतजमिनी कोरड्या झाल्या आहेत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याची अशी कुपी सापडली आहे की

सिकंदर अनवारे दासगाव : पावसाळा संपून दीड महिना झाला. आता ग्रामीण भागातून वाहणारे नाले आणि शेतजमिनी कोरड्या झाल्या आहेत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याची अशी कुपी सापडली आहे की, महाड औद्योगिक वसाहतीमधील मोकळ्या जागा, गटारनाले पाणी भरून वाहत आहेत. कारखान्यांच्या संरक्षण भिंतीबाहेर गटाराला एकही पाण्याचा थेंब येता कामा नाही, असा औद्योगिक वसाहतीचा नियम आहे. मात्र, या नियमांची पायमल्ली करत कारखानदार गटार आणि नाल्यामध्ये पाणी सोडण्याचे काम करत आहेत. कारखान्याच्या या गोरखधंद्याकडे महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचे दुर्लक्ष होत आहे.प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारखान्यांच्या बाहेर गटार अगर नाल्यांना पाण्याचा एकही थेंब येता कामा नये, असा नियम महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने कारखानदारांना घालून दिला आहे. कारखाने आणि रस्ते यांच्यामध्ये छोटे गटार अगर नाल्यातून केवळ पावसाळी पाणी वहावे हीच अपेक्षा आहे. मात्र, महाराष्टÑ औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याबाहेरील गटार अगर नाले वर्षाच्या बाराही महिने पाण्याने भरून वाहत आहेत. हे नाले अगर गटार पुढे जाऊन मोकळ्या जागांना तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. मोकळ्या जागांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये केमिकलचा अंश असल्याचे पाण्याचा रंग आणि त्यावर निर्माण झालेला तवंग दिसून येत आहे.औद्योगिक वसाहतीमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्टÑ औद्योगिक वसाहती महामंडळाच्या अखत्यारित येते. यासाठी दोन्ही विभागाक डे तज्ज्ञ स्टाफ (मानस) आहेत. असे असले तरी देखील औद्योगिक वसाहतीतील हे नाले अगर गटार वाहताना दिसत आहेत. याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही. अधिकारी कारवाई करत नाही हा एक भाग असला तरी कारखानदार देखील नियमांची पायमल्ली करत आहेत.दुर्गंधी, मच्छरांचा त्रासऔद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागांमध्ये साचलेले पाणी सर्वच ठिकाणी प्रदूषित आहे. यामुळे येथील नागरिक आणि कामगारांना याचा त्रास सहन करावा लगात आहे. प्रदूषित पाणी उन्हात तापून रासायनिक दुर्गंधी निर्माण करीत आहे, तर प्रदूषित नसलेले पाणी मच्छर आणि जंगली कीटकांच्या पैदासीचे कारण ठरत आहे. यामुळे या मोकळ्या जागा भराव टाकून भरून घ्याव्यात आणि उन्हाळ्यामध्ये गटारांमधून वाहणारे पाणी बंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.