शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

महाड एमआयडीसीतील मोकळ्या जागांचे झाले गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:01 IST

पावसाळा संपून दीड महिना झाला. आता ग्रामीण भागातून वाहणारे नाले आणि शेतजमिनी कोरड्या झाल्या आहेत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याची अशी कुपी सापडली आहे की

सिकंदर अनवारे दासगाव : पावसाळा संपून दीड महिना झाला. आता ग्रामीण भागातून वाहणारे नाले आणि शेतजमिनी कोरड्या झाल्या आहेत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याची अशी कुपी सापडली आहे की, महाड औद्योगिक वसाहतीमधील मोकळ्या जागा, गटारनाले पाणी भरून वाहत आहेत. कारखान्यांच्या संरक्षण भिंतीबाहेर गटाराला एकही पाण्याचा थेंब येता कामा नाही, असा औद्योगिक वसाहतीचा नियम आहे. मात्र, या नियमांची पायमल्ली करत कारखानदार गटार आणि नाल्यामध्ये पाणी सोडण्याचे काम करत आहेत. कारखान्याच्या या गोरखधंद्याकडे महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचे दुर्लक्ष होत आहे.प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारखान्यांच्या बाहेर गटार अगर नाल्यांना पाण्याचा एकही थेंब येता कामा नये, असा नियम महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने कारखानदारांना घालून दिला आहे. कारखाने आणि रस्ते यांच्यामध्ये छोटे गटार अगर नाल्यातून केवळ पावसाळी पाणी वहावे हीच अपेक्षा आहे. मात्र, महाराष्टÑ औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याबाहेरील गटार अगर नाले वर्षाच्या बाराही महिने पाण्याने भरून वाहत आहेत. हे नाले अगर गटार पुढे जाऊन मोकळ्या जागांना तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. मोकळ्या जागांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये केमिकलचा अंश असल्याचे पाण्याचा रंग आणि त्यावर निर्माण झालेला तवंग दिसून येत आहे.औद्योगिक वसाहतीमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्टÑ औद्योगिक वसाहती महामंडळाच्या अखत्यारित येते. यासाठी दोन्ही विभागाक डे तज्ज्ञ स्टाफ (मानस) आहेत. असे असले तरी देखील औद्योगिक वसाहतीतील हे नाले अगर गटार वाहताना दिसत आहेत. याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही. अधिकारी कारवाई करत नाही हा एक भाग असला तरी कारखानदार देखील नियमांची पायमल्ली करत आहेत.दुर्गंधी, मच्छरांचा त्रासऔद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागांमध्ये साचलेले पाणी सर्वच ठिकाणी प्रदूषित आहे. यामुळे येथील नागरिक आणि कामगारांना याचा त्रास सहन करावा लगात आहे. प्रदूषित पाणी उन्हात तापून रासायनिक दुर्गंधी निर्माण करीत आहे, तर प्रदूषित नसलेले पाणी मच्छर आणि जंगली कीटकांच्या पैदासीचे कारण ठरत आहे. यामुळे या मोकळ्या जागा भराव टाकून भरून घ्याव्यात आणि उन्हाळ्यामध्ये गटारांमधून वाहणारे पाणी बंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.