शहरं
Join us  
Trending Stories
1
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
2
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
3
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
4
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
5
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
7
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
8
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
9
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
10
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
11
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
12
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
13
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
15
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
16
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
17
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
18
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
19
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
20
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
Daily Top 2Weekly Top 5

महाड एमआयडीसीतील मोकळ्या जागांचे झाले गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:01 IST

पावसाळा संपून दीड महिना झाला. आता ग्रामीण भागातून वाहणारे नाले आणि शेतजमिनी कोरड्या झाल्या आहेत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याची अशी कुपी सापडली आहे की

सिकंदर अनवारे दासगाव : पावसाळा संपून दीड महिना झाला. आता ग्रामीण भागातून वाहणारे नाले आणि शेतजमिनी कोरड्या झाल्या आहेत. मात्र, महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पाण्याची अशी कुपी सापडली आहे की, महाड औद्योगिक वसाहतीमधील मोकळ्या जागा, गटारनाले पाणी भरून वाहत आहेत. कारखान्यांच्या संरक्षण भिंतीबाहेर गटाराला एकही पाण्याचा थेंब येता कामा नाही, असा औद्योगिक वसाहतीचा नियम आहे. मात्र, या नियमांची पायमल्ली करत कारखानदार गटार आणि नाल्यामध्ये पाणी सोडण्याचे काम करत आहेत. कारखान्याच्या या गोरखधंद्याकडे महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचे दुर्लक्ष होत आहे.प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारखान्यांच्या बाहेर गटार अगर नाल्यांना पाण्याचा एकही थेंब येता कामा नये, असा नियम महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाने कारखानदारांना घालून दिला आहे. कारखाने आणि रस्ते यांच्यामध्ये छोटे गटार अगर नाल्यातून केवळ पावसाळी पाणी वहावे हीच अपेक्षा आहे. मात्र, महाराष्टÑ औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याबाहेरील गटार अगर नाले वर्षाच्या बाराही महिने पाण्याने भरून वाहत आहेत. हे नाले अगर गटार पुढे जाऊन मोकळ्या जागांना तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. मोकळ्या जागांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये केमिकलचा अंश असल्याचे पाण्याचा रंग आणि त्यावर निर्माण झालेला तवंग दिसून येत आहे.औद्योगिक वसाहतीमध्ये होणारी प्रत्येक गोष्ट ही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्टÑ औद्योगिक वसाहती महामंडळाच्या अखत्यारित येते. यासाठी दोन्ही विभागाक डे तज्ज्ञ स्टाफ (मानस) आहेत. असे असले तरी देखील औद्योगिक वसाहतीतील हे नाले अगर गटार वाहताना दिसत आहेत. याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही. अधिकारी कारवाई करत नाही हा एक भाग असला तरी कारखानदार देखील नियमांची पायमल्ली करत आहेत.दुर्गंधी, मच्छरांचा त्रासऔद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागांमध्ये साचलेले पाणी सर्वच ठिकाणी प्रदूषित आहे. यामुळे येथील नागरिक आणि कामगारांना याचा त्रास सहन करावा लगात आहे. प्रदूषित पाणी उन्हात तापून रासायनिक दुर्गंधी निर्माण करीत आहे, तर प्रदूषित नसलेले पाणी मच्छर आणि जंगली कीटकांच्या पैदासीचे कारण ठरत आहे. यामुळे या मोकळ्या जागा भराव टाकून भरून घ्याव्यात आणि उन्हाळ्यामध्ये गटारांमधून वाहणारे पाणी बंद करावे, अशी मागणी जोर धरत आहे.