शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कळंबोली जेएनपीटी मार्गावर चार नव्या मार्गिका, कामाला सुरूवात

By वैभव गायकर | Updated: June 24, 2024 16:26 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जाणार आहे.

पनवेल: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याच दृष्टीने विमानतळाला जोडणारी दळणवळण व्यवस्था आणखी सुखकर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि एमएसआरडीसी यांच्या माध्यमातुन कर्नाळा स्पोर्ट्स परिसरात खांदा गावाजवळ चार नव्या मार्गिका विकसित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या नव्या मार्गिकांमुळे विमानतळ गाठणे विना वाहतुक कोंडी शक्य होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जाणार आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी परिसरात नवी मुंबई विमानतळाचे प्रवेशद्वार असणार आहे. याठिकाणी या चार मार्गिका तसे इतरही कामे केली जाणार असुन याकरिता सुमारे 512 कोटींचा खर्च येणार आहे. एका वर्षात हे काम पूर्ण होणार असुन 1 मार्च 2025 हि या कामाची डेडलाईन असणार आहे. नव्याने उभारल्या जाणार मार्गिकेमध्ये नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ ते कळंबोली, जेएनपिटी ते विमानतळ, कळंबोली ते कर्नाळा स्पोर्ट्स आणि कर्नाळा स्पोर्ट्स वरून थेट विमानतळ अशा मार्गिका असणार आहेत. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी परिसरात पनवेल महानगर पालिकेचे स्वराज्य नामक मुख्यालय देखील उभे राहत आहे. भविष्यात लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ या मुख्यालयात वाढणार असल्याने या नव्या मार्गिकेचा फायदा या पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात येण्यासाठी देखील होणार आहे.

सायन पनवेल महामार्गावरील ताण होणार कमी

पनवेल शहरातून जाण्यासाठी सायन पनवेल महामार्गावरून येजा करावी लागते.या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या नव्या मार्गिकांमुळे सायन पनवेल महामार्गावरील वाहतुकीचे ताण कमी होणार असुन भविष्यात कार्यान्वित होणारे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ गाठणे सहज शक्य होणार आहे.

या कामांमुळे नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळ गाठणे सहज शक्य होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे केले जाणारे हे काम एमएसआरडीसीच्या देखरेखीत केले जात आहे. याकरिता भूसंपादनासह सर्व प्रकारची प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. 1 मार्च 2025 पर्यंत हे काम पूर्णत्वास येईल, असं अभियंता, एमएसआरडीसी राहुल जाधववार म्हणाले.

टॅग्स :panvelपनवेल