शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
4
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
5
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
6
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
7
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
8
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
9
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
10
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
11
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
12
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
13
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
14
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
15
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
16
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
17
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
18
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
19
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
20
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महाड शहरातील चार इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:03 IST

नगरपालिकेने बजावल्या नोटिसा: ४३ नागरिकांना इमारत सोडण्याच्या सूचना

सिकंदर अनवारे दासगाव : मुंबईमधील इमारती कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर राज्य शासन जागे झाले असून सर्वच शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा आता समोर आला आहे. महाड शहरात देखील अशा प्रकारच्या चार इमारती असून या इमारतीमधील ४३ जणांना महाड नगरपालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या इमारती अल्पावधीतच रहिवाशांना सोडाव्या लागल्या आहेत.

मुंबईतील डोंगरी भागात रहिवासी इमारत कोसळून दुर्घटना घडल्यानंतर शासन जागे झाले आहे. रायगड जिल्ह्यात देखील विविध शहरात अशा प्रकारच्या धोकादायक इमारती असल्याची आकडेवारी जिल्हाधिकारी यांनी सादर केली होती. यामध्ये महाड शहरात ४३ इमारती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात महाड शहरात फक्त चार इमारती धोकादायक आहेत. या चार इमारतीमधील ४३ रहिवाशांना महाड नगरपालिकेने महाराष्ट्र नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये इमारती सोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये पालिकेने या इमारती धोकादायक असून रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे सांगून आपले हात वर केले आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पालिकेची आहे, मात्र पालिकेकडून नवीन इमारती बांधकाम होत असताना दुर्लक्ष केले जात असल्याने अल्पावधीतच या इमारती धोकादायक बनल्या आहेत.

महाड शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक १९१/१अ, सिटी सर्व्हे क्रमांक २८८७, १५३, यामधील इमारतींचा समावेश आहे. गोकु लेश गृहनिर्माण, गणेश अपार्टमेंट, जीवन सिद्धी अपार्टमेंट आणखी एका इमारतीचा समावेश आहे. या इमारती दहा ते पंधरा वर्षातच कोसळण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. यामुळे या तीन इमारतीमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. यातील गोकुलेश अपार्टमेंट ही तर अवघ्या सात आठ वर्षातच धोकादायक स्थितीत गेली आहे. या इमारतीचे पिलर खचल्याची बाब समोर आली होती.

इमारती कमकुवतनवीन इमारत बांधकाम करत असताना प्रथम त्याचे डिझाईन आरेखकामार्फत पालिकेला सादर केले जाते. आरेखक पालिका नियमाला अनुसरून परवानगी काढून घेतो आणि त्यानंतर इमारत बांधकाम होत असताना बांधकाम मजूर, ठेकेदार यांच्यावर निर्भर राहतो. महाड नगरपालिकेकडून देखील शहरात होणारे बांधकाम याबाबत योग्य ती काळजी घेतली जात नाही. प्रत्यक्षात कोणत्या दर्जाचे सामान वापरले जात आहे, इमारत परवाना दिल्याप्रमाणे बांधकाम होते की नाही याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच अशा प्रकरच्या घटनांना सामोरे जाण्याची पाळी येत आहे.