शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

महाड शहरातील चार इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:03 IST

नगरपालिकेने बजावल्या नोटिसा: ४३ नागरिकांना इमारत सोडण्याच्या सूचना

सिकंदर अनवारे दासगाव : मुंबईमधील इमारती कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर राज्य शासन जागे झाले असून सर्वच शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा आता समोर आला आहे. महाड शहरात देखील अशा प्रकारच्या चार इमारती असून या इमारतीमधील ४३ जणांना महाड नगरपालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या इमारती अल्पावधीतच रहिवाशांना सोडाव्या लागल्या आहेत.

मुंबईतील डोंगरी भागात रहिवासी इमारत कोसळून दुर्घटना घडल्यानंतर शासन जागे झाले आहे. रायगड जिल्ह्यात देखील विविध शहरात अशा प्रकारच्या धोकादायक इमारती असल्याची आकडेवारी जिल्हाधिकारी यांनी सादर केली होती. यामध्ये महाड शहरात ४३ इमारती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात महाड शहरात फक्त चार इमारती धोकादायक आहेत. या चार इमारतीमधील ४३ रहिवाशांना महाड नगरपालिकेने महाराष्ट्र नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये इमारती सोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये पालिकेने या इमारती धोकादायक असून रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे सांगून आपले हात वर केले आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पालिकेची आहे, मात्र पालिकेकडून नवीन इमारती बांधकाम होत असताना दुर्लक्ष केले जात असल्याने अल्पावधीतच या इमारती धोकादायक बनल्या आहेत.

महाड शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक १९१/१अ, सिटी सर्व्हे क्रमांक २८८७, १५३, यामधील इमारतींचा समावेश आहे. गोकु लेश गृहनिर्माण, गणेश अपार्टमेंट, जीवन सिद्धी अपार्टमेंट आणखी एका इमारतीचा समावेश आहे. या इमारती दहा ते पंधरा वर्षातच कोसळण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. यामुळे या तीन इमारतीमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. यातील गोकुलेश अपार्टमेंट ही तर अवघ्या सात आठ वर्षातच धोकादायक स्थितीत गेली आहे. या इमारतीचे पिलर खचल्याची बाब समोर आली होती.

इमारती कमकुवतनवीन इमारत बांधकाम करत असताना प्रथम त्याचे डिझाईन आरेखकामार्फत पालिकेला सादर केले जाते. आरेखक पालिका नियमाला अनुसरून परवानगी काढून घेतो आणि त्यानंतर इमारत बांधकाम होत असताना बांधकाम मजूर, ठेकेदार यांच्यावर निर्भर राहतो. महाड नगरपालिकेकडून देखील शहरात होणारे बांधकाम याबाबत योग्य ती काळजी घेतली जात नाही. प्रत्यक्षात कोणत्या दर्जाचे सामान वापरले जात आहे, इमारत परवाना दिल्याप्रमाणे बांधकाम होते की नाही याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच अशा प्रकरच्या घटनांना सामोरे जाण्याची पाळी येत आहे.