शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
2
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
3
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
4
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
5
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
6
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
8
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
9
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
10
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
11
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
12
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
13
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
14
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
15
आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
16
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
17
सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
18
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
19
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
20
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाने पुसली गावाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:25 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे.

- प्रदीप मोकल वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे. सध्या येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे दहा हजारांची लोकसंख्या असलेले गडब गाव वसले आहे. महसूल व सरकार दरबारी या गावाचे नाव काराव आहे. या ठिकाणी पाच पाडे आहेत. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे या पाड्याचे मिळून झालेल्या गडब गावाच्या वेशीवर हनुमान मंदिर व त्याच्या बाजूला दगडी शाळा होती. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणात या वास्तूच नेस्तनाबूत झाल्याने गावाची ओळखच पुसली गेली आहे. येथील हनुमान जयंतीचा उत्सव तालुक्यात प्रसिध्द आहे. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे येथील ग्रामस्थ दर पाच वर्षांनी आळीपाळीने हा उत्सव साजरा करीत. मात्र चौपदरीकरणात मंदिर तसेच समोरील अंगण गेल्याने उत्सव साजरा करताना अडचण निर्माण होणार आहे. तर गोपाळ काल्याला मंदिराचे प्रांगणातच श्रीकृष्ण लीला सादर केली जायची. अनेक कलाकारांना कला सादर करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ होते. येथील नृसिंह सरस्वती महाराज मंदिर देखील महामार्गाच्या चौपदरीकरणात नेस्तनाबूत झाले आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, मनोरुग्णावर उपचारही केले जायचे. दगडी शाळेचे विस्तारीकरण करण्यात आले होते. यात व्यायामशाळाही सुरू करण्यात आली होती. ही शाळाही जमीनदोस्त करण्यात आली आहे.>पाण्याची समस्या बिकटचौपदरीकरणात येथील तीन विहिरीही बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे. गडब गावाला जेएसडब्लू कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी जर कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणी सोडले नाही तर विहिरीतील पाणी ग्रामस्थांना मिळत होते, परंतु आता चौपदरीकरणात विहिरी गेल्याने येथील पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे.>कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्राला फटकामहामार्गाचे चौपदरीकरणात येथील मराठी शाळेचे क्रीडांगण गेले आहे. विविध क्रीडा स्पर्धांतील खेळाडू याठिकाणी सराव करायचे. मात्र आता सरावासाठी क्रीडांगणच नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी दिसून येत आहे. या ठिकाणी असलेल्या शाळेच्या व्यासपीठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, तेही आता होऊ शकणार नाही. मराठी शाळा एकदमच महामार्गावर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.