शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

चौपदरीकरणाने पुसली गावाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:25 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे.

- प्रदीप मोकल वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे. सध्या येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे दहा हजारांची लोकसंख्या असलेले गडब गाव वसले आहे. महसूल व सरकार दरबारी या गावाचे नाव काराव आहे. या ठिकाणी पाच पाडे आहेत. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे या पाड्याचे मिळून झालेल्या गडब गावाच्या वेशीवर हनुमान मंदिर व त्याच्या बाजूला दगडी शाळा होती. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणात या वास्तूच नेस्तनाबूत झाल्याने गावाची ओळखच पुसली गेली आहे. येथील हनुमान जयंतीचा उत्सव तालुक्यात प्रसिध्द आहे. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे येथील ग्रामस्थ दर पाच वर्षांनी आळीपाळीने हा उत्सव साजरा करीत. मात्र चौपदरीकरणात मंदिर तसेच समोरील अंगण गेल्याने उत्सव साजरा करताना अडचण निर्माण होणार आहे. तर गोपाळ काल्याला मंदिराचे प्रांगणातच श्रीकृष्ण लीला सादर केली जायची. अनेक कलाकारांना कला सादर करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ होते. येथील नृसिंह सरस्वती महाराज मंदिर देखील महामार्गाच्या चौपदरीकरणात नेस्तनाबूत झाले आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, मनोरुग्णावर उपचारही केले जायचे. दगडी शाळेचे विस्तारीकरण करण्यात आले होते. यात व्यायामशाळाही सुरू करण्यात आली होती. ही शाळाही जमीनदोस्त करण्यात आली आहे.>पाण्याची समस्या बिकटचौपदरीकरणात येथील तीन विहिरीही बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे. गडब गावाला जेएसडब्लू कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी जर कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणी सोडले नाही तर विहिरीतील पाणी ग्रामस्थांना मिळत होते, परंतु आता चौपदरीकरणात विहिरी गेल्याने येथील पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे.>कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्राला फटकामहामार्गाचे चौपदरीकरणात येथील मराठी शाळेचे क्रीडांगण गेले आहे. विविध क्रीडा स्पर्धांतील खेळाडू याठिकाणी सराव करायचे. मात्र आता सरावासाठी क्रीडांगणच नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी दिसून येत आहे. या ठिकाणी असलेल्या शाळेच्या व्यासपीठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, तेही आता होऊ शकणार नाही. मराठी शाळा एकदमच महामार्गावर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.