शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

चौपदरीकरणाने पुसली गावाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:25 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे.

- प्रदीप मोकल वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे. सध्या येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे दहा हजारांची लोकसंख्या असलेले गडब गाव वसले आहे. महसूल व सरकार दरबारी या गावाचे नाव काराव आहे. या ठिकाणी पाच पाडे आहेत. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे या पाड्याचे मिळून झालेल्या गडब गावाच्या वेशीवर हनुमान मंदिर व त्याच्या बाजूला दगडी शाळा होती. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणात या वास्तूच नेस्तनाबूत झाल्याने गावाची ओळखच पुसली गेली आहे. येथील हनुमान जयंतीचा उत्सव तालुक्यात प्रसिध्द आहे. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे येथील ग्रामस्थ दर पाच वर्षांनी आळीपाळीने हा उत्सव साजरा करीत. मात्र चौपदरीकरणात मंदिर तसेच समोरील अंगण गेल्याने उत्सव साजरा करताना अडचण निर्माण होणार आहे. तर गोपाळ काल्याला मंदिराचे प्रांगणातच श्रीकृष्ण लीला सादर केली जायची. अनेक कलाकारांना कला सादर करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ होते. येथील नृसिंह सरस्वती महाराज मंदिर देखील महामार्गाच्या चौपदरीकरणात नेस्तनाबूत झाले आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, मनोरुग्णावर उपचारही केले जायचे. दगडी शाळेचे विस्तारीकरण करण्यात आले होते. यात व्यायामशाळाही सुरू करण्यात आली होती. ही शाळाही जमीनदोस्त करण्यात आली आहे.>पाण्याची समस्या बिकटचौपदरीकरणात येथील तीन विहिरीही बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे. गडब गावाला जेएसडब्लू कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी जर कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणी सोडले नाही तर विहिरीतील पाणी ग्रामस्थांना मिळत होते, परंतु आता चौपदरीकरणात विहिरी गेल्याने येथील पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे.>कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्राला फटकामहामार्गाचे चौपदरीकरणात येथील मराठी शाळेचे क्रीडांगण गेले आहे. विविध क्रीडा स्पर्धांतील खेळाडू याठिकाणी सराव करायचे. मात्र आता सरावासाठी क्रीडांगणच नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी दिसून येत आहे. या ठिकाणी असलेल्या शाळेच्या व्यासपीठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, तेही आता होऊ शकणार नाही. मराठी शाळा एकदमच महामार्गावर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.