शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कार्यालयात कोरोनाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 23:26 IST

नियम पाळण्याबाबत उदासीनता : नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

योगेश पिंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील नागरिकांना नियमांचे बंधन घालणाऱ्या महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये नियम पाळण्याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयांमध्ये नियमांचे पालन केले जात नसून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई शहरात सुरक्षितता बाळगण्याच्या दृष्टीने सोसायट्या, बँका, कार्यलये आदी ठिकाणी ये-जा करणाºया नागरिकांचे तापमान थर्मल गनद्वारे तापमान तपासले जात आहे. महापालिका कार्यालयातही येणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी सुरक्षारक्षकांकडे थर्मल गन देण्यात आल्या आहेत, परंतु तापमान मोजण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, कोणतीही चौकशी, नोंद न होता, नागरिक ये-जा करीत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील घरोघरी जाऊन थर्मल गनद्वारे प्रत्येक व्यक्तीचे तापमान व आॅक्सिमिटरद्वारे प्रत्येकाच्या शरीरातील प्राणवायूची पातळी मोजली मोजली जात आहे, परंतु महापालिकेच्या मुख्यालयासह शहरातील विभाग कार्यालयांमध्ये ये-जा करणाºया व्यक्तींच्या तापमानाची तपासणी करण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांमध्येही मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन केले जात नाही. काही विभाग कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्यांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन बसविण्यात आले आहेत, परंतु या वॉश बेसिनचा वापरही केला जात नाही.

आजवर महापालिकेच्या मुख्यालय, विभाग कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. काही कर्मचाºयांचा मृत्यूही झाला आहे. महापालिका कार्यालयांमध्ये प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पालिका मुख्यालयमहापालिका मुख्यालयात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह विविध कामानिमित्त दिवसभर ये-जा करणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येणाºया नागरिकांची तपासणी करण्यासाठी सुरक्षारक्षकांकडे थर्मल गन देण्यात आल्या आहेत, परंतुप्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात नाही. तळमजल्यावर मुख्यालयात येणाºया नागरिकांची नोंद आणि तपासणी करण्यासाठीही सुरक्षारक्षक अनेक वेळा उपस्थित नसल्याचे समोर आले असून, त्यांची कोणतीही तपासणी होत नाही.बेलापूर विभाग कार्यालय : महा पालिकेच्या बेलापूर विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. ते मास्क काढून बसत आहेत. या ठिकाणी ये-जा करणाºया कोणत्याही व्यक्तीची चौकशी किंवा नोंद केली जात नाही, तसेच थर्मल गनद्वारे तापमान तपासले जात नाही.नेरुळ विभाग कार्यालय : महापालिका शाळेच्या इमारतीच्या काही भागांत नेरुळ विभाग कार्यालय सुरू केले आहे. तेथेही सुरक्षारक्षक नियुक्त आहेत. नागरिक, अधिकारी,कर्मचाºयांचे शारीरिक तापमान घेण्यासाठी त्यांच्याकडेही थर्मल गन दिली आहे, परंतु कोणत्याही नागरिकाची तपासणी केली जात नाही. अनेक वेळा सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळले.तुर्भे विभाग कार्यालय : महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातही अधिकारी, कर्मचारी, तसेच नागरिकांची वर्दळ आहे. पाणी आणि मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिक येत असतात. सुरक्षारक्षक असले, तरी त्यांच्याकडूनही कोणत्याही व्यक्तीची चौकशी अथवा अधिकारी, कर्मचारी, नागरिक कोणाचीही तपासणी केली जात नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस