शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

कार्यालयात कोरोनाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 23:26 IST

नियम पाळण्याबाबत उदासीनता : नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

योगेश पिंगळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील नागरिकांना नियमांचे बंधन घालणाऱ्या महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये नियम पाळण्याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयांमध्ये नियमांचे पालन केले जात नसून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई शहरात सुरक्षितता बाळगण्याच्या दृष्टीने सोसायट्या, बँका, कार्यलये आदी ठिकाणी ये-जा करणाºया नागरिकांचे तापमान थर्मल गनद्वारे तापमान तपासले जात आहे. महापालिका कार्यालयातही येणारे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी सुरक्षारक्षकांकडे थर्मल गन देण्यात आल्या आहेत, परंतु तापमान मोजण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, कोणतीही चौकशी, नोंद न होता, नागरिक ये-जा करीत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील घरोघरी जाऊन थर्मल गनद्वारे प्रत्येक व्यक्तीचे तापमान व आॅक्सिमिटरद्वारे प्रत्येकाच्या शरीरातील प्राणवायूची पातळी मोजली मोजली जात आहे, परंतु महापालिकेच्या मुख्यालयासह शहरातील विभाग कार्यालयांमध्ये ये-जा करणाºया व्यक्तींच्या तापमानाची तपासणी करण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांमध्येही मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन केले जात नाही. काही विभाग कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्यांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन बसविण्यात आले आहेत, परंतु या वॉश बेसिनचा वापरही केला जात नाही.

आजवर महापालिकेच्या मुख्यालय, विभाग कार्यालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. काही कर्मचाºयांचा मृत्यूही झाला आहे. महापालिका कार्यालयांमध्ये प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पालिका मुख्यालयमहापालिका मुख्यालयात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह विविध कामानिमित्त दिवसभर ये-जा करणाºया नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येणाºया नागरिकांची तपासणी करण्यासाठी सुरक्षारक्षकांकडे थर्मल गन देण्यात आल्या आहेत, परंतुप्रत्येक नागरिकाची तपासणी केली जात नाही. तळमजल्यावर मुख्यालयात येणाºया नागरिकांची नोंद आणि तपासणी करण्यासाठीही सुरक्षारक्षक अनेक वेळा उपस्थित नसल्याचे समोर आले असून, त्यांची कोणतीही तपासणी होत नाही.बेलापूर विभाग कार्यालय : महा पालिकेच्या बेलापूर विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. ते मास्क काढून बसत आहेत. या ठिकाणी ये-जा करणाºया कोणत्याही व्यक्तीची चौकशी किंवा नोंद केली जात नाही, तसेच थर्मल गनद्वारे तापमान तपासले जात नाही.नेरुळ विभाग कार्यालय : महापालिका शाळेच्या इमारतीच्या काही भागांत नेरुळ विभाग कार्यालय सुरू केले आहे. तेथेही सुरक्षारक्षक नियुक्त आहेत. नागरिक, अधिकारी,कर्मचाºयांचे शारीरिक तापमान घेण्यासाठी त्यांच्याकडेही थर्मल गन दिली आहे, परंतु कोणत्याही नागरिकाची तपासणी केली जात नाही. अनेक वेळा सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे आढळले.तुर्भे विभाग कार्यालय : महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातही अधिकारी, कर्मचारी, तसेच नागरिकांची वर्दळ आहे. पाणी आणि मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिक येत असतात. सुरक्षारक्षक असले, तरी त्यांच्याकडूनही कोणत्याही व्यक्तीची चौकशी अथवा अधिकारी, कर्मचारी, नागरिक कोणाचीही तपासणी केली जात नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस