शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सावित्री नदीच्या पुराचे पाणी महाड शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:35 IST

सावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली.

दासगाव : महाड तालुक्यात सोमवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ, आणि गांधारी या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. यामुळे महाड शहरात, तसेच ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहरात विविध भागांत सावित्री नदीचे पाणी शिरल्याने नागरिक, व्यापारी धास्तावले आहेत.

सावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे, दस्तुरी नाका येथेही पाणी वर आल्याने सकाळपासूनच दस्तुरी नाका ते नातेखिंड हा मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. केंबुर्लीनजीक असलेल्या गांधारी पुलावरून पुराचे पाणी गेल्याने, महाड शहरात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. दासगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात सावित्री खाडीतील पाणी शेतीमध्ये घुसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दादली पुलावरून नदीचा प्रवाह, नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला१महाड : पावसाचा जोर मंगळवारी सायंकाळी कायम राहिल्याने महाड शहरासह नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे. सावित्री नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, या नदीवरील दादली पुलावरून या नदीचा प्रवाह सायंकाळी वाहू लागल्यामुळे महाडवासीयांची भीती वाढली आहे, तर या पुलावरून वाहतूक बंद झाल्याने नदीपलीकडील अनेक गावांचा महाड शहराची संपर्क तुटला आहे.२महाड शहरांमध्ये गांधारी नाका आणि दस्तुरी नाका या मार्गाने शहरांत प्रवेश करता येतो, परंतु मंगळवारी पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन्ही मार्ग वाहातुकीसाठी बंद आहेत. सावित्री नदीची पाण्याची धोका पातळी ६.५० मिटर असून, ही धोक्याची पातळी नदीने ओलांडली असून, सकाळी ९ वाजता पातळी ७.३० मीटर झाली होती. मुसळधार पावसाने महाड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने, नगरपरिषद, महसूल प्रशासन, पंचायत समितीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.चोवीस तासांत१ हजार ८५१.४० मिमी पावसाची नोंदच्सोमवार, ३ आॅगस्टला दिवसभर पावसाची संततधार सुरू होती, तर सायंकाळी या पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सोमवारी सकाळी ८ ते मंगळवार ४ आॅगस्ट रोजी सकाळी ८ या चोवीस तासांत १ हजार ८५१.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ११५.७१ मिमीच्या सरासरीने हा पाऊस नोंदविला गेला आहे. यामध्ये दक्षिण रायगडात पावसाचा जोर जास्त होता.च्रोह्यात सर्वाधिक १९८.०० मिमी पाऊस पडला. त्या खालोखाल पोलादपूर तालुक्यात १९७ मिमी, म्हसळ्यात १६५ मिमी, माणगाव व सुधागडमध्ये १६० मिमी, तळा तालुक्यात १२६ मिमी पाऊस पडला. उरणमध्ये १३४ मिमी, अलिबाग ७९ मिमी, पेण ६० मिमी, मुरुड ९२ मिमी, पनवेल ७२ मिमी, कर्जत ६०.६० मिमी, खालापूर ६५ मिमी, महाड ९७ मिमी, श्रीवर्धन ९८ मिमी, माथेरान ८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाबरोबर जोरदार वारे वाहत आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊसलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात ४ ते ६ आॅगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असून, अशी पूर्वसूचना प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नदी परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड तालुक्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे, तर कुंडलिका आणि आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे महाडमधील सावित्रीने धोका पातळी ओलांडली आहे, तर रोह्यातील कुंडलिका व आंबा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यात मंगळवारपासून तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने, नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, तसेच दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, विद्युत खांब, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. उत्तर कोकणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे जोरदार वारे वाहत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगडfloodपूर