शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘फ्लोटिंग बोयाज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:31 IST

गेल्या चार ते पाच वर्षांत रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनासाठी आलेल्या आणि भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने, बुडून

अलिबाग : गेल्या चार ते पाच वर्षांत रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनासाठी आलेल्या आणि भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने, बुडून मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटक सुरक्षितता उपाययोजनेंतर्गत, समुद्रात पोहण्यासाठी सुरक्षित हद्दीची कल्पना यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्रकिनाºयांवर एकूण ११५ ‘फ्लोटिंग बोयाज’ बसविण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून प्रत्यक्षात १५५ फ्लोटिंग बोयाज खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.पहिल्या टप्प्यात मुरुड आणि काशीद या दोन बीचेसवर हे बोयाज बसविण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा अभिनव उपक्रम रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून साकारत असून, त्याची अंमलबजावणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून पाच लाख २० हजार रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी करून दिली आहे.पर्यटक सुरक्षाव्यवस्थेअंतर्गत बीचवर पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाज लावण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागाव, आक्षी, काशीद, मुरुड, अलिबाग, वरसोली, मांडवा, हरेश्वर, किहिम, रेवदंडा, कोर्लई आदी सर्व प्रमुख समुद्रकिनाºयांवर हे बोयाज लावण्याचे काम सुरू आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती पाठक यांनी दिली.समुद्रात पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविणे, तसेच धोकादायक पातळी दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाजचा वापर होतो. समुद्रकिनाºयापासून साधारणत: ५० ते ६० मीटर अंतरावर किंवा भरती ओहोटीच्या पातळ्यांचा अभ्यास करून व स्थानिकांच्या अनुभवाच्या आधारे ही ठिकाणे निश्चित करण्यात येतात. त्यावर हे बोयाज लावण्याचे काम सध्या सुरू आहे.फ्लोटिंग बोयाज नेमके काय?बोयाज म्हणजे भगव्या रंगाचा एक तरंगता मोठा चेंडू, त्याला वर एक निशाणी पताका लावलेली असते. खाली किमान १० मीटर लांबीच्या दोरखंडाला तो बांधून त्याला खालच्या बाजूला दीड फूट रु ंद आणि दोन फूट लांब, अशी सिमेंटची प्लेट लावलेली असते. त्यामुळे फ्लोटिंग बोयाज पाण्यात स्थिर राहतो. हे बोयाज खालून एकमेकांना दोरखंडाने बांधलेले असल्याने ते एका रेषेत राहतात. त्यावरूनच पोहणाºयांना सुरक्षित हद्द ओळखता येते.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपयुक्त उपक्र म असून, यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात येणाºया पर्यटकांनाही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. बीचनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने साधारणपणे साडेतीन फूट खोलीच्या पुढे समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. मद्यपान करून पोहू नये. जीव धोक्यात घालून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नये, स्वत:ची जबाबदारी ओळखून समुद्रात पोहण्यासाठी उतरावे. प्रशासनाने प्रत्येक बीचवर लावलेल्या सुरक्षा सूचना व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.