शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘फ्लोटिंग बोयाज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:31 IST

गेल्या चार ते पाच वर्षांत रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनासाठी आलेल्या आणि भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने, बुडून

अलिबाग : गेल्या चार ते पाच वर्षांत रायगड जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनासाठी आलेल्या आणि भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने, बुडून मृत्युमुखी पडणाºयांची संख्या वाढली आहे. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटक सुरक्षितता उपाययोजनेंतर्गत, समुद्रात पोहण्यासाठी सुरक्षित हद्दीची कल्पना यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्रकिनाºयांवर एकूण ११५ ‘फ्लोटिंग बोयाज’ बसविण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून प्रत्यक्षात १५५ फ्लोटिंग बोयाज खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.पहिल्या टप्प्यात मुरुड आणि काशीद या दोन बीचेसवर हे बोयाज बसविण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा अभिनव उपक्रम रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून साकारत असून, त्याची अंमलबजावणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून पाच लाख २० हजार रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी करून दिली आहे.पर्यटक सुरक्षाव्यवस्थेअंतर्गत बीचवर पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाज लावण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागाव, आक्षी, काशीद, मुरुड, अलिबाग, वरसोली, मांडवा, हरेश्वर, किहिम, रेवदंडा, कोर्लई आदी सर्व प्रमुख समुद्रकिनाºयांवर हे बोयाज लावण्याचे काम सुरू आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती पाठक यांनी दिली.समुद्रात पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविणे, तसेच धोकादायक पातळी दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाजचा वापर होतो. समुद्रकिनाºयापासून साधारणत: ५० ते ६० मीटर अंतरावर किंवा भरती ओहोटीच्या पातळ्यांचा अभ्यास करून व स्थानिकांच्या अनुभवाच्या आधारे ही ठिकाणे निश्चित करण्यात येतात. त्यावर हे बोयाज लावण्याचे काम सध्या सुरू आहे.फ्लोटिंग बोयाज नेमके काय?बोयाज म्हणजे भगव्या रंगाचा एक तरंगता मोठा चेंडू, त्याला वर एक निशाणी पताका लावलेली असते. खाली किमान १० मीटर लांबीच्या दोरखंडाला तो बांधून त्याला खालच्या बाजूला दीड फूट रु ंद आणि दोन फूट लांब, अशी सिमेंटची प्लेट लावलेली असते. त्यामुळे फ्लोटिंग बोयाज पाण्यात स्थिर राहतो. हे बोयाज खालून एकमेकांना दोरखंडाने बांधलेले असल्याने ते एका रेषेत राहतात. त्यावरूनच पोहणाºयांना सुरक्षित हद्द ओळखता येते.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपयुक्त उपक्र म असून, यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात येणाºया पर्यटकांनाही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. बीचनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने साधारणपणे साडेतीन फूट खोलीच्या पुढे समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. मद्यपान करून पोहू नये. जीव धोक्यात घालून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नये, स्वत:ची जबाबदारी ओळखून समुद्रात पोहण्यासाठी उतरावे. प्रशासनाने प्रत्येक बीचवर लावलेल्या सुरक्षा सूचना व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.