शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

पाच विहिरी आटल्या, कूपनलिकाही कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:52 IST

दहा वर्षांपासून या योजनेतून पाण्याचा एक थेंबही कळंब गावात पोहोचला नाही. तरीही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाकडून गावासाठी मोठी नळपाणी योजना तयार करण्यात आली नाही.

कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब गावात गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाचही विहिरी आटल्या आहेत. गावातील बोअरवेल कोरड्या पडल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. कळंब गाव पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट नसल्याने शासकीय नियोजनानुसार टँकरने पाणी देण्यातही अडचणी येत आहेत.कर्जत-मुरबाड राज्यमार्गावर असलेल्या कळंब गावात तीन हजारांची लोकवस्ती आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी साळोख येथे असलेल्या पाझर तलावातून नळपाणी योजना १९८० च्या दशकात सुरू करण्यात आली होती. कळंब गावापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या साळोख तलावातील बंधाºयात विहीर बांधून पाणी कळंब गावात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गेल्या १५ वर्षांत ही नळपाणी योजना कोलमडली असून सातत्याने दुरुस्ती करावी लागत असल्याने खर्चही अमाप होत आहे. दहा वर्षांपासून या योजनेतून पाण्याचा एक थेंबही कळंब गावात पोहोचला नाही. तरीही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाकडून गावासाठी मोठी नळपाणी योजना तयार करण्यात आली नाही.

साळोख येथील तलावातील पाण्यावर केलेली नळपाणी योजना बंद पडल्यानंतर जिल्हा परिषदेने या गावासाठी कळंब-बोरगाव रस्त्यावर असलेल्या पोश्री नदीमध्ये सिमेंट बंधारा बांधून त्यात विहीर खोदून पाणी योजना राबविण्याचा प्रयत्न झाला. पण बंधाºयाला पहिल्याच वर्षी गळती लागल्याने पाणी योजना पुन्हा कोलमडली. गेल्या अनेक वर्षांपासून कळंब गाव स्वत:च्या नळपाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहे.बोरगाव रस्त्यालगत असलेल्या कूपनलिकेचा ग्रामस्थांना एकमेव आधार होता. या कूपनलिकेतील पाणी उचलून ते कळंब गावातील चार विहिरीत सोडले जायचे आणि त्यानंतर ते ग्रामस्थांना मिळायचे. असे मागील नऊ वर्षे सुरू असताना यंदा कूपनलिकेनेही तळ गाठला आहे. त्यातून पाणी येईनासे झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या, कूपनलिकेतूनही पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना दोन किमीवर असलेल्या साळोख गावातून पाणी आणावे लागत आहे. येथील खासगी बोअरवेलचे पाणी मिळायचे. मात्र, त्यांनीही आता तळ गाठला आहे.आमच्याकडे असलेल्या टँकरच्या माध्यमातून गावात पाणीपुरवठा सुरू केला आहे; पण लोकवस्ती जास्त असल्याने पाणी वितरणात अडचणी येत आहेत. त्यात कूपनलिकेतून पाणी वितरणासाठी असलेली वाहिनी कापण्यात आल्याने पाणी सर्व ठिकाणी पोहोचत नाही. - माधुरी बदे, सरपंच, कळंब

कळंब हे गाव तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात समाविष्ट नाही, त्यामुळे शासकीय टँकर देता येत नाही; परंतु आम्ही ग्रामपंचायतीला पत्र दिले असून त्यांच्या पातळीवर टँकर सुरू केल्यास आमची हरकत नाही. - बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

गाव पाणीटंचाई कृती आराखड्यात नाही म्हणून पाणी दिले जात नाही असे नाही. माणुसकीच्या भावनेतून पाणी पुरविण्याची जबाबदारी शासन म्हणून आहे, त्यामुळे नळपाणी योजनेबाबत माहिती घेऊन पाणी पुरवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. - अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई