शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाच विहिरी आटल्या, कूपनलिकाही कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:52 IST

दहा वर्षांपासून या योजनेतून पाण्याचा एक थेंबही कळंब गावात पोहोचला नाही. तरीही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाकडून गावासाठी मोठी नळपाणी योजना तयार करण्यात आली नाही.

कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील कळंब गावात गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाचही विहिरी आटल्या आहेत. गावातील बोअरवेल कोरड्या पडल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. कळंब गाव पाणीटंचाई आराखड्यात समाविष्ट नसल्याने शासकीय नियोजनानुसार टँकरने पाणी देण्यातही अडचणी येत आहेत.कर्जत-मुरबाड राज्यमार्गावर असलेल्या कळंब गावात तीन हजारांची लोकवस्ती आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी साळोख येथे असलेल्या पाझर तलावातून नळपाणी योजना १९८० च्या दशकात सुरू करण्यात आली होती. कळंब गावापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या साळोख तलावातील बंधाºयात विहीर बांधून पाणी कळंब गावात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गेल्या १५ वर्षांत ही नळपाणी योजना कोलमडली असून सातत्याने दुरुस्ती करावी लागत असल्याने खर्चही अमाप होत आहे. दहा वर्षांपासून या योजनेतून पाण्याचा एक थेंबही कळंब गावात पोहोचला नाही. तरीही लोकप्रतिनिधी वा स्थानिक प्रशासनाकडून गावासाठी मोठी नळपाणी योजना तयार करण्यात आली नाही.

साळोख येथील तलावातील पाण्यावर केलेली नळपाणी योजना बंद पडल्यानंतर जिल्हा परिषदेने या गावासाठी कळंब-बोरगाव रस्त्यावर असलेल्या पोश्री नदीमध्ये सिमेंट बंधारा बांधून त्यात विहीर खोदून पाणी योजना राबविण्याचा प्रयत्न झाला. पण बंधाºयाला पहिल्याच वर्षी गळती लागल्याने पाणी योजना पुन्हा कोलमडली. गेल्या अनेक वर्षांपासून कळंब गाव स्वत:च्या नळपाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहे.बोरगाव रस्त्यालगत असलेल्या कूपनलिकेचा ग्रामस्थांना एकमेव आधार होता. या कूपनलिकेतील पाणी उचलून ते कळंब गावातील चार विहिरीत सोडले जायचे आणि त्यानंतर ते ग्रामस्थांना मिळायचे. असे मागील नऊ वर्षे सुरू असताना यंदा कूपनलिकेनेही तळ गाठला आहे. त्यातून पाणी येईनासे झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. विहिरी कोरड्या पडल्या, कूपनलिकेतूनही पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना दोन किमीवर असलेल्या साळोख गावातून पाणी आणावे लागत आहे. येथील खासगी बोअरवेलचे पाणी मिळायचे. मात्र, त्यांनीही आता तळ गाठला आहे.आमच्याकडे असलेल्या टँकरच्या माध्यमातून गावात पाणीपुरवठा सुरू केला आहे; पण लोकवस्ती जास्त असल्याने पाणी वितरणात अडचणी येत आहेत. त्यात कूपनलिकेतून पाणी वितरणासाठी असलेली वाहिनी कापण्यात आल्याने पाणी सर्व ठिकाणी पोहोचत नाही. - माधुरी बदे, सरपंच, कळंब

कळंब हे गाव तालुका पाणीटंचाई कृती आराखड्यात समाविष्ट नाही, त्यामुळे शासकीय टँकर देता येत नाही; परंतु आम्ही ग्रामपंचायतीला पत्र दिले असून त्यांच्या पातळीवर टँकर सुरू केल्यास आमची हरकत नाही. - बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती

गाव पाणीटंचाई कृती आराखड्यात नाही म्हणून पाणी दिले जात नाही असे नाही. माणुसकीच्या भावनेतून पाणी पुरविण्याची जबाबदारी शासन म्हणून आहे, त्यामुळे नळपाणी योजनेबाबत माहिती घेऊन पाणी पुरवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. - अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई