शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

वादळी पावसामुळे मासेमारी पुन्हा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 01:40 IST

मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लेई, राजपुरी आदी ठिकाणच्या नौका आपापल्या किनाºयावर परतल्याची माहिती रायगड मच्छीमार संघांचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी ‘लोकमत’ला दिली.

आगरदांडा : रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी पावसामुळे सुरू झालेली मासेमारी पुन्हा ठप्प झाली असून, मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लेई, राजपुरी आदी ठिकाणच्या नौका आपापल्या किनाºयावर परतल्याची माहिती रायगड मच्छीमार संघांचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी ‘लोकमत’ला दिली.वादळी हवामानामुळे २० आॅगस्टपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा मेरिटाइम बोर्डाने दिला असल्याचे बैले यांनी सांगितले. आगरदांडा बंदरात हर्णे, रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील नौका नांगरण्यात आल्या आहेत. ही संख्या सुमारे १०० असून, खलाशी कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा होण्याची शक्यता दिसून येत आहे. १ आॅगस्टला मच्छीमारी सुरू झाली. मात्र, हा उत्साह फार टिकला नाही. ६ आॅगस्टपासून वादळी वारे वाहत असल्याने, सर्व तयारी करून मासेमारीस गेलेल्या नौका पुन्हा परतल्या. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. मासेमारी बंद पडल्याने मार्केटमध्ये मासळीचा मोठा तुटवडा असून, खाडीतील छोट्या मासळीचे भाव कडाडले असल्याचे दिसून आले.मच्छीमारांचा २०१७चा डिझेल परतावा अद्याप शासनाकडून आलेला नसल्याचे मनोहर बैले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गणेशोत्सव कसा साजरा करावा, असा प्रश्न मच्छीमारांना पडला आहे.मदत मिळाली नाहीनिसर्ग वादळात झालेल्या नुकसानीपोटी मेरिटाइम बोर्डाकडून नौका मालकाला प्रत्येकी फक्त ४,१०० इतकीच मदत आली असून, त्या व्यतिरिक्त काहीही आर्थिक मदत आली नसल्याचे मनोहर बैले यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, तालुक्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णत: बंद पडला असून, छोटे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या भागातील निसर्ग आणि मासळी खाण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक येत असतात, परंतु यंदा पर्यटक नाहीत, मासळीही नाही.