शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वादळी पावसामुळे मासेमारी पुन्हा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 01:40 IST

मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लेई, राजपुरी आदी ठिकाणच्या नौका आपापल्या किनाºयावर परतल्याची माहिती रायगड मच्छीमार संघांचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी ‘लोकमत’ला दिली.

आगरदांडा : रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी पावसामुळे सुरू झालेली मासेमारी पुन्हा ठप्प झाली असून, मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लेई, राजपुरी आदी ठिकाणच्या नौका आपापल्या किनाºयावर परतल्याची माहिती रायगड मच्छीमार संघांचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी ‘लोकमत’ला दिली.वादळी हवामानामुळे २० आॅगस्टपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा मेरिटाइम बोर्डाने दिला असल्याचे बैले यांनी सांगितले. आगरदांडा बंदरात हर्णे, रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील नौका नांगरण्यात आल्या आहेत. ही संख्या सुमारे १०० असून, खलाशी कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा होण्याची शक्यता दिसून येत आहे. १ आॅगस्टला मच्छीमारी सुरू झाली. मात्र, हा उत्साह फार टिकला नाही. ६ आॅगस्टपासून वादळी वारे वाहत असल्याने, सर्व तयारी करून मासेमारीस गेलेल्या नौका पुन्हा परतल्या. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. मासेमारी बंद पडल्याने मार्केटमध्ये मासळीचा मोठा तुटवडा असून, खाडीतील छोट्या मासळीचे भाव कडाडले असल्याचे दिसून आले.मच्छीमारांचा २०१७चा डिझेल परतावा अद्याप शासनाकडून आलेला नसल्याचे मनोहर बैले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गणेशोत्सव कसा साजरा करावा, असा प्रश्न मच्छीमारांना पडला आहे.मदत मिळाली नाहीनिसर्ग वादळात झालेल्या नुकसानीपोटी मेरिटाइम बोर्डाकडून नौका मालकाला प्रत्येकी फक्त ४,१०० इतकीच मदत आली असून, त्या व्यतिरिक्त काहीही आर्थिक मदत आली नसल्याचे मनोहर बैले यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, तालुक्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णत: बंद पडला असून, छोटे व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या भागातील निसर्ग आणि मासळी खाण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक येत असतात, परंतु यंदा पर्यटक नाहीत, मासळीही नाही.