शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मच्छीमारांचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: June 15, 2016 01:07 IST

पिढ्यानपिढ्या समुद्रकिनारी असणाऱ्या सरकारी जमिनीचा वापर मच्छीमार समाज करीत आला आहे, परंतु सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण केले आहे त्यांनीच कोळी बांधवांना

- आविष्कार देसाई, अलिबाग

पिढ्यानपिढ्या समुद्रकिनारी असणाऱ्या सरकारी जमिनीचा वापर मच्छीमार समाज करीत आला आहे, परंतु सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण केले आहे त्यांनीच कोळी बांधवांना या जागेतून हुसकाविण्याची तयारी प्रशासन आणि सरकारच्या पाठबळावर केली आहे. त्यामुळे हे सरकार धनदांडग्यांचे आहे की, सर्वसामान्यांचे असा प्रश्न अलिबाग तालुक्यातील चाळमाळ-थळ येथील मच्छीमार समाजाला पडला आहे.अलिबागपासून रेवस आणि मांडवा या पट्ट्यामध्ये ‘लॅवीश लाइफस्टाइल’ जगणाऱ्या धनदांडग्यांचे शेकडो बंगले, फार्महाऊसेस आहेत. समुद्र किनाऱ्याला लागूनच त्यांच्या प्रॉपर्टी आहेत. प्रशासनाने डोळेझाक केल्यानेच या धनदांडग्यांनी सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करुन सरकारच्या जागा गिळंकृत के ल्याआहेत. मासळी सुकविणे, बोटींची दुरुस्ती करणे, जाळे विणणे, गुरे चरविणे या कामांसाठी सरकारी जमिनींचा वापर करण्यापासून कोळी बांधवांना कोणी रोखू शकत नाही. सरकारने ५ फेब्रुवारी १९८३ रोजी तसा निर्णयही दिला आहे. त्यानुसार ही जागा मत्स्य व्यवसायासाठी राखीव ठेवून त्या मच्छीमार समाजाच्या नावे करावी. याबाबतचा आदेश ३० एप्रिल २०१२ रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांना कोकण मत्स्य व्यवसाय आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत. असे असताना त्या सरकारी जमिनीवरून हुसकावण्याची तयारी धनदांडग्यांनी प्रशासनाच्या मदतीने केली आहे. सचिन भास्कर कदम आणि रणदीपसिंग मुजराल यांनी याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संबंधितांना अतिक्रमणे काढण्याबाबत आदेश दिले आहेत. अतिक्रमणे हटविण्याबाबतच्या नोटिसा मच्छीमार समाजाला देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार असे दिसताच मच्छीमार समाज एकवटला. त्यांनी मंगळवारी शेकाप आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. मच्छीमार समाजाला त्यांच्या जागेतून कोणीच काढू शकत नाही, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.प्रशासनाकडे तक्रारीअलिबागमधील चाळमाळ-थळ सर्व्हे नंबर ३४५ आणि ३४६ ही जागा मच्छीमार समाजाची आहे. परंतु याच जमिनीवर तेथील धनदांडग्यांनी आपली वक्रदृष्टी केली आहे. या जमिनीवर मच्छी सुकविण्याचे ओटे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे तेथे मासळी सुकविली जाते. यामुळे वासाचे कारण देत धनदांडग्यांनी ती जमीन घशात घालण्यासाठी हा खटाटोप केला असावा. कारण याआधीही त्यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले आहे. त्या बाबतीमध्ये ३१ सप्टेंबर २००५ सालापासून जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे हनुमान मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मदन कोळी यांनी सांगितले. मच्छीमार समाजाला त्यांच्या जागेतून कोणीच काढू शकत नाही, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.ग्रामसभेत ठराव थळ ग्रामपंचायतीनेही ३१ आॅगस्ट २००५ रोजी ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. मासळी सुकविण्याची जागा मच्छीमार समाज पिढ्यानपिढ्या वापरत आहे. त्यामुळे ती जमीन त्यांना वापरण्यास द्यावी, असा ठराव करण्यात आला आहे.आयुक्तांमार्फत आदेश जागा मत्स्य व्यवसायासाठी राखीव ठेवण्याचे आदेश ३० एप्रिल २०१२ रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांना कोकण मत्स्य व्यवसाय आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत.लोकायुक्तांच्या निर्देशानुसार प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात केली आहे. मच्छीमारांनी समुद्रकिनारी शेड बांधायला सुरुवात केली आहे. बंगलेधारकांनी अतिक्रमण केलेल्या तक्रारीवर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.- प्रकाश सकपाळ, तहसीलदार, अलिबाग