शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
"पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
6
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
7
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
8
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
9
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
10
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
11
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
12
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
13
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
14
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
15
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
16
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
17
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
18
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
19
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
20
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळात मच्छीमारांचे एक कोटीचे झाले नुकसान; मच्छीमारांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 02:24 IST

पुरेसा निधी नसल्याने मदत वाटप रखडले

आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळात मासेमारी करणाऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने अद्याप नुकसानभरपाईसाठी पुरेसा निधी दिलेला नाही. त्यामुळे मदत वाटप रखडल्याने मच्छीमारांमध्ये असंतोष खदखदत आहे.

३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील सव्वा लाख घरांचे नुकसान केले, तर हजारो हेक्टरवरील बागायतींचे क्षेत्र नष्ट झाले. काही तासांच्या वादळाने होत्याचे नव्हते केले. निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा समुद्रकिनारी असणाºया तालुक्यांना बसला आहे. त्यामुळे येथील मासेमारी करणाºया समाजातील होड्या, मासेमारीच्या जाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, मुरुड, तळा, अलिबाग, पेण, कर्जत आणि उरण तालुक्यातील सात हजार ९६ होड्यांचे अंशत: तर ३० होड्यांचे पूर्णत: असे एकूण ७,१२६ होड्यांचे नुकसान झाले आहे. ६१ जाळ्यांचे अंशत: आणि आठ जाळ्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेततळी आहेत. ६३.८० हेक्टरवरील मत्स्य खाद्य खराब झाले, तर ३.६० हेक्टर क्षेत्रातील शेततळ्यांची बांधबंदिस्ती तुटली आहे.

सरकारने तातडीने मासेमारी करणाºया समाजाला नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या कालावधीतच आम्ही आमच्या होड्यांची डागडुजी करत असतो, तसेच जाळी विणण्याचेही काम याच कालावधीत केले जाते. त्यामुळे आॅगस्ट महिन्यामध्ये पुन्हा नव्या जोमाने मासेमारी करायला जाता येईल. गेल्या काही वर्षांपासून मासळीचा दुष्काळ पडत आहे. गेल्या आणि आताच्या वर्षात किमान नऊ वादळे येऊन गेली; मात्र आम्हाला कोणीच मदत केली नाही. निसर्ग वादळाने अन्य विभागांचे नुकसान झाल्याने त्यांना तातडीने मदत देण्यात येत आहे. मात्र आम्हाला मागे ठेवले जाते. आता तरी सरकारने मदत देणे गरजेचे आहे, असे मांडवा येथील माता टाका देवी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष अनिल भिंगारकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मासेमारी करणाऱ्यांच्या होड्या, जाळ्यांसह अन्य नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाले आहेत. प्रशासनाकडे सध्या ५० टक्केच निधी आहे. उर्वरित रक्कम लवकरच प्राप्त होईल. मदत वाटप करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाला २० लाख रुपये प्राप्त झाले होते, त्यापैकी १८ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. - पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड९६ लाख ६० हजार ३६४ रुपयांचे पंचनामे पूर्णमत्स्य विकास विभागाने ९६ लाख ६० हजार ३६४ रुपयांचे नुकसान झाल्याबाबत पंचनामे पूर्ण केले आहेत. मात्र, नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने मदत वाटप रखडले असल्याचे बोलले जाते. जुन्या सरकारी निर्णयानुसार अंशत: नुकसान झालेल्या एका होडीला चार हजार रुपये, तर पर्ू्णत: नुकसान झालेल्या होडीसाठी नऊ हजार ६०० रुपये सरकारने मंजूर केले होते.

तसेच अंशत: जाळ्याच्या नुकसानीसाठी दोन हजार १०० तर पूर्णत:साठी दोन हजार ६०० रुपये नुकसानभरपाईची रक्कम आहे. मात्र आता नवीन निर्णयानुसार अंशत: नुकसान झालेल्या एका होडीला १० हजार रुपये तर पूर्णत: नुकसान झालेल्या होडीला २५ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच अंशत: जाळीला पाच हजार आणि पूर्णत: तुटलेल्या एका जाळीलाही पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ