शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मच्छीमारी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी , कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्नशील : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:37 IST

रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारी सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारी सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली. जिल्ह्यातील सहकार विभागाचा आढावा घेण्यासाठी विविध बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांनी सहकार खात्यातील विविध खात्यांच्या अधिकाºयांकडून आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशमुख बोलत होते.अन्नाचा पोशिंदा म्हणून शेतकºयांची ओळख आहे. तो ज्या-ज्या वेळी आर्थिक संकटामध्ये सापडला, त्या वेळी सरकारने त्याला मदतीचा हात दिला आहे. शेतकरी शेतीमधून उत्पादन घेतात. त्याचप्रमाणे मच्छीमार देखील मासळीचे उत्पादन घेत असतो. त्यांनाही नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांनी विविध मच्छीमार संस्थांकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. मच्छीमारांवर उपासमारीचीवेळ येते. त्याचप्रमाणे संबंधित मच्छीमार संस्था अडचणीत येऊन अवसायानात जाण्याची शक्यता असते.मच्छीमारांनाही आर्थिक संरक्षण देणे गरजेचे असल्याची मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. आमदार ठाकूर यांची मागणी योग्य आहे. मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळावी यासाठी मंत्रिमंडळ स्तरावरील बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांच्या या सकारात्मक निर्णयाने रायगड जिल्ह्यासह मासेमारी करणाºया महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना त्यांचा लाभ होणार असल्याचे बोलले जाते. मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिल्यावर शेतकºयांपाठोपाठ मच्छीमारांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यामधील सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे भात गिरण्या आणि काही ग्राहक संस्था या अवसायानात गेल्या आहेत. जिल्ह्यातील सहकार चळवळ टिकवण्यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असल्याने त्याबाबतही ठोस कार्यक्र म हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.पेण अर्बनची कार्यवाही संथपेण अर्बन बँक बुडीत प्रकरणी कर्जदाराच्या मालमत्ता विकून खातेदारांना रक्कम देण्याची कार्यवाही अत्यंत संथगतीने सुरू असल्याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता कार्यवाही सुरू आहे, असेच मोघम उत्तर देशमुख यांनी दिले. सहकार मंत्री देशमुख रायगड जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे पेण अर्बन बँकेच्या खातेदारांना काही तरी चांगली बातमी मिळेल असे वाटले होते. मात्र, सहकार मंत्र्यांनी काहीच ठोस निर्णय न दिल्याने त्यांची घोर निराशा झाल्याचे दिसून आले.११ हजार शेतकºयांना लाभशेतकरी कर्जमाफीमध्ये रायगड जिल्ह्यातील ११ हजार शेतकºयांना तब्बल २२ कोटी रु पयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.जिल्ह्यातील विविध विकास कार्यकारी संस्थांमध्ये खातेदारांना जोडण्यात यावेत. यासाठी ८०६ महसुली गावांमध्ये एक विविध विकास कार्यकारी संस्था निर्माण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी दरवर्षी २० सहकारी संस्था या टेस्ट आॅडिटसाठी घेण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखRaigadरायगडfishermanमच्छीमार