शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

मच्छीमारी सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी , कर्जमाफी मिळण्यासाठी प्रयत्नशील : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 02:37 IST

रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारी सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारी सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिली. जिल्ह्यातील सहकार विभागाचा आढावा घेण्यासाठी विविध बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांनी सहकार खात्यातील विविध खात्यांच्या अधिकाºयांकडून आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देशमुख बोलत होते.अन्नाचा पोशिंदा म्हणून शेतकºयांची ओळख आहे. तो ज्या-ज्या वेळी आर्थिक संकटामध्ये सापडला, त्या वेळी सरकारने त्याला मदतीचा हात दिला आहे. शेतकरी शेतीमधून उत्पादन घेतात. त्याचप्रमाणे मच्छीमार देखील मासळीचे उत्पादन घेत असतो. त्यांनाही नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांनी विविध मच्छीमार संस्थांकडून घेतलेले कर्ज फेडता येत नाही. मच्छीमारांवर उपासमारीचीवेळ येते. त्याचप्रमाणे संबंधित मच्छीमार संस्था अडचणीत येऊन अवसायानात जाण्याची शक्यता असते.मच्छीमारांनाही आर्थिक संरक्षण देणे गरजेचे असल्याची मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. आमदार ठाकूर यांची मागणी योग्य आहे. मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळावी यासाठी मंत्रिमंडळ स्तरावरील बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांच्या या सकारात्मक निर्णयाने रायगड जिल्ह्यासह मासेमारी करणाºया महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना त्यांचा लाभ होणार असल्याचे बोलले जाते. मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिल्यावर शेतकºयांपाठोपाठ मच्छीमारांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यामधील सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे भात गिरण्या आणि काही ग्राहक संस्था या अवसायानात गेल्या आहेत. जिल्ह्यातील सहकार चळवळ टिकवण्यासाठी त्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असल्याने त्याबाबतही ठोस कार्यक्र म हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.पेण अर्बनची कार्यवाही संथपेण अर्बन बँक बुडीत प्रकरणी कर्जदाराच्या मालमत्ता विकून खातेदारांना रक्कम देण्याची कार्यवाही अत्यंत संथगतीने सुरू असल्याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता कार्यवाही सुरू आहे, असेच मोघम उत्तर देशमुख यांनी दिले. सहकार मंत्री देशमुख रायगड जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे पेण अर्बन बँकेच्या खातेदारांना काही तरी चांगली बातमी मिळेल असे वाटले होते. मात्र, सहकार मंत्र्यांनी काहीच ठोस निर्णय न दिल्याने त्यांची घोर निराशा झाल्याचे दिसून आले.११ हजार शेतकºयांना लाभशेतकरी कर्जमाफीमध्ये रायगड जिल्ह्यातील ११ हजार शेतकºयांना तब्बल २२ कोटी रु पयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.जिल्ह्यातील विविध विकास कार्यकारी संस्थांमध्ये खातेदारांना जोडण्यात यावेत. यासाठी ८०६ महसुली गावांमध्ये एक विविध विकास कार्यकारी संस्था निर्माण करण्यावर भर द्यावा, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी दरवर्षी २० सहकारी संस्था या टेस्ट आॅडिटसाठी घेण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखRaigadरायगडfishermanमच्छीमार