शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उजाड डोंगर हिरवा करण्याचा तरु णांचा संकल्प, पहिल्या टप्प्यात ५१२ खड्डे खोदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 02:23 IST

फार वर्षांपूर्वी वृक्षराजींनी नटलेला आपल्या गावासमोरील डोंगर आता उजाड झाला आहे. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

- विनोद भोईरपाली  - फार वर्षांपूर्वी वृक्षराजींनी नटलेला आपल्या गावासमोरील डोंगर आता उजाड झाला आहे. येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही गोष्ट वावे गावातील तरुणांना बैचेन करत होती. यावर सर्व तरुणांनी गावासमोरील उजाड झालेले जंगल पुन्हा एकदा हिरवेगार करण्याचा संकल्प के ला.तरुणांसह ग्रामस्थांनी त्या डोंगरावर शास्त्रशुद्ध पद्धतीने ५१२ झाडे लावण्याचे नियोजन के ले आहे.या मोहिमेतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्यात ५१२ खड्डे खोडण्याचे काम पूर्णत्वास आले असून, पाऊस पडल्यानंतर यामध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे. खड्डे किती रुंद व खोल असावेत, त्यांच्यातील अंतर किती असावे. त्यात कोणती माती व खत टाकावे आणि त्यानंतर खड्ड्यात कोणत्या प्रकारची रोपे लावावीत, यासाठी वनविभागाकडून सर्व शास्त्रशुद्ध माहिती घेतली जात आहे. या अभियानास वनविभागाचे मार्गदर्शन व सहकार्य आहे.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५१२ खड्ड्यांत रोपे लागवड करण्यात येतील. नुसते रोपे लावून न थांबता ती जगविण्यावर अधिक भर देऊन त्यांचे योग्य संगोपन करण्यात येणार आहे. या मेहनतीचे संपूर्ण श्रेय वावे गावातील तरुणांचे आहे, असे गावातील तरुण व भैरीनाथ क्रीडामंडळाने सांगितले.अशा स्वरूपाची मोहीम संपूर्ण तालुकाभर राबविण्याचे आवाहन शिवऋण प्रतिष्ठानने केले आहे. त्याचप्रमाणे वावे गावातील सर्व तरुणांनी पुढाकार घेऊन तालुक्यात सर्वप्रथम वृक्षलागवडीकरिता सुरुवात केली. या मोहिमेच्या माध्यमातून शासनाच्या वृक्षलागवड अभियानासही मोठे सहकार्य मिळणार आहे.मोहिमेत श्रमदानगावातील तरुणांसोबतच लहानगेही हातात फावडे व कुदळ घेऊन या मोहिमेत श्रमदान करत आहेत. पर्यावरण संवर्धन व त्यासाठी सुरू केलेल्या वृक्षलागवड मोहिमेसाठी सारेच जण भारावून गेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरुण मोहिमेचे व्हिडीओ व फोटो अपलोड करत आहेत. तसेच सगळ्यांना आपल्या या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या कामाने प्रेरित होऊन इतर ठिकाणीही अशा स्वरूपाच्या मोहिमा सुरू करण्याचे ठरविले जात आहेत.

टॅग्स :Raigadरायगड