शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:43 IST

जीवितहानी नाही : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण

अलिबाग : थळ येथील खतनिर्मिती करण्यात अग्रेसर असणाऱ्या आरसीएफ कंपनीच्या क्षेत्रातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या १०० केव्हीच्या उपकेंद्राला मंगळवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आरसीएफच्या अग्निशमन यंत्रणेने ती तत्काळ विझवल्याने मोठा अनर्थ टळला. शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तेथील केबलसह अन्य साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याच कारणामुळे अलिबाग तालुक्यातील वीजपुरवठा २१ मे आणि २२ मे रोजी खंडित झाला होता. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने दुसºया फिडरवरून विद्युत प्रवाह सुरू केल्याने २१ मे रोजी रात्री वीजप्रवाह तब्बल दीड तासांनी परत सुरू झाला होता.

महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बुधवारी दिवसभर फॉल्ट शोधत होते. मात्र, त्यांना तो सापडत नव्हता. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली व्हॅन अलिबागमध्ये दाखल झाल्यावर तिच्या माध्यमातून नेमका कोणता आणि कोठे फॉल्ट झाला होता याची माहिती मिळाली. त्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यासाठी वीजप्रवाह पुन्हा दीड तासांसाठी खंडित करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील थळ परिसरामध्ये आरसीएफचा खतनिर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारी वीज महाराष्ट्र वीज कंपनीला देण्यात येते. यासाठी आरसीएफ प्रकल्पाच्या परिसरातच वीज कंपनीचे १०० केव्हीचे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. आरसीएफ प्रकल्पातून तयार होणारी वीज या १०० केव्हीच्या सबस्टेशनच्या माध्यमातून वीज कंपनी अलिबागमध्ये पुरवठा करते. मंगळवारी याच सबस्टेशनला सायंकाळी शार्टसर्किटमुळे अचानक आग लागली होती. आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेने ती तातडीने विझवली. सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अलिबाग येथील उपअभियंता पंकज जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बुधवारी सायंकाळी फॉल्ट सापडल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी ४.४५ वाजता विद्युत प्रवाह पुन्हा खंडित करण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर सुमारे दीड तासानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मंगळवारी विद्युत पुरवठा १ ते ५ असा सलग खंडित झालाहोता.

व्यावसायिकांना फटकाकडक उन्हाचे चटके बसत असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर पुन्हा विजेचा लंपडाव सुरूच असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. मंगळवारी दुपारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विविध व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला. बुधवारी दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांना पुन्हा फटका बसल्याने वीज कंपनीबाबत नाराजी दिसून आली.

विद्युत पुरवठा खंडितच्कार्लेखिंड : सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे रेवस फिडरच्या हद्दीतील नागरिक हैराण झाले आहेत. रेवस फिडरच्या अखत्यारित मोठा विभाग असल्यामुळे जास्त अडचणी होत आहेत. दररोज काही ना काही तरी तांत्रिक बिघाड होत आहे.च्मे महिन्यातील उन्हाळा आणि त्यात वाढलेली उष्णता यामुळे घरात पंखा किंवा एसी लावल्याशिवाय माणसाला दिलासा मिळत नाही; परंतु या फिडरमधील वीजपुरवठा नेहमीच खंडित होत असतो कारण या विभागातील उच्चदाब वाहिनी ही जंगलातून तसेच झाडांमधून नेलेली आहे.च्दुसरे म्हणजे जीर्ण विद्युत तारा तर कर्मचारी आणि अभियंता यांचा तुटवडा या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार विद्युत मंडळाने जमिनीखालून विद्युत वाहिन्या टाकून ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याची गरज निर्माण झाली आहे.च्मंगळवारी सासवणे, आवास, तुडाळ येथे वाहिनी तुटली होती आणि थळ येथे जमिनीतून टाकण्यात आलेली उच्चदाब वाहिनी जळल्याने जवळजवळ सहा ते सात तास तर काही ठिकाणी १४ तास विद्युत पुरवठा खंडित झाला.