शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

थळ येथील आरसीएफ कंपनी परिसरातील सब स्टेशनला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:43 IST

जीवितहानी नाही : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण

अलिबाग : थळ येथील खतनिर्मिती करण्यात अग्रेसर असणाऱ्या आरसीएफ कंपनीच्या क्षेत्रातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या १०० केव्हीच्या उपकेंद्राला मंगळवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. आरसीएफच्या अग्निशमन यंत्रणेने ती तत्काळ विझवल्याने मोठा अनर्थ टळला. शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तेथील केबलसह अन्य साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याच कारणामुळे अलिबाग तालुक्यातील वीजपुरवठा २१ मे आणि २२ मे रोजी खंडित झाला होता. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने दुसºया फिडरवरून विद्युत प्रवाह सुरू केल्याने २१ मे रोजी रात्री वीजप्रवाह तब्बल दीड तासांनी परत सुरू झाला होता.

महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बुधवारी दिवसभर फॉल्ट शोधत होते. मात्र, त्यांना तो सापडत नव्हता. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेली व्हॅन अलिबागमध्ये दाखल झाल्यावर तिच्या माध्यमातून नेमका कोणता आणि कोठे फॉल्ट झाला होता याची माहिती मिळाली. त्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यासाठी वीजप्रवाह पुन्हा दीड तासांसाठी खंडित करण्यात आला. अलिबाग तालुक्यातील थळ परिसरामध्ये आरसीएफचा खतनिर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारी वीज महाराष्ट्र वीज कंपनीला देण्यात येते. यासाठी आरसीएफ प्रकल्पाच्या परिसरातच वीज कंपनीचे १०० केव्हीचे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. आरसीएफ प्रकल्पातून तयार होणारी वीज या १०० केव्हीच्या सबस्टेशनच्या माध्यमातून वीज कंपनी अलिबागमध्ये पुरवठा करते. मंगळवारी याच सबस्टेशनला सायंकाळी शार्टसर्किटमुळे अचानक आग लागली होती. आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेने ती तातडीने विझवली. सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अलिबाग येथील उपअभियंता पंकज जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बुधवारी सायंकाळी फॉल्ट सापडल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी ४.४५ वाजता विद्युत प्रवाह पुन्हा खंडित करण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर सुमारे दीड तासानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मंगळवारी विद्युत पुरवठा १ ते ५ असा सलग खंडित झालाहोता.

व्यावसायिकांना फटकाकडक उन्हाचे चटके बसत असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर पुन्हा विजेचा लंपडाव सुरूच असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. मंगळवारी दुपारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विविध व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला. बुधवारी दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित केल्याने नागरिकांना पुन्हा फटका बसल्याने वीज कंपनीबाबत नाराजी दिसून आली.

विद्युत पुरवठा खंडितच्कार्लेखिंड : सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे रेवस फिडरच्या हद्दीतील नागरिक हैराण झाले आहेत. रेवस फिडरच्या अखत्यारित मोठा विभाग असल्यामुळे जास्त अडचणी होत आहेत. दररोज काही ना काही तरी तांत्रिक बिघाड होत आहे.च्मे महिन्यातील उन्हाळा आणि त्यात वाढलेली उष्णता यामुळे घरात पंखा किंवा एसी लावल्याशिवाय माणसाला दिलासा मिळत नाही; परंतु या फिडरमधील वीजपुरवठा नेहमीच खंडित होत असतो कारण या विभागातील उच्चदाब वाहिनी ही जंगलातून तसेच झाडांमधून नेलेली आहे.च्दुसरे म्हणजे जीर्ण विद्युत तारा तर कर्मचारी आणि अभियंता यांचा तुटवडा या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार विद्युत मंडळाने जमिनीखालून विद्युत वाहिन्या टाकून ग्राहकांना सुरळीत सेवा देण्याची गरज निर्माण झाली आहे.च्मंगळवारी सासवणे, आवास, तुडाळ येथे वाहिनी तुटली होती आणि थळ येथे जमिनीतून टाकण्यात आलेली उच्चदाब वाहिनी जळल्याने जवळजवळ सहा ते सात तास तर काही ठिकाणी १४ तास विद्युत पुरवठा खंडित झाला.