शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

रायगडमधील सहा तालुक्यांत अग्निसुरक्षा वाऱ्यावर, महाड औद्योगिक वसाहतीसोबत फक्त शहरालाच स्वतंत्र सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 10:47 IST

महाड तालुक्याचा विचार केला तर औद्योगिक वसाहतीकरिता स्वतःची अग्निशमन यंत्रणा आहे. तर महाड शहराकरिता महाड नगरपालिकेची स्वतःचे असे अग्निशमन दल आहे.

महाड :  आपत्कालीन स्थिती उद्भवल्यानंतर अनेकांना अग्निशमन दलाची आठवण होते. मात्र, शहर आणि औद्योगिक वसाहती वगळता संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी कोणतीही यंत्रणा शासनाकडे उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे ग्रामीण भागात एखादे अग्निकांड अगर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर शहरी भागातून येणाऱ्या या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. 

महाड तालुक्याचा विचार केला तर औद्योगिक वसाहतीकरिता स्वतःची अग्निशमन यंत्रणा आहे. तर महाड शहराकरिता महाड नगरपालिकेची स्वतःचे असे अग्निशमन दल आहे. तालुक्यातील ग्रामीण भागांत उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत याच दोन दलांवर अवंलबून राहावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे रायगड जिल्ह्यात तालुका पातळीवर ग्रामीण भागांत अग्निशमन दल सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही. संपूर्ण रायगड जिल्ह्यात हे केवळ १३ अग्निशमन दल कार्यरत आहेत. 

प्रत्येकाला स्वतःचे कार्यक्षेत्र ठरलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाडशेजारी असलेल्या पोलादपूर, गोरेगाव, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, इंदापूर आदी तालुक्यांच्या ठिकाणी कोणतेही अग्निशमन दल नसल्याने भविष्यात हे  चित्र अधिक धोकादायक ठरणार आहे. 

येथे खासगी अग्निशमन दलमहाड, रोहा, पेण, आलिबाग, खोपोली, कर्जत या प्रमुख नगर परिषदांकडे अग्निशमन गाड्या उपलब्ध आहेत. तर महाड औद्योगिक वसाहत, रोहा औद्योगिक वसाहत, रिलायन्स नागोठणे, औद्योगिक वसाहत पाताळगंगा या औद्योगिक वसाहती आणि सुप्रिम पेट्रोकेम, एच.पी.सी.एल., गेल इंडिया प्रा. लि. यांचे खासगी अग्निशमन दल आहे. 

छोट्या अग्निशमन यंत्रणांची तरतूद हवी पोलादपूरप्रमाणेच महाडजवळ असलेले लोणेरे, माणगाव, इंदापूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन ही मोठी आणि शहरांचा दर्जा असलेली गावेदेखील अग्निशमन यंत्रणेपासून दूरच आहेत. याठिकाणी कोणतीही आगीची दुर्घटना घडली तर महाडमधील अग्निशमन दल पाहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. अनेक ग्र्रामपंचायती आणि शहरे ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. ग्रामपंचायत स्तरावर छोट्या अग्निशमन यंत्रणांची तरतूद करणे गरजेचे आहे.

सर्वस्व गमावणाऱ्यांसाठी दर न परवडणारे रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावे आणि वाड्या या दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या आहेत. यामुळे या यंत्रणा पोहोचण्यास वेळ लागतो. महाड औद्योगिक वसाहतीची स्वतंत्र यंत्रणा आहे. तालुक्यात कुठेही दुर्घटना घडली तर हे पथक तात्काळ पोहोचते. मात्र, औद्योगिक वसाहतीची ही अग्निशमन यंत्रणा आपले क्षेत्र सोडल्यानंतर आता त्यांचा शासनाने ठरवून दिलेला दर आकारण्यास प्रारंभ करत आहे. आगीत सर्वस्व गमावणाऱ्यांना हा दर परवडणारा नसतो.   

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दल